एक्स्प्लोर

हिमाचल दुर्घटना: किन्नौरमध्ये भूस्खलनानंतर आणखी चार मृतदेह मिळाले, मृत्यूचा आकडा 14 वर; अजूनही अनेक बेपत्ता

स्थानिक पोलीस, होमगार्ड, नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (NDRF), इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस (ITBP) चे सदस्य संयुक्तपणे बचाव कार्य करत आहेत. आतापर्यंत 14 जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे.

किन्नौर : हिमाचल प्रदेशच्या किन्नौर जिल्ह्यात दरड कोसळून झालेल्या अपघातात बस आणि इतर वाहने सापडली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. आज आणखी चार मृतदेह सापडले असून मृतांचा आकडा 14 वर गेला आहे. त्याचबरोबर अनेक लोक अजूनही बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.

हिमाचल परिवहनची बस अपघातग्रस्त 
किन्नौरचे उपायुक्त आबिद हुसेन सादिक यांनी सांगितले की, बचावकार्य सुरू केल्यानंतर आणखी चार मृतदेह भूस्खलनाच्या ठिकाणावरून बाहेर काढण्यात आले आहेत. आतापर्यंत 14 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. राज्य आपत्ती व्यवस्थापन संचालक सुदेश कुमार मोक्ताने सांगितले की, काही वाहनांसह हिमाचल रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनची (एचआरटीसी) बसही ढिगाऱ्याखाली दबली गेली आहे. बस अत्यंत खराब अवस्थेत सापडली तर 'बोलरो' वाहन अजूनही ढिगाऱ्याखाली दबलेले आहे.

हिमाचल रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनची (एचआरटीसी) बस, जो रेकाँग पीओहून हरिद्वारमार्गे शिमलाकडे जात होती, बुधवारी दुपारी निचर तहसीलच्या निगुलसरी भागातील चौरा गावाजवळ डोंगरावरून खाली पडलेल्या खडकांवर आदळली होती. ज्या ठिकाणी बसचे नुकसान झाले त्या ठिकाणी उपस्थित बचावकर्त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात बचाव करणाऱ्यांपैकी एकाने असे म्हटले आहे की बस इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस (ITBP) च्या 17 व्या बटालियनच्या जवानांनी शोधली आहे.

निचर तहसीलच्या निगुलसरी भागातील चौरा गावाजवळ राष्ट्रीय राजमार्ग पाचवर बुधवारी दुपारी दरड कोसळत असताना रेकाँग पीओहून हरिद्वारमार्गे शिमलाकडे जाणारी हिमाचल रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनची (एचआरटीसी) बस यात सापडली. ज्या ठिकाणी बसचा अपघात झाला त्या ठिकाणी उपस्थित बचावकर्त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात बचाव करणाऱ्यांपैकी एकाने असे म्हटले आहे की बस इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस (ITBP) च्या 17 व्या बटालियनच्या जवानांनी शोधली आहे.

एनडीआरएफ-आयटीबीपीचे जवानांचे बचावकार्य
दुसरा बचावकर्ता म्हणतो की ऑपरेशन पुढे नेण्यासाठी हातमोजे आणले पाहिजेत. राज्य आपत्ती व्यवस्थापन संचालक सुदेश कुमार मोक्ता यांनी सांगितले की, गुरुवारी सकाळी 6 वाजता बचाव कार्य पुन्हा सुरू करण्यात आले. स्थानिक पोलीस, होमगार्ड, नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (NDRF), इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस (ITBP) चे सदस्य संयुक्तपणे बचाव कार्य करत आहेत. अधिकाऱ्यांनी बुधवारी रात्री दहाच्या सुमारास शोधमोहीम स्थगित केली होती.

बुधवारी 10 मृतदेह सापडले आणि 13 जखमींची सुटका करण्यात आली, तर इतर अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. भावनगरच्या थानाप्रभारीने बुधवारी सांगितले होते की सुमारे 25 ते 30 लोक ढिगाऱ्याखाली दबले गेले आहेत. प्राथमिक माहिती समोर आल्यानंतर, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी राज्य विधानसभेत सांगितले होते की, ढिगाऱ्याखाली 50-60 लोक अडकल्याची भीती आहे. परंतु, नेमकी संख्या कळू शकली नाही.

टाटा सुमोमध्ये 8 लोक मृत आढळले
किन्नौरचे उपायुक्त म्हणाले की, बसमध्ये 40 पेक्षा जास्त प्रवासी होते. बुधवारी बचाव मोहिमेदरम्यान एक टाटा सुमोही सापडली, ज्यात आठ लोक मृत आढळले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दगड कोसळल्याने ट्रक नदीच्या काठावरून खाली गेला आणि त्याच्या चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. एक पूर्णपणे खराब झालेली अल्टो कारही जप्त करण्यात आली, पण त्यामध्ये कोणीही नव्हते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget