एक्स्प्लोर

बँकेत एक लाख रुपयांपेक्षा जास्त ठेवीवर विमा सुरक्षा?

अर्थ मंत्रालयाने फायनन्शिअल रिझॉल्युशन आणि डिजॉझिट इन्शुरन्स अर्थात एफआरडीआय विधेयकाबाबत माहिती देताना हे संकेत दिले आहेत.

नवी दिल्ली : बँकेत एक लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा केल्यास आता विमा सुरक्षा मिळू शकते. अर्थ मंत्रालयाने फायनन्शिअल रिझॉल्युशन आणि डिजॉझिट इन्शुरन्स अर्थात एफआरडीआय विधेयकाबाबत माहिती देताना हे संकेत दिले आहेत. हे विधेयक सध्या संसदीय समितीकडे विचाराधीन आहे. संसदीय समितीने आपला अहवाल हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी सादर करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या विधेयकातील विम्याबाबतची जी तरतूद आहे, त्यावर सध्या गदारोळ सुरु आहे. या विधेयकाचं कायद्यात रुपांतर झाल्यानंतर एखादी बँक बुडल्यास ती ठेवीदारांची रक्कम कर्ज भरण्यासाठी वापरु शकते, असंही बोललं जात आहे. मात्र सरकारकडून सातत्याने या शंकेचं निरसन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मंगळवारी यावर पुन्हा स्पष्टीकरण देण्यात आलं. जमा रकमेवर विम्याची सुरक्षा सध्याच्या नियमांनुसार एक लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर विमा सुरक्षा दिली जाते. एखादी बँक बुडल्यास खातेधारकाची जेवढी रक्कम जमा आहे, त्यापैकी एक लाख रुपये तातडीने मिळतात. उर्वरित रक्कम मिळण्यासाठी दावा केला जाऊ शकतो, मात्र हा दावा असुरक्षित कर्जदारांप्रमाणे मानला जातो. म्हणजेच, एखादी आर्थिक संस्था बुडीत निघाल्यास त्या संस्थेचं जे काही देणं आहे, ते चुकतं करुन रक्कम उरली तर खातेधारकांना एक लाख रुपयांवरील पैसे मिळतात. या प्रस्तावित विधेयकानंतर असं होणार नाही, असा दावा सरकारने केला आहे. प्रस्तावित विधेयकामुळे विमा सुरक्षा तर कायम राहिलच, मात्र रिझॉल्युशन कॉर्पोरेशनला विम्याची रक्कम वाढवण्याचा अधिकार असेल. शिवाय आर्थिक संस्था बुडीत निघाल्यास त्या संस्थेची संपत्ती विकून ठेवीदारांचे पैसे चुकवले जातील. म्हणजेच खात्यात कितीही रक्कम जमा असेल, तर ती बुडणार नाही. ‘’बेल इनतरतूद वादात बेल इन ही तरतूद सध्या वादात आहे. ही तरतूद लागू झाल्यास बँक बुडण्याच्या अवस्थेत असेल तर जमा रकमेचा वापर खातेधारकांच्या परवानगीशिवाय इतर कामांसाठी केला जाऊ शकतो, असं बोललं जात आहे. म्हणजे बँक बुडण्याच्या परिस्थतित खातेधारकांचा पैसा तर मिळणार नाही, उलट त्याचा वापर केला जाऊ शकतो. मात्र हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचं स्पष्टीकरण सरकारने दिलं आहे. या तरतुदीच्या गरजेचा वापर करण्याची वेळच येणार नाही, असं सरकारचं म्हणणं आहे. शिवाय सरकारी बँकांच्या बाबतीत ही तरतूद न वापरणं जवळपास निश्चित आहे. कारण, सरकारी बँक बुडण्याचा धोका नसतो. नव्या विधेयकाचा उद्देश काय? सध्या बँक किंवा विमा कंपन्या यांसारख्या आर्थिक संस्था बुडीत निघाल्यास एका स्पष्ट प्रक्रियेचा अभाव आहे, हा अभाव भरुन काढण्यासाठी हे विधेयक असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. दरम्यान, बँक कायदा 1949, रिझर्व्ह बँक कायदा 1934, विमा कायदा 1938, जीवन विमान निगम कायदा 1956 आणि भारतीय स्टेट बँक कायदा 1955 यांसारख्या कायद्यांच्या तरतुदी आर्थिक संस्था बुडीत निघाल्यास काय करायचं याबाबत मदत करतात. मात्र कर्जदार आणि ठेवीदार यांच्या सुरक्षेसाठी सरकारने हे पाऊल उचललं आहे.
  • एका रिझॉल्युशन कॉर्पोरेशनची नियुक्ती केली जाईल. कायदा न्यायाधिकरणाच्या निर्णयानुसार बुडणाऱ्या आर्थिक संस्थेची संपत्ती एका मजबूत संस्थेकडे हस्तांतरित करण्याचा अधिकार या कॉर्पोरेशनला असेल.
  • काही आर्थिक संस्थांना महत्त्वाच्या आर्थिक संस्थांचा (Systemically Important Financial Institutions) दर्जा द्यावा लागेल. या त्या संस्था असतील, ज्या बुडीत निघाल्यास संपूर्ण आर्थिक व्यवस्थेवर मोठा परिणाम होईल.
  • विशेष निधीची तरतूद करणं, ज्यातून विमा सुरक्षा दिली जाईल. याच निधीतून इतर खर्चही केला जाईल.
  • डिपॉझिट इन्शुरन्स आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन कायदा, 1961 संपुष्टात आणणं.( हा तो कायदा आहे, ज्यामुळे असा समज झाला की, बँक बुडीत निघाल्यानंतर एक लाख रुपयांपर्यंतची विमा सुरक्षा मिळणार नाही)
नव्या विधेयकाची गरज काय? एखादी आर्थिक संस्था बुडीत निघाल्यास त्याचा मोठा परिणाम होतो. दिवाळखोरी कायदा 2016 मध्ये आर्थिक सेवा पुरवणाऱ्या संस्था येत नाहीत. या सर्व बाबी लक्षात घेऊन एफआरडीआय विधेयक आणण्यात आलं आहे. दिवाळखोरी कायदा आणि एफआरडीआयमुळे आर्थिक व्यवस्था आणखी मजबूत होण्यास सरकारला मदत होईल, असं सरकारचं म्हणणं आहे. ज्यामुळे सार्वजनिक निधी आणि विशेष सेवा देणाऱ्या ग्राहकांच्या हिताचं संरक्षण होईल. सरकारी बँकांच्या गॅरंटीमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही, असं सरकारने स्पष्ट केलं आहे. सरकारी बँकांकडे आवश्यक तेवढी रक्कम असून त्यासाठी कायदेही मजबूत आहेत. सरकारी बँक बुडीत निघू नये, यासाठी आवश्यक ती पावलं उचलली जात आहेत. मात्र यानंतरही अपवादात्मक परिस्थितीतही ठेवादारांच्या हिताला धक्का न लागू देण्यास मदत होईल, असं सरकारने सांगितलं आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सरकारी नोकरीची मोठी संधी! रेल्वेत 11 हजाराहून अधिक पदांसाठी भरती, काय आहे पात्रता? कसा कराल अर्ज?
सरकारी नोकरीची मोठी संधी! रेल्वेत 11 हजाराहून अधिक पदांसाठी भरती, काय आहे पात्रता? कसा कराल अर्ज?
पेट्रोलच्या पाठोपाठ औद्योगिक डिझेलच्याही दरात मोठी वाढ, वाहतूक खर्चावर परिणाम, नेमकी किती झाली वाढ?
पेट्रोलच्या पाठोपाठ औद्योगिक डिझेलच्याही दरात मोठी वाढ, वाहतूक खर्चावर परिणाम, नेमकी किती झाली वाढ?
Post Office Yojana : एकदाच गुंतवणूक करा, दरमहा 17000 रुपये मिळवा, जाणून घ्या पोस्टाच्या भन्नाट योजनेबद्दल माहिती 
Post Office Yojana : एकदाच गुंतवणूक करा, दरमहा 17000 रुपये मिळवा, जाणून घ्या पोस्टाच्या भन्नाट योजनेबद्दल माहिती 
Rupee Plunged to Record Low: भारताचा रुपया अक्षरश: रक्तबंबाळ; देशाच्या इतिहासात प्रथमच डाॅलरच्या तुलनेत तब्बल 93.15 या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला
भारताचा रुपया अक्षरश: रक्तबंबाळ; देशाच्या इतिहासात प्रथमच डाॅलरच्या तुलनेत तब्बल 93.15 या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला

व्हिडीओ

Praful Patel On Rupali Chakankar Ashok Kharat Case मोठी बातमी: अशोक खरात अतिशय घाणेरडा, जे कुणी त्याच्यासोबत...; प्रफुल पटेल यांचं मोठं विधान
Sushma Andhare : चाकणकर रात्री दोन वाजता फोन करून पीडितांना धमक्या द्यायच्या; खरात अन् चाकणकरांमध्ये कोणत्या वेळी काय बोलणं झालं
Iran vs US Israel Conflict : नजर अमेरिकेवर, युद्ध उंबरठ्यावर? Special Report
Raj Thackeray MNS Melava Speech|इराणची बाजू,महाराष्ट्र घडवण्याचा निर्धार, प्रत्येकाने ऐकावं असं भाषण
Sudhir Mungantiwar Special Report : सुधीर मुनगंटीवार म्हणतात... मी पुन्हा येईन!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane News : संतापजनक! चिमुकल्या माकडाला स्टीलच्या बाणाने मारलं; जखमी माकडावर मोठी शस्त्रक्रिया; वन्यजीव प्रेमींकडून कठोर कारवाईची मागणी
ठाण्यातील येऊरमध्ये माकडाला स्टीलच्या बाणाने मारलं; वन्यजीव प्रेमींमध्ये संतापाची लाट, कठोर कारवाईची मागणी
Maharashtra Live blog: रुपाली चाकणकरांनी अखेर महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, भोंदूबाबा अशोक खरात कनेक्शन भोवलं
Maharashtra Live blog: रुपाली चाकणकरांनी अखेर महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, भोंदूबाबा अशोक खरात कनेक्शन भोवलं
Ashok Kharat : अशोक खरात ओशनो जल बनवून त्यात कुटून-कुटून व्हायग्रा टाकायचा, गाड्या पाठवून राजकारणी हे जल मागवून घ्यायचे, दमानियांचा नवा गौप्यस्फोट
अशोक खरात ओशनो जल बनवून त्यात कुटून-कुटून व्हायग्रा टाकायचा, गाड्या पाठवून राजकारणी हे जल मागवून घ्यायचे, दमानियांचा नवा गौप्यस्फोट
Satara : साताऱ्यात इतक्या खालच्या पातळीचं राजकारण झालं नव्हतं, फुटलेल्यांवर अपात्रतेची कारवाई करणार: मकरंद पाटील
साताऱ्यात इतक्या खालच्या पातळीचं राजकारण झालं नव्हतं, फुटलेल्यांवर अपात्रतेची कारवाई करणार: मकरंद पाटील
Rupali Chakankar : अरविंद शिंदे म्हणतात, रुपाली चाकणकरांची बदनामी करु नका, गरज पडल्यास काँग्रेसमध्ये घेण्यासाठी शिफारस करु, यावर अतुल लोंढे म्हणाले...
रुपाली चाकणकरांची बदनामी करु नका, पुणे काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांची भूमिका; अतुल लोंढे म्हणतात ती शिंदेंची वैयक्तिक भूमिका
Mahesh Shinde : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या निवडणुकीनंतर साताऱ्याच्या राजकारणात सध्या एकच प्रश्न,आमदार महेश शिंदे नेमके कोणाचे?”
साताऱ्याच्या राजकारणात सध्या एकच प्रश्न,आमदार महेश शिंदे नेमके कोणाचे?”
Shambhuraj Desai : सुरुवात भाजपनं केलीय, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शेवट करु, शंभूराज देसाईंचा जिल्हा परिषदेतील घडामोडींनंतर थेट इशारा
कामेश कांबळेंना शिवेंद्रराजे भोसले यांनी दम दिला, जिल्हा परिषदेत काय घडलं? शंभूराज देसाईंनी सगळं सांगितलं
Rupali Chakankar and Ashok Kharat: आधी म्हणाल्या ते माझे गुरु होते, मग अशोक खरातचा डायरेक्ट एकेरी उल्लेख, राजीनामा देताच रुपाली चाकणकर पत्रकारपरिषदेत नेमकं काय म्हणाल्या?
आधी म्हणाल्या ते माझे गुरु, मग अशोक खरातचा डायरेक्ट एकेरी उल्लेख, राजीनामा देताच रुपाली चाकणकर म्हणाल्या...
Embed widget