एक्स्प्लोर

CAA मुस्लीमविरोधी नाही, काँग्रेसच्या षडयंत्रापासून सावध रहा : नितीन गडकरी

काँग्रेसने मुस्लिमांना केवळ व्होट मशीन म्हणून वागणूक दिली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून सुरु असलेल्या अपप्रचाराला बळी पडू नका, असे आवाहन गडकरी यांनी देशवासियांना केले आहे.

नागपूर : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ आज (22 डिसेंबर) नागपुरात विराट मोर्चा काढण्यात आला. लोकाधिकार मंचच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती.

मोर्चानंतर झालेल्या सभेत बोलताना नितीन गडकरी यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करणाऱ्यांवर जोरदार टीका केली. काँग्रेसच्या षडयंत्रापासून सावध राहा असा सल्ला देतानाच देशातल्या नागरिकांनी घाबरुन जाण्याची आवश्यकता नाही, असे आश्वासन गडकरी यांनी दिले.

गडकरी यांनी यावेळी काँग्रेसवर जोरदार हल्ला केला. गडकरी म्हणाले की, काँग्रेसने मुस्लिमांना केवळ व्होट मशीन म्हणून वागणूक दिली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून सुरु असलेल्या अपप्रचाराला बळी पडू नका, असं आवाहन गडकरी यांनी केले. नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा मुस्लीमविरोधी नसल्याचे गडकरी यांनी ठामपणे सांगितले.

हिंदू असणं पाप आहे का? असा सवाल करत नितीन गडकरी यांनी पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधील अल्पसंख्यांक हिंदूच्या परिस्थितीवर भाष्य केले. गडकरी म्हणाले की, आपल्या देशातल्या मुस्लीम घुसखोरांना आश्रय देण्यासाठी या जगात 100 ते 150 मुस्लीम देश आहेत. परंतु पाकिस्तानातले हिंदू 19 टक्क्यांवरुन 3 टक्क्यांवर आले आहेत. त्यांच्यासाठी या जगाच्या पाठीवर कोणताही देश नाही.

गडकरी म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पंडीत नेहरु यांनी शरणार्थींना आश्रय देण्याचे आश्वासन दिले होते. आपण ते पूर्ण केले पाहिजे. आपलो सरकार तेच काम करत आहे. आपले सरकार शरणार्थींना नागरिकत्व देत आहे. यामध्ये सरकारचं काय चुकलं? असा सवाल गडकरींनी उपस्थित केला.

दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनीदेखील CAA कायद्याला विरोध करणाऱ्यांवर टीका केली. फडणवीस म्हणाले की, काही लोक जाणून बुजून लोकांची माथी भडकवण्याचे काम करत आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा.

पाहा काय म्हणाले नितीन गडकरी? पाहा CAA बद्दल देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi on CJP Protest Delhi Jantar Mantar: काँकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, NEET पेपरफुटी प्रकरणावर महत्वाचे आदेश
काँकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, NEET पेपरफुटी प्रकरणावर महत्वाचे आदेश
Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Divija Fadnavis on CJP Protest Delhi Jantar Mantar: काँकरोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरील आंदोलनावर दिविजा फडणवीस यांनी रोखठोक मत मांडलं; काय काय म्हणाल्या?
काँकरोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरील आंदोलनावर दिविजा फडणवीस यांनी रोखठोक मत मांडलं; काय काय म्हणाल्या?
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget