एक्स्प्लोर

नितीश कुमार मुख्यमंत्री, सुशील मोदी उपमुख्यमंत्री

जनता दल युनायटेडचे नेते नितीश कुमार हे सहाव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. पाटण्यातील राजभवनात नितीश कुमार यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली.

पाटणा: जनता दल युनायटेडचे नेते नितीश कुमार हे सहाव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. पाटण्यातील राजभवनात नितीश कुमार यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. नितीश कुमार यांच्यानंतर भाजप नेते सुशील मोदी यांनीही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. नितीश कुमार यांनी भाजपच्या साथीने बिहारमध्ये सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. नितीश कुमारांच्या नव्या मंत्रिमंडळात जेडीयू आणि भाजपचे 13 -13 मंत्री असतील. Sushil_Oath Nitish_Oath बिहारमध्ये रात्रभर घडामोडी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काल (बुधवार) राजीनामा दिल्यानंतर रात्रभर अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यामुळे नितीश कुमार यांच्या शपथविधीची वेळही बदलण्यात आली. सुरुवातीला शपथविधी सोहळा आज संध्याकाळी पाच वाजता होणार होता. मात्र,  त्याची वेळ बदलून आज सकाळी 10 वाजता करण्यात आली. भाजपच्या पाठिंब्यानं नितीश कुमार यांनी सत्ता स्थापनेचा दावा केल्यानं लालूप्रसाद यादव यांचे चिंरजीव तेजस्वी यादव यांनी थेट रात्री अडीच वाजता राजभवनावर अनेक कार्यकर्त्यांसह मोर्चा काढला. राजद बिहारमधील सर्वात मोठा पक्ष असून राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी आम्हाला बोलवावं अशी मागणी तेजस्वी यादव यांनी यावेळी केली. दरम्यान, राज्यपालांनी तेजस्वी यादव यांच्यासोबत रात्री चर्चाही केली. लालू न्यायालयात जाणार? दरम्यान, लालू प्रसाद यादव यांचा पक्ष राजद याप्रकरणी न्यायालयातही जाण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे भविष्यात जेडीयूच्या अडचणी वाढू शकतात. मात्र, असं असलं तरी राजकीयदृष्ट्या बहुमत सिद्ध करताना जेडीयूला कोणतीही अडचण येणार नाही. नितीश कुमार यांचा राजीनामा “बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासूनची जी परिस्थिती सुरु आहे, त्यामध्ये काम करणं अशक्य झालं आहे.  लालू यादव आणि काँग्रेसशी परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी चर्चा केली, मात्र काहीही तोडगा निघाला नाही”, अशी प्रतिक्रिया नितीश कुमार यांनी राजीनाम्यानंतर दिली. जेडीयूच्या आमदारांच्या बैठकीनंतर नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. नितीश कुमार राजीनाम्याची माहिती देत असताना मोदींचं ट्वीट नितीश कुमार राज्यपालांकडे राजीनामा देऊन बाहेर आले. माध्यमांना राजीनामा का दिला, याची माहिती देत असतानाच काही क्षणातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केलं. राजकीय मतभेद बाजूला ठेवून भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर एकत्र आल्याबद्दल मोदींनी नितीश कुमार यांना शुभेच्छा दिल्या. मोदी काय म्हणाले? भ्रष्टाचाराविरोधातील लढाईत सहभागी झाल्याबद्दल नितीश कुमार यांचं अभिनंदन. देशाच्या आणि विशेषतः बिहारच्या उज्ज्वल भविष्यासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून भ्रष्टाचाराविरोधात एकत्र येऊन लढणं काळाची गरज आहे, असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. नितीश कुमारांकडून मोदींचे आभार एकीकडे मोदींनी नितीश कुमार यांचे आभार मानल्याची चर्चा सुरु असतानाच नितीश कुमार यांनी मोदींना धन्यवाद म्हटलं. राजीनाम्याच्या निर्णयाचं स्वागत केल्याबद्दल मी मोदींना मनापासून धन्यवाद देतो, असं ट्वीट नितीश कुमार यांनी केलं. नितीश कुमारांचा राजीनामा पूर्वनियोजित : लालूप्रसाद यादव नितीश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राज्यपालांची भेट घेऊन नितीश कुमार यांनी राजीनामा सुपूर्द केला. मात्र नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी पत्रकार परिषद घेऊऩ नितीश कुमारांचा राजीनामा पूर्वनियोजित असून त्यांच्यावरील आरोपांमुळे आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचं म्हटलं आहे. तसंच देशातील अन्य कोणत्याही मुख्यमंत्र्यावर इतक्या गंभीर स्वरुपाचे आरोप नसल्याचंही लालूप्रसाद यादव यांनी म्हटलं आहे. त्यामुळे भाजपसोबत सेटिंग करत नितीश कुमारांनी राजीनामा दिल्याचा आरोपही लालूप्रसाद यादव यांनी केला. नितीश कुमार यांची पहिली प्रतिक्रिया मी कुणाला राजीनामा मागितला नाही. लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांना त्यांच्यावर लावण्यात येत असलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण देण्याची मागणी केली होती. मात्र असं काहीही झालं नाही. अशी परिस्थिती झाली की मी त्यामध्ये कामच करु शकत नव्हतो. त्यामुळे राजीनामा देण्याचा निर्णय घेतला, अशी प्रतिक्रिया नितीश कुमार यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर दिली. लालू प्रसाद यादव यांच्यावर होत असलेल्या सीबीआयच्या छापेमारीनंतर आणि अघोषित संपत्तीच्या कारवाईनंतर नितीश कुमार यांनी हा निर्णय घेतला. बिहारमध्ये महायुतीचं सरकार आहे. ज्यामध्ये काँग्रेसही मित्र पक्ष आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याशीही चर्चा केली. मात्र काहीही तोडगा निघाला नाही, अशी माहिती नितीश कुमार यांनी दिली. बिहार विधानसभेतील पक्षीय बलाबल (एकूण 243 सदस्य) : 
  • आरजेडी (लालू) – 80
  • जेडीयू (नितीश कुमार) – 71
  • काँग्रेस – 27
  • भाजप – 53
  • सीपीआय – 3
  • लोक जनशक्ती पार्टी – 2
  • राष्ट्रीय लोक समता पार्टी – 2
  • हिंदुस्तानी अवाम मोर्चा – 1
  • अपक्ष – 4
काय आहे नेमकं प्रकरण? बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासह आरजेडी प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या मालमत्तांवर सीबीआयने छापेमारी केली होती. या छापेमारीत तेजस्वी यादव यांच्याकडे बेहिशेबी मालमत्ता असल्याचं आढळून आलं होतं. त्यामुळे तेजस्वी यादव यांनी राजीनामा देण्याची मागणी जोर धरत होती. दुसरीकडे  लालू प्रसाद यादव यांनी राजदच्या आमदारांची बैठक घेऊन, तेजस्वी यादव पदाचा राजीनामा देणार नाहीत, असं जाहीर केलं. तर तेजस्वी यादव यांनी राजीनामा दिला नाही तर त्यांना बडतर्फ करण्याचा इशारा मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिला होता. बिहारमध्ये जेडीयू, आरजेडी आणि काँग्रेसची युती आहे. या छापेमारीनंतर  गेल्या काही दिवसांपासून नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव यांचं बोलणंही बंद झालं आहे. त्याचा भाग म्हणून बिहारमध्ये झालेल्या एका सरकारी कार्यक्रमाला नितीश कुमारांची हजेरी होती, पण उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी दांडी मारली होती.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: पुण्यातील आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरच्या खात्यात तब्बल इतके कोटी; पोलिसांनी सांगून टाकला आकडा, कुठून आले पैसे?
पुण्यातील आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरच्या खात्यात तब्बल इतके कोटी; पोलिसांनी सांगून टाकला आकडा, कुठून आले पैसे?
Pune Crime News: फॉर्च्युनरमध्ये व्यवसायिकाचा काटा काढला; पुण्यातील माजी नगरसेवकाचं कनेक्शन समोर आलं, ताम्हिणी घाटात काय घडलं?
फॉर्च्युनरमध्ये व्यवसायिकाचा काटा काढला; पुण्यातील माजी नगरसेवकाचं कनेक्शन समोर आलं, ताम्हिणी घाटात काय घडलं?
‘महावतार नरसिंह’ची ऑस्करच्या रेसमध्ये बाजी; भगवान विष्णूंच्या अवताराची पौराणिक कथा करणार का 5 सिनेमांवर मात?
‘महावतार नरसिंह’ची ऑस्करच्या रेसमध्ये बाजी; भगवान विष्णूंच्या अवताराची पौराणिक कथा करणार का 5 सिनेमांवर मात?
खेळताना ट्रॅक्टरवर चढला, चुकून गिअर पडला अन् क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; बार्शीत 4 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू
खेळताना ट्रॅक्टरवर चढला, चुकून गिअर पडला अन् क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; बार्शीत 4 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

India Vs South Africa टीम इंडियाचा कसोटीतील मोठा पराभव, द. अफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाचं काय चुकलं?
Ujjwala Thitte News : आम्ही हायकोर्टात धाव घेऊ, तिथे ही अपयश आलं तर सर्वोच न्यायालयात जाऊ!
Nagpur Road ABP Majha Impact : एबीपी माझा'च्या बातमीनंतर नागपूर रस्त्यासाठी सरकारकडून 80 कोटींचा निधी मंजूर
MVA VS Mahayuti : मविआला ठेंगा, महायुतीसाठी रांगा; मनपा निवडणुकीपर्यंत मविआचं काय होणार? Special Report
Special Report MVA Vs Mahayuti पालिका निवडणुकीपर्यंत मविआचं काय होणार? मविआतून लढलेले अनेक महायुतीत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: पुण्यातील आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरच्या खात्यात तब्बल इतके कोटी; पोलिसांनी सांगून टाकला आकडा, कुठून आले पैसे?
पुण्यातील आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरच्या खात्यात तब्बल इतके कोटी; पोलिसांनी सांगून टाकला आकडा, कुठून आले पैसे?
Pune Crime News: फॉर्च्युनरमध्ये व्यवसायिकाचा काटा काढला; पुण्यातील माजी नगरसेवकाचं कनेक्शन समोर आलं, ताम्हिणी घाटात काय घडलं?
फॉर्च्युनरमध्ये व्यवसायिकाचा काटा काढला; पुण्यातील माजी नगरसेवकाचं कनेक्शन समोर आलं, ताम्हिणी घाटात काय घडलं?
‘महावतार नरसिंह’ची ऑस्करच्या रेसमध्ये बाजी; भगवान विष्णूंच्या अवताराची पौराणिक कथा करणार का 5 सिनेमांवर मात?
‘महावतार नरसिंह’ची ऑस्करच्या रेसमध्ये बाजी; भगवान विष्णूंच्या अवताराची पौराणिक कथा करणार का 5 सिनेमांवर मात?
खेळताना ट्रॅक्टरवर चढला, चुकून गिअर पडला अन् क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; बार्शीत 4 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू
खेळताना ट्रॅक्टरवर चढला, चुकून गिअर पडला अन् क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; बार्शीत 4 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू
Shivsena Vs BJP: अंबरनाथमध्ये शिंदे गट-भाजपमध्ये तुफान राडा,  धमकीनंतर भाजप कार्यकर्त्यावर कोयत्याने हल्ला
अंबरनाथमध्ये शिंदे गट-भाजपमध्ये तुफान राडा, धमकीनंतर भाजप कार्यकर्त्यावर कोयत्याने हल्ला
Smriti Mandhana Palash Muchhal: वडिलांची प्रकृती बिघडली, लग्न पुढे ढकललं; आता स्मृती मानधनानं मोठं पाऊल उचललं
वडिलांची प्रकृती बिघडली, लग्न पुढे ढकललं; आता स्मृती मानधनानं मोठं पाऊल उचललं
Ajit Pawar in Solapur: मस्ती असलेल्या लोकांना खड्यासारखं बाजूला काढलं जातं, प्रत्येकाचा फुगा फुटत असतो; अजित पवारांचा राजन पाटलांवर हल्लाबोल
मस्ती असलेल्या लोकांना खड्यासारखं बाजूला काढलं जातं, प्रत्येकाचा फुगा फुटत असतो; अजित पवारांचा राजन पाटलांवर हल्लाबोल
Gautam Gambhir Ind Vs SA: मीच तो ज्याने इंग्लंडमध्ये तरुण संघ घेऊन विजय मिळवला, मीच तो ज्याच्या मार्गदर्शनात भारताने आशिया कप अन् चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली; गौतम गंभीरने पराभवानंतर टीकाकारांना सुनावलं
प्रेस कॉन्फरन्समध्ये अपयशावरुन बोचरे प्रश्न विचारताच गौतम गंभीर चिडला, म्हणाला, 'माझ्यामुळेच संघाला'
Embed widget