एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

देशातील रस्ते अपघातांवर गडकरी नाराज, मात्र मुंबईच्या ट्रॅफिकचं कौतुक

पाच वर्षात रस्ते अपघातांची संख्या निम्म्याने कमी करण्याची घोषणा करणारे नितीन गडकरी याबाबत समाधानकारक प्रगती होत नसल्याने नाराज आहेत.

नवी दिल्ली : देशातील रस्ते अपघातांवर केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. परंतु रस्ते वाहतुकीत मुंबईच्या शिस्तीचं गडकरींनी कौतुक केलं आहे. लोकसंख्येच्या तुलनेत मुंबई देशात पहिल्या नंबरवर असली तरी रस्ते अपघातातल्या मृत्यूंचं प्रमाण मात्र तुलनेने कमी आहे. दिल्ली, चेन्नईत सर्वाधिक अपघात होतात. त्यावर विचारलं असता गडकरींच्या खात्यातल्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी मुंबईच्या रस्ते वाहतुकीतल्या शिस्तीचं दिलखुलास कौतुक केलं, ज्याला केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही अनुमोदन दिलं. दिल्लीत लेनची शिस्त अजिबात पाळली जात नाही, त्या तुलनेत मुंबईतले ड्रायव्हर्स हे लेन शिस्तीबाबत चांगले आहेत असं वक्तव्य त्यांनी केलं. महाराष्ट्र रस्ते अपघातात तिसऱ्या नंबरवर असला तरी अपघाताचं प्रमाण वेगाने कमी करणाऱ्या राज्यांतही महाराष्ट्राचा समावेश होतो हे विशेष. दरम्यान, पाच वर्षात रस्ते अपघातांची संख्या निम्म्याने कमी करण्याची घोषणा करणारे नितीन गडकरी याबाबत समाधानकारक प्रगती होत नसल्याने नाराज आहेत. 2016 या वर्षासाठी रस्ते अपघाताचा अहवाल गडकरींनी सादर केला, त्यातले आकडे धक्कादायक आहेत. एका वर्षात 4 लाख 80 हजार 652 अपघात झाले असून त्यात 1 लाख 50 हजार 785 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. म्हणजे भारतात एका तासाला 55 अपघात म्हणजे जवळपास मिनिटाला एक अपघात होतो, ज्यात तासाला 17 जण मृत्यूमुखी पडत आहेत. 2015 च्या तुलनेत 2016 मध्ये अपघातांचं प्रमाण 4.1 टक्क्यांनी कमी झालेलं आहे, मात्र मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 3.2 टक्क्यांनी वाढलेली आहे. हे आकडे समाधानकारक नसल्याची कबुली खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिली. रस्ते अपघातातल्या मृत्यूंची संख्या लक्षात घेतली तर देशात उत्तर प्रदेशचा पहिला, तामिळनाडूचा दुसरा तर महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक आहे. अर्थात शहरनिहाय संख्या पाहिली तर राजधानी दिल्ली हे पहिल्या, चेन्नई दुसऱ्या स्थानावर आहे. दुचाकीच्या अपघातात वर्षभरात जे 52,500 मृत्यू झाले आहेत त्यापैकी 10135 मृत्यू केवळ हेल्मेट न घातल्यामुळे झाले. शिवाय गाडी चालवताना मोबाईलवर बोलल्याने वर्षभरात 2138 लोकांना जीव गमवावा लागला. या मानवी चुकांसह रस्त्यांचं चुकीचं डिझाईन, ज्यात कधी बायपास, योग्य ठिकाणी रस्ते ओलांडण्याची सुविधा नसणं या गोष्टींचाही समावेश असल्याची कबुली गडकरींनी दिली. पूर्वीच्या काळी रस्ते स्वस्तात बांधण्यावर भर असल्याने अशा चुका झाल्याचं गडकरींनी म्हटलं. मात्र याबाबत कुणाला दोष देत न बसता, लोकांनी व माध्यमांनी अशा चुका समोर आणल्यास त्याबाबत आपलं खातं तात्काळ कारवाई करेल, असंही आश्वासन त्यांनी दिलं. रस्ते अपघाताचे अहवाल राज्यांनाही वर्षाला सादर करावेत, जेणेकरुन लोकांमध्ये जागरुकता निर्माण होईल असंही गडकरींनी म्हटलं आहे. मोटार वाहन कायद्यात वाहतुकीची शिस्त न पाळल्यास मोठ्या दंडाची तरतूद असल्याने हे विधेयक तातडीने मंजूर झाल्यासही रस्ते वाहतुकीतल्या अपघातांची संख्या कमी होईल असा दावा गडकरींनी केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : खोट्या एक्झिट पोलचा शेअर मार्केटवर परिणाम, पीएम मोदी-अमित शाहांचा थेट सहभाग; राहुल गांधींचा गंभीर आरोप, जेपीसी चौकशीची मागणी
खोट्या एक्झिट पोलचा शेअर मार्केटवर परिणाम, पीएम मोदी-अमित शाहांचा थेट सहभाग; राहुल गांधींचा गंभीर आरोप, जेपीसी चौकशीची मागणी
मोदीच पंतप्रधान, महाराष्ट्रासाठी मंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरला?; नितीश कुमार अन् चंद्राबाबूंना 'मोठं पॅकेज'
मोदीच पंतप्रधान, महाराष्ट्रासाठी मंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरला?; नितीश कुमार अन् चंद्राबाबूंना 'मोठं पॅकेज'
Shrikant Shinde : इकडं नव्या खासदारांना मुख्यमंत्र्यांकडून सूचना अन् तिकडं  खासदार श्रीकांत शिंदेंच्या खांद्यावर मोठी जबाबदारी!
इकडं नव्या खासदारांना मुख्यमंत्र्यांकडून सूचना अन् तिकडं श्रीकांत शिंदेंच्या खांद्यावर मोठी जबाबदारी!
दादा म्हणाले, तुला बघतोच, आता बजरंग बप्पा म्हणतात, बघा मी निवडून आलोच : बजरंग सोनवणे 
दादा म्हणाले, तुला बघतोच, आता बजरंग बप्पा म्हणतात, बघा मी निवडून आलोच : बजरंग सोनवणे 
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bajrang Sonawane Mumbai : देशात मोदींची गॅरंटी चालली नाही, बीडमध्ये काय चालणार? -बजरंग सोनावणेKangana Ranaut Chandigarh Airport : कंगना रनौतला कानशिलात लगावली?  राजकीय सल्लागाराचा आरोपNilesh Rane on Kiran Samant : निवडणुकीत किरण सामंतांनी ठाकरेंना भेटले; राणे कुणालाच सोडत नाहीSupriya Sule Pune : सुनेत्रा पवार मोठ्या, जय-पार्थ मुलासारखे; सुप्रिया सुळे भावूक Baramati Lok Sabha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : खोट्या एक्झिट पोलचा शेअर मार्केटवर परिणाम, पीएम मोदी-अमित शाहांचा थेट सहभाग; राहुल गांधींचा गंभीर आरोप, जेपीसी चौकशीची मागणी
खोट्या एक्झिट पोलचा शेअर मार्केटवर परिणाम, पीएम मोदी-अमित शाहांचा थेट सहभाग; राहुल गांधींचा गंभीर आरोप, जेपीसी चौकशीची मागणी
मोदीच पंतप्रधान, महाराष्ट्रासाठी मंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरला?; नितीश कुमार अन् चंद्राबाबूंना 'मोठं पॅकेज'
मोदीच पंतप्रधान, महाराष्ट्रासाठी मंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरला?; नितीश कुमार अन् चंद्राबाबूंना 'मोठं पॅकेज'
Shrikant Shinde : इकडं नव्या खासदारांना मुख्यमंत्र्यांकडून सूचना अन् तिकडं  खासदार श्रीकांत शिंदेंच्या खांद्यावर मोठी जबाबदारी!
इकडं नव्या खासदारांना मुख्यमंत्र्यांकडून सूचना अन् तिकडं श्रीकांत शिंदेंच्या खांद्यावर मोठी जबाबदारी!
दादा म्हणाले, तुला बघतोच, आता बजरंग बप्पा म्हणतात, बघा मी निवडून आलोच : बजरंग सोनवणे 
दादा म्हणाले, तुला बघतोच, आता बजरंग बप्पा म्हणतात, बघा मी निवडून आलोच : बजरंग सोनवणे 
Kangana Ranaut : विमानतळावर CISF च्या महिला जवानने कानशिलात लगावली; कंगना रणौतचा आरोप
विमानतळावर CISF च्या महिला जवानने कानशिलात लगावली; कंगना रणौतचा आरोप
मोठी बातमी : किरण सामंत निवडणूक काळात उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंना भेटले, निलेश राणेंचा खळबळजनक दावा
मोठी बातमी : किरण सामंत निवडणूक काळात उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंना भेटले, निलेश राणेंचा खळबळजनक दावा
Nilesh Rane : पालकमंत्री असूनही उदय सामंत लीड देऊ शकले नाहीत, राणे कधीही माफ करणार नाहीत; निलेश राणेंचा इशारा
पालकमंत्री असूनही उदय सामंत लीड देऊ शकले नाहीत, राणे कधीही माफ करणार नाहीत; निलेश राणेंचा इशारा
Anna Bansode : पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडेंची अजित पवारांच्या बैठकीला दांडी; नेमकं कारण आहे तरी काय?
पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडेंची अजित पवारांच्या बैठकीला दांडी; नेमकं कारण आहे तरी काय?
Embed widget