एक्स्प्लोर

Tawang Border Clash: 'एलएसीवरील परिस्थिती भारताच्या नियंत्रणात', तवांग चकमकीवर ईस्टर्न कमांडच्या प्रमुखांची पहिली प्रतिक्रिया

India China Border Clash: तवांगमध्ये भारत-चीन सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीवर ईस्टर्न कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल आरपी कलिता (RP Kalita) यांनी आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

India China Border Clash: तवांगमध्ये भारत-चीन सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीवर ईस्टर्न कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल आरपी कलिता (RP Kalita) यांनी आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी शुक्रवारी (16 डिसेंबर) सांगितले की, पीएलएने (PLA)  (LAC) एलएसी ओलांडली, परिणामी याविरोधात दोन्ही बाजूंचे सैनिक जखमी झाले. या प्रश्न स्थानिक पातळीवर सोडवला गेला आहे. यासंदर्भात बुमला येथे फ्लॅग मिटिंग झाली, आता परिस्थिती नियंत्रणात आहे.

ईस्टर्न कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल आरपी कलिता पुढे म्हणाले की, लष्करी जवान या नात्याने आपण आपल्या देशाचे रक्षण करण्यास सदैव तयार असतो. शांतता असो वा संघर्ष, बाह्य किंवा अंतर्गत धोक्यांपासून देशाची प्रादेशिक अखंडता सुनिश्चित करणे, हे प्राथमिक कार्य आहे. आम्ही सर्व परिस्थिती आणि आपत्कालीन परिस्थितींसाठी तयार आहोत. लेफ्टनंट जनरल आरपी कलिता कोलकाता येथे विजय दिवसाच्या 51 व्या वर्धापन दिनानिमित्त पुष्पहार अर्पण समारंभात माध्यमांशी बोलत होते.

या घटनेबाबतच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन लेफ्टनंट जनरल आरपी कलिता केले आहे. ते म्हणाले की, मला सांगायला आनंद होत आहे की, स्थानिक पातळीवर त्याचे नियंत्रण आहे. दोन्ही बाजूंच्या जवानांना किरकोळ दुखापत झाली असली तरी, मी तुम्हालाही विनंती करू इच्छितो की कोणत्याही प्रकारच्या अफवांकडे लक्ष देऊ नका. मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की, उत्तरेकडील सीमेवरील सीमावर्ती भागात आमचे नियंत्रण आहे.

दोन्ही देशांच्या  सैन्यांमध्ये झाली होती झडप 

9 डिसेंबर रोजी अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमधील यांगत्से येथे चीन आणि भारताचे सैनिक आमनेसामने आले होते. दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झालेल्या या चकमकीत अनेक जवान जखमी झाले. जखमी जवानांपैकी बहुतांश चीनचे होते. यानंतर दोन्ही लष्कराच्या कमांडर्सनी फ्लॅग मिटिंग घेऊन परिस्थिती हाताळली. त्यानंतर दोन्ही देशांचे सैनिक मागे हटले.

भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी संसदेत सांगितले की, चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे उल्लंघन करून अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमधील यांगत्से सेक्टरमध्ये एकतर्फी स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. भारतीय लष्करी कमांडर्सनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे चिनी सैन्य आपल्या सिमेत परतले. राजनाथ सिंह म्हणाले की, आपले सैन्य आपल्या प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे आणि त्यावरील कोणताही प्रयत्न हाणून पाडत राहील.

महत्त्वाच्या बातम्या

UCC : जर राम एकच लग्न करणार तर रहीम दोन-चार लग्न करणार का? दुसरं लग्न करणाऱ्याला राज्यात राहू दिलं जाणार नाही; भाजपच्या मुख्यमंत्र्यांचं खळबळजनक वक्तव्य
जर राम एकच लग्न करणार तर रहीम दोन-चार लग्न करणार का? दुसरं लग्न करणाऱ्याला राज्यात राहू दिलं जाणार नाही; भाजपच्या मुख्यमंत्र्यांचं खळबळजनक वक्तव्य
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
Monsoon Session 2026 : काय आहे 'मिशन 360'? बजेट सत्रानंतर कसं बदललं संसदेचं गणित? मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पास होणार का?
काय आहे 'मिशन 360'? बजेट सत्रानंतर कसं बदललं संसदेचं गणित? मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पास होणार का?

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget