एक्स्प्लोर

India Pakistan War: भारताचं पुढचं टार्गेट अणुबॉम्बचा साठा... पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांना सुगावा लागताच अमेरिकेतून तातडीने चक्रं फिरली, वाचा इनसाईड स्टोरी

India Pakistan War: युद्धाच्या खुमखुमीची जागा भीतीने घेतली, भारताच्या पुढच्या टार्गेटचा सुगावा लागला अन् पाकिस्तानने लगेच अमेरिकेला मध्यस्थी करायला लावली

India Pakistan ceasefire: पाकिस्तानने लष्करी तळांवर मारा करण्यासाठी हवेत सोडलेले ड्रोन्स, हवेत डागलेली क्षेपणास्त्रं आणि लढाऊ विमानांचा हल्ला परतावून लावत तितक्याच जोराने प्रतिहल्ला करुन भारताने पाकिस्तानला सळो की पळो करुन सोडले होते. तब्बल चार दिवस भारत आणि पाकिस्तानी सैन्याकडून (Pakistan Army) एकमेकांवर  हवाई हल्ले सुरु होते. मात्र, शनिवारी संध्याकाळी अमेरिकेच्या (America) मध्यस्थीमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाली. यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे 'आम्ही युद्ध जिंकल्याच्या' फुशारक्या मारत असले तरी प्रत्यक्षात पडद्यामागे वेगळ्याच घडामोडी घडल्याची माहिती आता समोर आली आहे. प्रत्यक्षात पाकिस्तानला भारत आता काहीतरी भयंकर करेल, अशी भीती वाटायला लागली होती. त्यामुळे पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रसंघाकडे धाव घेतली. त्यानंतर अमेरिकेने भारत (Indian Army) आणि पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी करुन चर्चेला सुरुवात केली. अखेर शनिवारी संध्याकाळी भारत आणि पाकिस्तानी सैन्याच्या महासंचालकांनी हॉटलाईनवरुन एकमेकांशी चर्चा करुन शस्त्रसंधीचा निर्णय घेतला. (India Pakistan War 2025)

या सगळ्यानंतर युद्धाची प्रचंड खुमखुमी असलेला पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी इतक्या लवकर कसा राजी झाला, हा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला होता. सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, 10 मे रोजी सकाळी भारतीय वायूदलाने पाकिस्तानमधील प्रमुख लष्करी हवाई तळांवर हल्ला केला होता. यासाठी ब्राह्मोस क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला होता. रावळपिंडीजवळच्या चकलाला आणि सरगोधा या दोन तळांवर भारतीय वायूदलाने ब्राह्मोस क्षेपणास्त्रांचा मारा केला होता. यामध्ये दोन्ही हवाई तळांचे मोठे नुकसान झाले होते. या दोन्ही हवाई तळांवरील धावपट्ट्या नष्ट झाल्या होत्या. चकलाला आणि सरगोधा हवाई तळांवर पाकिस्तानी सैन्यासाठीचा दारुगोळा आणि लढाऊ विमानांसाठीची विशेष प्रणाली आहे. याशिवाय भारतीय वायूदलाने काल जैकोबाबाद, भोलारी आणि स्कार्दू याठिकाणीही हल्ला केला होता. 

भारताच्या या हल्ल्यानंतर पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या नेटवर्कमध्ये अचानक एक बातमी फिरायला लागली. त्यानुसार भारताकडून पाकिस्तानचे अणवस्त्र केंद्र आणि या सगळ्याचे नियंत्रण करणाऱ्या यंत्रणेला लक्ष्य करण्याची तयारी सुरु असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे पाकिस्तानच्या गोटात प्रचंड घबराट पसरली होती. त्यामुळे भारताने हल्ला करण्यापूर्वीच पाकिस्तानने अमेरिकेशी संपर्क साधला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव टोकाला गेल्याने अणवस्त्रांचा वापर केला जाऊ शकतो, याची भीती अमेरिकेला होती. त्यामुळे अमेरिका सातत्याने या दोन्ही देशांच्या संपर्कात होती. भारत पुढच्या टप्प्यात पाकिस्तानच्या अणवस्त्रांना लक्ष्य करु शकतो, हे कळाल्यानंतर अमेरिकेने वेगाने हालचाली करत भारताची समजूत काढली.

आणखी वाचा

अमेरिकेने भारत अन् पाकिस्तानमध्ये समझोता कसा घडवून आणला? मोदी अन् शरीफ यांना कॉन्फरन्स कॉलवर घेतलं, 48 तासांत काय घडलं?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

देशात NEET घोटाळा, CBSEचा तमाशा सुरु असतानाच दिल्लीतील स्कूल ऑफ प्लॅनिंगच्या इमारतीत आगीचा भडका; कार्यालयातील आग संशयास्पद असल्याचा काँग्रेसचा आरोप
देशात NEET घोटाळा, CBSEचा तमाशा सुरु असतानाच दिल्लीतील स्कूल ऑफ प्लॅनिंगच्या इमारतीत आगीचा भडका; कार्यालयातील आग संशयास्पद असल्याचा काँग्रेसचा आरोप
West Bengal Cabinet Expansion: पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं

व्हिडीओ

Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला
Pune NCP Vidhan Parishad : पुण्यात अर्ज भरताना गोंधळ, एकाच पक्षातून 2 अर्ज भरण्यासाठी गडबड
Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?
Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live: तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
Vaibhav Sooryavanshi: आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाचे पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाच्या पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
West Bengal Cabinet Expansion: पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
Embed widget