एक्स्प्लोर

Kerala Train Fire Case: शाहरुख सैफीला रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर अटक, केरळच्या कोळीकोडमध्ये ट्रेनमधील तीन प्रवाशांना जाळल्याचा आरोप

Kozhikode Train Fire Arrest: आरोपी शाहरुख सैफीला  मूळचा नोएडा येथील राहणारा आहे. अलप्पुळा-कन्नूर एक्स्प्रेसमध्ये प्रवास करताना आरोपी शाहरुखनं पेट्रोल ओतून डबा पेटवून दिला. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला.

रत्नागिरी:  केरळच्या (Keral)  कोळीकोडमध्ये ट्रेनमधील तीन प्रवाशांना जाळल्याचा ( Kozhikode Train Fire Arrest)  प्रकार गेल्या रविवारी घडला. यामधील आरोपी शाहरुख सैफीला रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर अटक करण्यात आली. केरळ एटीएस आणि रत्नागिरी पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली. 

आरोपी शाहरुख सैफीला  मूळचा नोएडा येथील राहणारा आहे. अलप्पुळा-कन्नूर एक्स्प्रेसमध्ये प्रवास करताना आरोपी शाहरुखनं पेट्रोल ओतून डबा पेटवून दिला. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला. ज्यामध्ये एका दोन वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. तीन दिवसांपासून केरळ एटीएस आरोपीचा शोध घेत होते. त्याच्या मोबाईल लोकेशनवरून तो रत्नागिरीमध्ये असल्याचं कळलं. केरळ एटीएसनं रत्नागिरी पोलिसांना कळवलं आणि मग शाहरुखला अटक करण्यात आली. केरळ पोलिसांचं पथक आरोपीला ताब्यात घेण्यासाठी रत्नागिरीत दाखल झाली आहे. 

तपासात सहकार्य करत नाही

आरोपी शाहरुख तपासात सहकार्य करत नाही किंवा स्थानिक पोलिस, एटीएस किंवा केरळ पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत नाही.  आता त्याला केरळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, त्याचा ट्रान्झिट रिमांड घ्यायचा की नाही याचा निर्णय ते घेणार आहेत.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळ पोलिसांनी 24 तासांत स्थानिक न्यायालयात पोहोचण्याची त्यांची योजना असल्याचे सांगितले आहे

कशी झाली अटक?

आरोपी शाहरुख सैफीला तो गंभीर जखमी झाला आहे.  दुसऱ्या ट्रेनमध्ये प्रवास करत असताना खेड येथे ट्रेन मधून उडी मारून तो जखमी झाला. त्यानंतर काही लोकांना तो जखमी अवस्थेत सापडला. त्यानंतर कॉल करून रुग्णवाहिका बोलवण्यात आली. तयाला रत्नागिरी येथील स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले.   तो या प्रकरणातील संशयित असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांना  कळताच त्यांनी त्याला अटक करण्याची योजना आखली.

काय आहे प्रकरण?

अलप्पुझा-कन्नूर एक्झिक्युटिव्ह एक्स्प्रेस कोरापुझा रेल्वे पुलावर पोहचलेली असताना 2 एप्रिलला रात्री सुमारे 9.50  वाजता ट्रेनमध्ये चढण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर आरोपी शाहरुख सैफी याने इतर प्रवाशांवर पेट्रोल ओतून त्यांना पेटवून दिले. यामुळे प्रवाशांनी साखळी ओढत ट्रेन थांबवली. ट्रेन थांबताच आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर प्रवाशांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. या घटनेत एका मुलासह तीन जणांचा मृत्यू झाला. तसेच आठ जण जखमी झाले आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या :

Vande Bharat Express : दक्षिण भारताला मोदी सरकारची आणखी एक भेट, सिकंदराबाद-तिरुपती वंदे भारत एक्सप्रेस होणार सुरु

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Kishor : भाजपच्या 'चाणक्या'सह राष्ट्रीय अध्यक्षांना धोबीपछाड, बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर यांच्या विजयाची पाच कारणे
भाजपच्या 'चाणक्या'सह राष्ट्रीय अध्यक्षांना धोबीपछाड, बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर यांच्या विजयाची पाच कारणे
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
Embed widget