मुस्लिम लोकांनी देशावर आक्रमण करणाऱ्यांवर आपली निष्ठा व्यक्त करु नये : सरसंघचालक मोहन भागवत
व्यवस्था चालवणाऱ्याच्या मनात भेदभाव नसेल तर खरा उद्देश सफल होतो असं प्रतिपादन सरसंघचालक (RSS) मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी केलं आहे.

नागपूर : मुस्लिम लोक आपला धर्म पाळू शकतात, पण त्यांनी बाहेरून देशावर आक्रमण करणाऱ्यांवर आपली निष्ठा व्यक्त करु नये. देशाच्या रक्षणासाठी हिंदूच्या खांद्याला खांदा लावून लढलेल्या अनेक मुस्लिम व्यक्तींची नावं घेतली जातात असं सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले. नागपुरात दसऱ्याच्या निमित्ताने आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
देशात चांगल्या वाईट घटना घडत असतात, त्यावर प्रतिक्रिया देताना प्रत्येकाने समाज तोडणारी नव्हे तर समाज जोडणारी भाषा करायला हवी. प्रत्येकाने मनात असलेली भेदभावाची भावना बदलली पाहिजे. व्यवस्था चालवणाऱ्याच्या मनात भेदभाव नसेल तर खरा उद्देश सफल होतो असं प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे.
सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, "देशाचं स्वातंत्र्य हे त्याग आणि बलिदानामुळे मिळालं. इतिहासात केलेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळली पाहिजे. देशात अनेक गोष्टींवरुन भेदभाव केला जात आहे. देशातील दोन राज्यांमध्ये गोळीबार केला जात आहे. त्यामुळे कुठेतरी हरवत चाललेली अखंडता परत मिळवण्यासाठी आणि रत त्या दुश्मनीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून मुलांनी इतिहास वाचला पाहिजे."
सरसंघचालक मोहन भागवत पुढे म्हणाले की, "कोरोनाकाळात मुलांकडे मोबाईल आला. पण त्याचा वापर कशासाठी केला जातोय हे कोणीही पाहत नाही. देशातील तरुण ड्रग्जच्या प्रसाराला बळी पडतात. त्यांच्यामध्ये व्यसनाधीनता वाढतेय, नवीन तंत्रज्ञानाचा अयोग्य वापर केला जातोय. त्यामुळे त्यावर नियंत्रण आणायला हवं."
स्वत:च्या भाषेचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. स्वभाषा, स्वभूषा आणि इतरही गोष्टींचे जाणिवपूर्वक वापर केला पाहिजे. 'स्व'चा विसर पडता कामा नये असंही सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.
सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, "देशाच्या सीमावर्ती जिल्ह्यातील मुस्लिम लोकसंख्या वाढणे आणि तिथल्या मुस्लिम जनसंख्येची सरासरी ही देशाच्या सरासरीपेक्षा खूप जास्त आहे. हे बांगलादेशमधून घुसखोरी होत असल्याचं दर्शवते. आपल्या देशात पुन्हा एकदा लोकसंख्या धोरणाचा पुनर्विचार व्हावा."
महत्वाच्या बातम्या :
- Dussehra 2021 : 'सोनं घ्या सोन्यासारखं राहा!'; जाणून घ्या दसऱ्या दिवशी का वाटली जातात आपट्याची पानं
- Dasara Melava : आज दसरा मेळावे... मुख्यमंत्री ठाकरे, पंकजा मुंडेंच्या भाषणाकडे राज्याचं लक्ष
- Unlock : दसरा मेळाव्याआधी सरकारकडून निर्बंध शिथिल, सभागृहातील कार्यक्रमासाठी 200 व्यक्तींची मर्यादा हटवली
Before You Go
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल





















