एक्स्प्लोर

Tandoor Roti : 'या' शहरात तंदूर रोटीवर बंदी; आदेशाचे उल्लंघन केल्यास 5 लाखांचा दंड, जाणून घ्या नेमकं कारण

Tandoor Roti : मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये तंदूर भट्टी बंद करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल मालकास पाच लाखांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.

Tandoor Roti : हॉटेलमध्ये गेल्यानंतर तंदूर रोटीशिवाय (Tandoor Roti) जेवण अपूर्ण वाटतं. मात्र, भारतातील एका शहरात तंदूर रोटीवर बंदी (Ban On Tandoor Roti) घालण्यात आली आहे. तंदूर रोटी तयार केल्यास दंड ठोठावण्यात येणार असल्याचा आदेश प्रशासनाने काढला आहे. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) जबलपूर (Jabalpur) शहरात तंदूर रोटीवर बंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने भट्टीवर (Tandoor Bhatti) तंदुरी रोटी बनविण्यास बंदी घातली आहे. 

तंदुरी रोटी बनवल्याने प्रदूषण अधिक पसरते, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. हा आदेश येताच हॉटेल मालकांमध्ये खळबळ उडाली आहे. एवढेच नाही तर तंदुरी रोटी खाणाऱ्या ग्राहकांनाही मोठा धक्का बसला आहे. प्रशासनाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या हॉटेलमालकांवर लाखो रुपयांचा दंडही होऊ शकतो. त्यामुळे हॉटेल मालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. 

जबलपूर जिल्ह्यातील अन्न सुरक्षा विभागाने शहरातील 50 हॉटेल मालकांना नोटिसा बजावल्या आहेत. यामध्ये हॉटेल मालकांना लाकूड आणि कोळशाचा वापर होणाऱ्या तंदूर भट्टी वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. इलेक्ट्रिक किंवा एलपीजी वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

पाच लाखांचा दंड

तंदूरमधील कोळसा आणि लाकडाच्या धुरामुळे प्रदूषण पसरत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. तंदूर रोट्यांमध्येही कार्बनचे प्रमाण अधिक असते. ते आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्यामुळे तंदूरऐवजी आता इलेक्ट्रिक किंवा एलपीजी गॅस शेगडीचा वापर करण्याची सूचना प्रशासनाने दिली आहे. प्रशासनाच्या आदेशावर हॉटेल मालकांनी नाराजी व्यक्त केली. प्रशासनाचा हा आदेश व्यावहारिक वाटत नसल्याचे हॉटेल मालकांचे म्हणणे आहे. इलेक्ट्रिक आणि एलपीजी स्टोव्हमध्ये तंदूरसारख्या रोट्यांची चव चांगली नसते असे त्यांचे म्हणणे आहे.

ओव्हनचा वापर महाग

प्रशासनाने हॉटेल मालकांना तीन दिवसांची मुदत दिली आहे. इलेक्ट्रिक ओव्हन किंवा एलपीजी वापरल्यास तंदुरी रोटी महाग होईल, असे हॉटेल मालकांचे म्हणणे आहे. तंदूर बंद करण्यासाठी प्रशासनाने अन्न विभागाच्या अधिकाऱ्यांसह प्रदूषण नियंत्रण पथके तैनात केली आहेत. प्रदूषण रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असल्याचे प्रशासनाने म्हटले असले तरी त्यावरून आता हॉटेल चालक-मालकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. प्रदूषणाला रोखण्यासाठी इतरदेखील काही पर्याय असू शकतात,  असा सूरही उमटत आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi on CJP Protest Delhi Jantar Mantar: काँकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, NEET पेपरफुटी प्रकरणावर महत्वाचे आदेश
काँकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, NEET पेपरफुटी प्रकरणावर महत्वाचे आदेश
Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Divija Fadnavis on CJP Protest Delhi Jantar Mantar: काँकरोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरील आंदोलनावर दिविजा फडणवीस यांनी रोखठोक मत मांडलं; काय काय म्हणाल्या?
काँकरोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरील आंदोलनावर दिविजा फडणवीस यांनी रोखठोक मत मांडलं; काय काय म्हणाल्या?
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget