एक्स्प्लोर

वेगळा विदर्भ नव्हे, पाणी प्रश्न महत्त्वाचा : गडकरींचं व्हिजन

नवी दिल्ली : सध्या महाराष्ट्रासाठी वेगळ्या विदर्भाचा नव्हे तर पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रात पाच वर्षात 3 लाख कोटींची गुंतवणूक करण्याचं लक्ष्य आहे. आतापर्यंत 6 हजार कोटींचा निधी दिला आहे. मात्र चांगल्या सुविधांसाठी पैसे मोजावे लागणार आहेत, त्यामुळे टोलपासून मुक्ती होणं असंभव आहे, असं केंद्रीय परिवहन आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले.   राजधानी दिल्लीत 'एबीपी माझा'च्या 'माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन' या कार्यक्रमात ते बोलत होते.   मोदी सरकारला दोन वर्ष पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मराठी मंत्र्यांचं महाराष्ट्राबाबतचं व्हिजन 'माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन' या कार्यक्रमातून मांडण्यात येत आहे.   गडकरींचं व्हिजन   या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच नितीन गडकरींनी आपलं व्हिजन मांडलं. यावेळी गडकरी म्हणाले, महाराष्ट्रासाठी वेगळ्या विदर्भाचा नव्हे, तर पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. काही बुद्धीवादी लोक वेगळ्या विदर्भाबाबत चर्चा करत आहेत, त्यांना चर्चा करु द्या. वाद घालण्यापेक्षा महाराष्ट्रातील प्रश्न सोडवण्याला प्राधान्य आहे"   याशिवाय " निवडणूक काळात टोल हद्दपार करण्याचं विधान मी केलं असलं, तरी चांगले रस्ते आणि सेवा हव्या असतील तर टोलला पर्याय नाही. सरकारकडे पैसे नाहीत, त्यामुळे टोलसारखे स्त्रोत बंद केले तर सुविधा मिळणं कठीण होईल" असंही गडकरींनी नमूद केलं.   तसंच महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस उत्तम काम करत आहेत. येत्या काळात महाराष्ट्र हे विकासात देशात अव्वलस्थानी असेल, असा विश्वास गडकरींनी व्यक्त केला.   जिथं-जिथं रस्त्यांचं काम सुरु आहे, त्याला लागून असलेल्या शेतांमध्ये शेततळे, नाल्यांचं रुंदीकरण अशी कामं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय स्वतःहून करुन देईल, असंही ते म्हणाले.   शेतकऱ्यांना स्वातंत्र्य द्या   महाराष्ट्रातील दुष्काळ आणि ऊस पीक याबाबत गडकरींना विचारण्यात आलं. यावर गडकरी म्हणाले, शेतकऱ्यांना बाजाराप्रमाणे उत्पादन घेण्याचं स्वातंत्र्य आवश्यक आहे. ज्या पिकाला दर मिळेल, ते पीक त्यांना घेऊ द्यावं. शेतीसाठी सिंचन आवश्यक आहे. पाण्याची बचत गरजेची आहे.   गडकरींच्या व्हिजनमधील महत्त्वाचे मुद्दे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत गावांना चांगल्या रस्त्यांनी जोडणार सरकारी खर्चातून 70 हजार कोटींची विमानं खरेदी करण्याची गरज नव्हती, जनतेला रस्ते, पाणी महत्त्वाचं होतं. मी महाराष्ट्राला 6 हजार कोटींचा निधी दिला - देशाच्या वाहतूक यंत्रणेत अमूलाग्र बदल आवश्यक - सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सुधारणा गरजेची, जलवाहतुकीला आमचं प्राधान्य उद्योगांचं विकेंद्रीकरण आवश्यक 5 वर्षात महाराष्ट्रात 3 लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात सेना-भाजपच्या वादाशी माझा संबंध नाही, माझे सर्व पक्षांशी उत्तम संबंध: महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस उत्तम काम करत आहेत शेतकऱ्याला पिकाचं स्वातंत्र्य द्या, ज्याला दर असेल, ते पीक शेतकऱ्यांना घ्यावं : शेतीसाठी सिंचन आवश्यक, पाण्याची बचत गरजेची : गडकरी यशवंतरावांनी महाराष्ट्राला संस्कारी राजकारण दिलं, ते देशात अन्य राज्यात पाहायला मिळत नाही विकासकामात राजकारण आणि राजकारणात शत्रूत्व आणू नये, ही यशवंतरावांपासूनची परंपरा महाराष्ट्राला साहित्य, संस्कार, वैचारिकतेची मोठी परंपरा मला वन डे खेळायला आवडतं, त्यामुळे जो शब्द दिला, तो शब्द 5 वर्षात झटपट पूर्ण करण्याचा प्रयत्न

महत्त्वाच्या बातम्या

Rupali Chakankar and Ashok Kharat: सोशल मीडियावर माझ्या 'त्या' AI व्हिडीओंना 43 मिलिनय व्ह्यूज, प्रतिमा मलीन झाली; रुपाली चाकणकरांनी कोर्टात काय-काय सांगितलं?
सोशल मीडियावर माझ्या 'त्या' AI व्हिडीओंना 43 मिलिनय व्ह्यूज, प्रतिमा मलीन झाली; रुपाली चाकणकरांनी कोर्टात काय-काय सांगितलं?
PM Narendra Modi Australia : मेलबर्नमधील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून 'ऑपरेशन सिंदूर'चा उल्लेख; म्हणाले, 'दहशतवादी तळांवरील स्फोटांचे जगभर पडसाद'
मेलबर्नमधील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून 'ऑपरेशन सिंदूर'चा उल्लेख; म्हणाले, 'दहशतवादी तळांवरील स्फोटांचे जगभर पडसाद'
Rajya Sabha Election : भाजपमध्ये प्रवेश करताच तृणमूल सोडलेल्या तिघांना राज्यसभेची उमेदवारी, एनडीए दोन तृतियांश बहुमताजवळ पोहोचणार
भाजपमध्ये प्रवेश करताच तृणमूल सोडलेल्या तिघांना राज्यसभेची उमेदवारी, एनडीए दोन तृतियांश बहुमताजवळ पोहोचणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार

व्हिडीओ

SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांच्यामुळं अवैध कामं करणाऱ्यांचे धाबे दणाणलेत, निवृत्त होईपर्यंत त्यांची बदली करु नका, शिवसेनेच्या आमदाराची इच्छा
तुकाराम मुंढे यांची निवृत्त होईपर्यंत त्यांची बदली करु नका, शिवसेनेच्या आमदाराची इच्छा, मंत्री झिरवाळांकडून अखेर शब्द घेतलाच
चंद्रपुरात भीषण अपघात, भात लावणीसाठी गेलेल्या शेतजमुरांचे वाहन पलटी; 4 ठार 27 जखमी, कुटुंबीयांचा आक्रोश
चंद्रपुरात भीषण अपघात, भात लावणीसाठी गेलेल्या शेतजमुरांचे वाहन पलटी; 4 ठार 27 जखमी, कुटुंबीयांचा आक्रोश
मग त्यालाच आमदार घोषित करून टाका; जितेंद्र आव्हाड विधानसभेत कडाडले, म्हणाले, पोलीस अधिकारी मला धमकावतो
मग त्यालाच आमदार घोषित करून टाका; जितेंद्र आव्हाड विधानसभेत कडाडले, म्हणाले, पोलीस अधिकारी मला धमकावतो
Bhaskar Jadhav: राज्यात 'ऑपरेशन टायगर-3'च्या चर्चा; भास्कर जाधवांनी एका शब्दात विषय संपवला, म्हणाले, 'याचा अर्थ टायगर इकडे, कुत्री तिकडे'
राज्यात 'ऑपरेशन टायगर-3'च्या चर्चा; भास्कर जाधवांनी एका शब्दात विषय संपवला, म्हणाले, 'याचा अर्थ टायगर इकडे, कुत्री तिकडे'
Ramesh Mhatre Dombivli: ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
Ramesh Mhatre Dombivli: रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
Shreyas Iyer Statement : प्रत्येक सामन्यानंतर नवं कारण... मालिकेतील पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर संतापला; गोलंदाजांच्या कामगिरीवर थेट बोट अन् नको नको ते बोलला
प्रत्येक सामन्यानंतर नवं कारण... मालिकेतील पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर संतापला; गोलंदाजांच्या कामगिरीवर थेट बोट अन् नको नको ते बोलला
Moshi Building Collapse: 'एखाद्या मंत्र्याचा मुलगा अडकला असता तर...'; मोशी दुर्घटनेतील नातेवाईकांचा सरकारवर थेट हल्ला, ढिसाळ कामामुळे संतापाचा उद्रेक
'एखाद्या मंत्र्याचा मुलगा अडकला असता तर...'; मोशी दुर्घटनेतील नातेवाईकांचा सरकारवर थेट हल्ला, ढिसाळ कामामुळे संतापाचा उद्रेक
Embed widget