एक्स्प्लोर

Mohan Bhagwat : मंदिर, पाणी आणि स्मशानात भेदभाव नको, ते सर्वांसाठी खुले असावे: मोहन भागवत

Mohan Bhagwat Speech: संघ प्रमुख मोहन भागवत यांनी आत्मनिर्भरता (Self-Reliance), स्वदेशी (Swadeshi) आणि संविधान पालनावर भर दिला. सामाजिक समरसता, शेजाऱ्यांशी संवाद आणि विश्वगुरू भारताची संकल्पना मांडली.

नवी दिल्ली: संघाइतका इतर कोणत्याही स्वयंसेवी संघटनेला कडवा आणि तीव्र विरोध सहन करावा लागला नाही, मात्र शुद्ध आणि सात्विक प्रेम हाच संघाचा आधार आहे असं मत सरसंचलालक मोहन भागवत यांनी व्यक्ते केलं. मंदिर, पाणी आणि स्मशान हे सर्वासाठी खुलं असावं, त्यामध्ये भेदभाव नको असं आवाहन त्यांनी केलं. जगात अशांती आणि कट्टरतावाद वाढल्याचीही खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लादल्यानंतर सरसंघचालकांनी स्वदेशीचा मंत्र जपण्याचं आवाहन केलं. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त दिल्लीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी आत्मनिर्भरतेवर (Self-Reliance) भर दिला. आंतरराष्ट्रीय व्यापार (International Trade) हा स्वेच्छेने व्हायला हवा, दबावाखाली नव्हे असं मत त्यांनी मांडलं. जे आपल्या देशात तयार होते ते बाहेरून आणण्याची गरज नाही. जे इथे तयार होत नाही तेवढेच परदेशातून घ्या असं आवाहन त्यांनी केलं.

कुटुंब प्रबोधन आणि सामाजिक समरसता

मोहन भागवत यांनी सांगितले की नवीन पिढी व्यक्तिवादी (Individualistic) विचारसरणीकडे झुकत आहे, ज्यामुळे नातेसंबंध कमकुवत होत आहेत. त्याचे गंभीर दुष्परिणाम आपण पाहत आहोत. कुटुंब प्रबोधनावर (Family Awareness) भर देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. सामाजिक समरसतेवर (Social Harmony) बोलताना त्यांनी सांगितले की, मंदिर (Temple), पाणी (Water) आणि स्मशान (Cremation Ground) यामध्ये कोणताही भेदभाव असू नये. ते सर्वांसाठी खुले असले पाहिजेत.

स्वदेशी आणि आपली संस्कृती

आत्मनिर्भरतेवर बोलताना भागवत म्हणाले की, स्वदेशीचा (Swadeshi) अंगीकार करावा. घरात आपली भाषा (Language) आणि आपला पोशाख (Traditional Attire) असावा. मुलांना जर पॅरिस-सिंगापूर दाखवत असाल तर त्यांना कुंभलगड आणि झोपडपट्टीसुद्धा दाखवा, असे ते म्हणाले.

संविधान आणि कायद्याचे पालन

भागवत यांनी सांगितले की कोणत्याही परिस्थितीत संविधान (Constitution) आणि कायद्याचे (Law) पालन करायला हवे. "आपल्या श्रद्धेला कुणी गाली दिली तरी कायदा हातात घेऊ नका. पोलिसांकडे (Police) जा. आवश्यक असल्यास शांततेत आंदोलन करा, पण टायर जाळणे किंवा दगडफेक करू नका," असे त्यांनी आवाहन केले.

भारताचे ध्येय आणि विश्वगुरूची संकल्पना

भागवत म्हणाले, "आपण राहिलो किंवा नाही, भारत राहायलाच हवा. हा धर्म (Religion) जगाला देणारा दुसरा नाही. पण जगाला छडीने शिकवणे हा विश्वगुरू (Vishwaguru) पद नाही. विनम्रतेने आपल्या आचरणातून शिकवणे हेच खरे विश्वगुरू पद आहे."

आजचे संकट आणि उपाय

मोहन भागवत म्हणाले की, "आज जगभर कट्टरता (Extremism), असहिष्णुता आणि अस्थिरता वाढत आहे. वोकिजम (Wokeism) ही नवी प्रवृत्ती नवीन पिढीसाठी संकट बनली आहे. धर्म (Religion) सर्वत्र पोहोचायला हवा, मात्र त्याचा अर्थ धर्मांतर (Conversion) नव्हे. धर्म म्हणजे एक जीवनस्वभाव (Way of Life) आहे."

शेजाऱ्यांशी संवादाची गरज

भागवत म्हणाले की, भारताने नेहमीच संयम दाखवला आहे आणि ज्यांनी नुकसान केले त्यांनाही मदत केली आहे. शेजारी देशांशी (Neighbouring Countries) संवाद वाढवणे गरजेचे आहे. कारण बहुतांश शेजारी देश पूर्वी भारताचाच भाग होते. नद्या, जंगलं, संस्कृती सर्व एकच आहेत. नकाशावर फक्त रेषा आखल्या गेल्या आहेत. म्हणून एकमेकांना जवळ आणणे आणि प्रगतीसाठी भारताने पुढाकार घ्यायला हवा, असे ते म्हणाले.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Thackeray brothers BMC Election Results 2026: राज-उद्धव ठाकरेंचा बाळासाहेबांसोबतचा फोटो, डोळ्यांच्या कडा पाणावणारे शब्द, ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर अंबादास दानवेंची पोस्ट व्हायरल
राज-उद्धव ठाकरेंचा बाळासाहेबांसोबतचा फोटो, डोळ्यांच्या कडा पाणावणारे शब्द, ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर अंबादास दानवेंची पोस्ट व्हायरल
सोलापुरात काँग्रेस शहराध्यक्षांचा केवळ 251 मतांनी विजय; भाजप आमदाराचे भाऊजी, सर्वाधिक 14 हजार मताधिक्यांनी विजयी
सोलापुरात काँग्रेस शहराध्यक्षांचा केवळ 251 मतांनी विजय; भाजप आमदाराचे भाऊजी, सर्वाधिक 14 हजार मताधिक्यांनी विजयी
Maharashtra Goverment Cabinet Decision: राज्यातील 29 महापालिकांचा निकाल लागताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 मोठे निर्णय; मुंबईकरांना दिलासा
राज्यातील 29 महापालिकांचा निकाल लागताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 मोठे निर्णय; मुंबईकरांना दिलासा
Eknath Shinde Municipal Corporation Election Result 2026 : जिथे भाजपची साथ सोडली, तिथे तिथे एकनाथ शिंदेंना फटका, नवी मुंबईतही टांगा पलटी, कुठे कुठे अपयश हाती?
जिथे भाजपची साथ सोडली, तिथे तिथे एकनाथ शिंदेंना फटका, नवी मुंबईतही टांगा पलटी, कुठे कुठे अपयश हाती?

व्हिडीओ

Special Report Asaduddin Owaisi 29 पैकी 13 महापालिकांत MIM ची बाजी,ओवैसींचे फासे, एमआयएमचे सव्वाशे
Ganesh Naik Navi Mumbai : नवी मुंबईत भाजपच्या विजयानंतर गणेश नाईक यांची प्रतिक्रिया
Special Report Vasai Virar Malegaon स्थानिक पक्ष सत्तेत; भाजपची चांगली कामगिरी, पण सत्तेपासून दूरच
Santosh Dhuri on Thackeray BMC Election : मनसेची चेष्टा,एकत्र येऊनही 6 जागा जिंकल्या; आता ठाकरे....
Special Report BJP Won Mahapalika : राज्यात अनेक महापालिकांमध्ये भाजपच्या विजयाचं 'कमळ' फुललं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thackeray brothers BMC Election Results 2026: राज-उद्धव ठाकरेंचा बाळासाहेबांसोबतचा फोटो, डोळ्यांच्या कडा पाणावणारे शब्द, ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर अंबादास दानवेंची पोस्ट व्हायरल
राज-उद्धव ठाकरेंचा बाळासाहेबांसोबतचा फोटो, डोळ्यांच्या कडा पाणावणारे शब्द, ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर अंबादास दानवेंची पोस्ट व्हायरल
सोलापुरात काँग्रेस शहराध्यक्षांचा केवळ 251 मतांनी विजय; भाजप आमदाराचे भाऊजी, सर्वाधिक 14 हजार मताधिक्यांनी विजयी
सोलापुरात काँग्रेस शहराध्यक्षांचा केवळ 251 मतांनी विजय; भाजप आमदाराचे भाऊजी, सर्वाधिक 14 हजार मताधिक्यांनी विजयी
Maharashtra Goverment Cabinet Decision: राज्यातील 29 महापालिकांचा निकाल लागताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 मोठे निर्णय; मुंबईकरांना दिलासा
राज्यातील 29 महापालिकांचा निकाल लागताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 मोठे निर्णय; मुंबईकरांना दिलासा
Eknath Shinde Municipal Corporation Election Result 2026 : जिथे भाजपची साथ सोडली, तिथे तिथे एकनाथ शिंदेंना फटका, नवी मुंबईतही टांगा पलटी, कुठे कुठे अपयश हाती?
जिथे भाजपची साथ सोडली, तिथे तिथे एकनाथ शिंदेंना फटका, नवी मुंबईतही टांगा पलटी, कुठे कुठे अपयश हाती?
Eknath Shinde BMC Election Result 2026: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीतील एकनाथ शिंदेच्या पराभवाची 8 मोठी कारणं; नेमकं काय घडलं?
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीतील एकनाथ शिंदेच्या पराभवाची 8 मोठी कारणं; नेमकं काय घडलं?
Eknath Shinde BMC Election Result 2026: BMC च्या सत्तास्थापनेपर्यंत शिवसेनेचं 'हॉटेल पॉलिटीक्स'; निकाल लागताच नेमकं काय घडलं?
BMC च्या सत्तास्थापनेपर्यंत शिवसेनेचं 'हॉटेल पॉलिटीक्स'; निकाल लागताच नेमकं काय घडलं?
Maharashtra Municipal Corporation Election Result 2026: मुंबईत भाजप नंबर 1, ठाकरे गट दुसऱ्या क्रमांकावर; अजितदादांपेक्षा राज ठाकरेंचा जास्त स्ट्राईक रेट, महाराष्ट्रात कोण टॉपवर?
मुंबईत भाजप नंबर 1, ठाकरे गट दुसऱ्या क्रमांकावर; अजितदादांपेक्षा राज ठाकरेंचा जास्त स्ट्राईक रेट, महाराष्ट्रात कोण टॉपवर?
BMC Election Results 2026: राज्यातील 27 महापालिका जिंकू म्हणणारी भाजप फक्त 9 ठिकाणी स्वबळावर, बेडूक कितीही फुगला तरी...; सुषमा अंधारेंनी 'गावठी चाणक्य' म्हणत हिणवलं
राज्यातील 27 महापालिका जिंकू म्हणणारी भाजप फक्त 9 ठिकाणी स्वबळावर, बेडूक कितीही फुगला तरी...; सुषमा अंधारेंनी 'गावठी चाणक्य' म्हणत हिणवलं
Embed widget