एक्स्प्लोर

Government of Haryana : स्थानिकांना खासगी क्षेत्रामध्ये 75 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय रद्द, हरियाणा सरकारला न्यायालयाचा दणका

हरियाणा सरकारला पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. हरियाणा सरकारने नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना 75 टक्के आरक्षण देण्याचा घेतलेला निर्णय न्यायालयाने रद्द केला आहे.

Government of Haryana :  हरियाणा सरकारने नोकऱ्यांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना खासगी क्षेत्रात 75 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय केला होता. हा निर्णय पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. खासगी क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी या नियमाला आव्हान दिलं होतं. त्यामुळे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने हरियाणा सरकारला चंगलाच दणका दिला आहे. दरम्यान, नुकताच सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने एक अहवाल जाहीर केला आहे. या अहवालात देशातील बेरोजगारीच्या दराची माहिती दिली आहे. यामध्ये सर्वात जास्त बेरोजगारीचा दर  
हा हरियाणामध्ये असल्याचे समोर आले आहे. 

न्यायमूर्ती अजय तिवारी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. स्थानिक भूमिपुत्रांना खासगी क्षेत्रामध्ये 75 टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाविरोधात अनेक याचिका दाखल झाल्या होत्या. अखेर पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने सरकारचा निर्णय रद्द केला आहे.  हरियाणा सरकारने यापूर्वी हरियाणा राज्य रोजगार स्थानिक उमेदवार कायदा, 2020 अधिसूचित केला होता. ज्याआधारे 15 जानेवारी 2022 पासून 30,000 रुपयांपेक्षा कमी मासिक पगार देणार्‍या खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये स्थानिक तरुणांसाठी 75 टक्के आरक्षण देण्यात आले होते.  या कायद्यामुळे खासगी क्षेत्राच्या विकासालाही खीळ बसणार असून, त्यामुळे राज्यातून उद्योगधंदे बाहेर पडू शकतात. हा कायदा प्रत्यक्षात कुशल तरुणांच्या हक्कांचे उल्लंघन करणारा असल्याचे याचिकाकर्त्याने म्हटले आहे. 2 मार्च 2021 रोजी अंमलात आलेला कायदा आणि 6 नोव्हेंबर 2021 रोजी 75 टक्के नोकऱ्या राखून ठेवण्याची अधिसूचना संविधानाच्या, सार्वभौमत्वाच्या तरतुदींच्या विरुद्ध असल्याचे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे.

 

Government of Haryana : स्थानिकांना खासगी क्षेत्रामध्ये 75 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय रद्द, हरियाणा सरकारला न्यायालयाचा दणका

दरम्यान, भारतातील बेरोजगारीचा दर घसरला असून तो 6.57 टक्क्यांवर पोहोचला आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या Centre for Monitoring Indian Economy (CMIE) एका अहवालात याची माहिती देण्यात आली आहे. जानेवारीमधील बेरोजगारीचा 6.57 टक्के दर हा मार्च 2021 नंतरचा सर्वात कमी दर आहे. कोरोनाच्या लाटेनंतर आलेले ओमायक्रॉन व्हेरियंटचे संकटातून भारतीय अर्थव्यवस्था सावरत असून त्याचा परिणाम म्हणजे बेरोजगारीचा दर कमी झाल्याचं या अहवालात सांगण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील जानेवारी महिन्यातील बेरोजगारीचा दर हा 4.2 टक्के इतका आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने दिलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी 2022 मध्ये देशातील शहरी भागात बेरोजगारीचा दर हा 8.16 टक्के इतका आहे तर ग्रामीण भागातील हा दर 5.84 टक्के इतका आहे. डिसेंबर 2021 मध्ये देशातील बेरोजगारीचा दर हा 7.91 टक्के इतका होता. डिसेंबर 2021 मध्ये बेरोजगारीचा दर हा शहरी भागात 9.30 टक्के आणि ग्रामीण भागात 7.28 टक्के इतका होता. बेरोजगारीच्या प्रमाणाचा विचार करता तो तेलंगणा (0.7 टक्के) राज्यात सर्वात कमी आहे तर हरयाणामध्ये (23.4) तो सर्वाधिक आहे. गुजरातमध्ये हा दर 1.2 टक्के, मेघालयमध्ये 1.5 टक्के ओडिशामध्ये 1.8 टक्के तर राजस्थानमध्ये 18.9 टक्के इतका आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

देशात NEET घोटाळा, CBSEचा तमाशा सुरु असतानाच दिल्लीतील स्कूल ऑफ प्लॅनिंगच्या इमारतीत आगीचा भडका; कार्यालयातील आग संशयास्पद असल्याचा काँग्रेसचा आरोप
देशात NEET घोटाळा, CBSEचा तमाशा सुरु असतानाच दिल्लीतील स्कूल ऑफ प्लॅनिंगच्या इमारतीत आगीचा भडका; कार्यालयातील आग संशयास्पद असल्याचा काँग्रेसचा आरोप
West Bengal Cabinet Expansion: पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं

व्हिडीओ

Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला
Pune NCP Vidhan Parishad : पुण्यात अर्ज भरताना गोंधळ, एकाच पक्षातून 2 अर्ज भरण्यासाठी गडबड
Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?
Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Kolhapur: 'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
Iran War Live: तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
Vaibhav Sooryavanshi: आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाचे पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाच्या पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
Embed widget