एक्स्प्लोर

Mohan Bhagwat : मंदिर, पाणी आणि स्मशानात भेदभाव नको, ते सर्वांसाठी खुले असावे: मोहन भागवत

Mohan Bhagwat Speech: संघ प्रमुख मोहन भागवत यांनी आत्मनिर्भरता (Self-Reliance), स्वदेशी (Swadeshi) आणि संविधान पालनावर भर दिला. सामाजिक समरसता, शेजाऱ्यांशी संवाद आणि विश्वगुरू भारताची संकल्पना मांडली.

नवी दिल्ली: संघाइतका इतर कोणत्याही स्वयंसेवी संघटनेला कडवा आणि तीव्र विरोध सहन करावा लागला नाही, मात्र शुद्ध आणि सात्विक प्रेम हाच संघाचा आधार आहे असं मत सरसंचलालक मोहन भागवत यांनी व्यक्ते केलं. मंदिर, पाणी आणि स्मशान हे सर्वासाठी खुलं असावं, त्यामध्ये भेदभाव नको असं आवाहन त्यांनी केलं. जगात अशांती आणि कट्टरतावाद वाढल्याचीही खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लादल्यानंतर सरसंघचालकांनी स्वदेशीचा मंत्र जपण्याचं आवाहन केलं. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त दिल्लीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी आत्मनिर्भरतेवर (Self-Reliance) भर दिला. आंतरराष्ट्रीय व्यापार (International Trade) हा स्वेच्छेने व्हायला हवा, दबावाखाली नव्हे असं मत त्यांनी मांडलं. जे आपल्या देशात तयार होते ते बाहेरून आणण्याची गरज नाही. जे इथे तयार होत नाही तेवढेच परदेशातून घ्या असं आवाहन त्यांनी केलं.

कुटुंब प्रबोधन आणि सामाजिक समरसता

मोहन भागवत यांनी सांगितले की नवीन पिढी व्यक्तिवादी (Individualistic) विचारसरणीकडे झुकत आहे, ज्यामुळे नातेसंबंध कमकुवत होत आहेत. त्याचे गंभीर दुष्परिणाम आपण पाहत आहोत. कुटुंब प्रबोधनावर (Family Awareness) भर देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. सामाजिक समरसतेवर (Social Harmony) बोलताना त्यांनी सांगितले की, मंदिर (Temple), पाणी (Water) आणि स्मशान (Cremation Ground) यामध्ये कोणताही भेदभाव असू नये. ते सर्वांसाठी खुले असले पाहिजेत.

स्वदेशी आणि आपली संस्कृती

आत्मनिर्भरतेवर बोलताना भागवत म्हणाले की, स्वदेशीचा (Swadeshi) अंगीकार करावा. घरात आपली भाषा (Language) आणि आपला पोशाख (Traditional Attire) असावा. मुलांना जर पॅरिस-सिंगापूर दाखवत असाल तर त्यांना कुंभलगड आणि झोपडपट्टीसुद्धा दाखवा, असे ते म्हणाले.

संविधान आणि कायद्याचे पालन

भागवत यांनी सांगितले की कोणत्याही परिस्थितीत संविधान (Constitution) आणि कायद्याचे (Law) पालन करायला हवे. "आपल्या श्रद्धेला कुणी गाली दिली तरी कायदा हातात घेऊ नका. पोलिसांकडे (Police) जा. आवश्यक असल्यास शांततेत आंदोलन करा, पण टायर जाळणे किंवा दगडफेक करू नका," असे त्यांनी आवाहन केले.

भारताचे ध्येय आणि विश्वगुरूची संकल्पना

भागवत म्हणाले, "आपण राहिलो किंवा नाही, भारत राहायलाच हवा. हा धर्म (Religion) जगाला देणारा दुसरा नाही. पण जगाला छडीने शिकवणे हा विश्वगुरू (Vishwaguru) पद नाही. विनम्रतेने आपल्या आचरणातून शिकवणे हेच खरे विश्वगुरू पद आहे."

आजचे संकट आणि उपाय

मोहन भागवत म्हणाले की, "आज जगभर कट्टरता (Extremism), असहिष्णुता आणि अस्थिरता वाढत आहे. वोकिजम (Wokeism) ही नवी प्रवृत्ती नवीन पिढीसाठी संकट बनली आहे. धर्म (Religion) सर्वत्र पोहोचायला हवा, मात्र त्याचा अर्थ धर्मांतर (Conversion) नव्हे. धर्म म्हणजे एक जीवनस्वभाव (Way of Life) आहे."

शेजाऱ्यांशी संवादाची गरज

भागवत म्हणाले की, भारताने नेहमीच संयम दाखवला आहे आणि ज्यांनी नुकसान केले त्यांनाही मदत केली आहे. शेजारी देशांशी (Neighbouring Countries) संवाद वाढवणे गरजेचे आहे. कारण बहुतांश शेजारी देश पूर्वी भारताचाच भाग होते. नद्या, जंगलं, संस्कृती सर्व एकच आहेत. नकाशावर फक्त रेषा आखल्या गेल्या आहेत. म्हणून एकमेकांना जवळ आणणे आणि प्रगतीसाठी भारताने पुढाकार घ्यायला हवा, असे ते म्हणाले.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Honey Trap : नेत्यांना 'हनी ट्रॅप'मध्ये फसवण्याचा डाव उघड, 'जैश ए मोहम्मद'च्या दहशतवाद्याची गर्लफ्रेंड अर्पिता सरकारला अटक
नेत्यांना 'हनी ट्रॅप'मध्ये फसवण्याचा डाव उघड, 'जैश ए मोहम्मद'च्या दहशतवाद्याची गर्लफ्रेंड अर्पिता सरकारला अटक
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Amit Shah On Ajit Doval Pune: अमित शाहांकडून अजित डोवाल यांचं तोंडभरून कौतुक, पंतप्रधान मोदींनी दिलेला महत्वाचा सल्ला आणि पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला
अमित शाहांकडून अजित डोवाल यांचं तोंडभरून कौतुक, पंतप्रधान मोदींनी दिलेला महत्वाचा सल्ला आणि पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget