एक्स्प्लोर

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांची एसपीजी सुरक्षा काढली!

एसपीजी सुरक्षा ही देशातील निवडक व्यक्तींनाच दिली जाते. देशाच्या सर्वात महत्त्वाच्या राजकारण्यांची सुरक्षा करणारं हे उच्च दर्जाचं पथक आता केवळ चार जणांच्या सुरक्षेसाठी असेल.

नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहर सिंह यांची स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (एसपीजी) सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. त्यांना आता 'झेड प्लस' सुरक्षा देण्यात येणार आहे. म्हणजेच त्यांना सीआरपीएफचं सुरक्षाकवच असेल. सगळ्या गुप्तचर यंत्रणांकडून आढावा घेतल्यानंतर मनमोहन सिंह यांना 'एसपीजी'ऐवजी 'झेड प्लस' सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला. "सुरक्षेसंदर्भातील निर्णय पूर्णत: प्रोफेशनल आधारावर घेतला आहे. ठराविक काळानंतर सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेतला जात. ही सामान्य प्रक्रिया आहे. याअंतर्गत सुरक्षा कमी करणं किंवा वाढवण्याचा निर्णय घेतला जातो," असं गृहमंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे. मनमोहन सिंह यांना झेड प्लस सुरक्षा मिळणार मनमोहन सिंह यांची एसपीजी सुरक्षा काढण्यात आली असली तरी त्यांना 'झेड प्लस' सुरक्षा मिळणार आहेच. सध्याच्या सुरक्षेचा आढावा ही निर्धारित काळात होणारी प्रक्रिया आहे. गुप्तचर यंत्रणांनी घेतलेला आढावा आणि धोक्याची शक्यता पाहून हा निर्णय घेतला जातो. "2004 ते 2014 ही दहा वर्ष देशाचं पंतप्रधानपद सांभाळणारे डॉ. मनमोहन सिंह यांनाच आपल्या सुरक्षेविषयी फार चिंता वाटत नाही. त्यामुळे ते सरकारचा निर्णय मान्य करतील," असं त्यांच्या जवळच्या सूत्रांनी सांगितलं. 2014 मध्ये काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर मनमोहन सिंह यांच्या मुलीने 2014 मध्येच एसपीजी सुरक्षा नाकारली होती. त्याचप्रमाणे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मुलीनेही सुरक्षा कमी केली होती. देशात आता केवळ चार जणांनाच एसपीजी सुरक्षा एसपीजी सुरक्षा ही देशातील निवडक व्यक्तींनाच दिली जाते. देशाच्या सर्वात महत्त्वाच्या राजकारण्यांची सुरक्षा करणारं हे उच्च दर्जाचं पथक आता केवळ चार जणांच्या सुरक्षेसाठी असेल. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, त्यांची मुलं खासदार राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा यांचा समावेश आहे. एचडी देवेगौडा, व्हीपी सिंह यांचीही सुरक्षा काढली होती याआधी दोन दशकांपूर्वी माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा आणि व्ही पी सिंह यांचीही एसपीजी सुरक्षा काढली होती. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना त्यांच्या निधनापर्यंत म्हणजेच 2018 पर्यंत एसपीजी सुरक्षा कायम होती. 1985 मध्ये एसपीजीची स्थापना स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपमध्ये 3000 जास्त कर्मचारी असतात. धोक्याची शक्यता लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुटुंबालाही एसपीजी सुरक्षा देण्याची तरतूद आहे. 1984 मध्ये सुरक्षारक्षकांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या केल्यानंतर, केवळ पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी 1985 मध्ये एसपीजीची स्थापना करण्यात आली. मात्र 1991 मध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येनंतर एसपीजी कायद्यात बदल करण्यात आला. या बदलानुसार, माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबालाही 10 वर्ष सुरक्षा पुरवली जाईल. यानंतर 2003 मध्ये वाजपेयी सरकारने कायद्यात पुन्हा बदल करुन एसपीजी सुरक्षेचा कालावधी 10 वर्षांवरुन 1 वर्ष करण्यात आला किंवा सरकारने ठरवल्यानुसार धोक्याची शक्यता किती कमी-जास्त आहे, त्यादृष्टीने एसपीजी सुरक्षा देण्याचं निश्चित करण्यात आलं.

महत्त्वाच्या बातम्या

Supreme Court India: लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवणे म्हणजे चारित्र्यावर डाग नव्हे; सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?
लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवणे म्हणजे चारित्र्यावर डाग नव्हे; सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?
Rajya Sabha Election 2026 Meenakshi Natarajan: मध्य प्रदेशात राज्यसभा निवडणुकीत हायव्होल्टेज ड्रामा, इकडे काँग्रेसने आमदारांना रिसॉर्टवर नेण्याचा प्लॅन आखला, तिकडे एका चुकीमुळे भाजपचा उमेदवार थेट विजयीच झाला
राज्यसभा निवडणुकीत हायव्होल्टेज ड्रामा, काँग्रेसचा आमदारांना रिसॉर्टवर नेण्याचा प्लॅन, पण एका चुकीमुळे भाजपचा उमेदवार थेट विजयीच झाला
PM Narendra Modi: सर्वाधिक काळ पंतप्रधानपदावर राहण्याचा पंडित नेहरुंचा विक्रम आज नरेंद्र मोदींच्या नावावर; तिसऱ्या कार्यकाळालाही 2 वर्षे पूर्ण
सर्वाधिक काळ पंतप्रधानपदावर राहण्याचा पंडित नेहरुंचा विक्रम आज नरेंद्र मोदींच्या नावावर; तिसऱ्या कार्यकाळालाही 2 वर्षे पूर्ण
गॅस टंचाईवर भारताचा मेगा प्लॅन तयार, तब्बल 40 हजार कोटी रुपयांचा खर्च, गुजरात ते ओमानपर्यंत थेट पाइपलाईन
गॅस टंचाईवर भारताचा मेगा प्लॅन तयार, तब्बल 40 हजार कोटी रुपयांचा खर्च, गुजरात ते ओमानपर्यंत थेट पाइपलाईन

व्हिडीओ

Sanbhajinagar District Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीत घराणेशाहीची एन्ट्री? नेत्यांच्या नातलगांचीच चर्चा | ABP Majha
Sai Baba Temple Prasad Adulterated Pedha FDA Raid : साईंच्या भक्तांशीभेसळीचा खेळ | Special Report
Girish Mahajan On Operation Blue Star : महाजनांच्या अमृतसरमधील विधानावरून वाद | Special Report
INDIA Alliance Meeting : पंतप्रधानपदाचा चेहरा जाहीर करा; ठाकरेंची मागणी | Special Report
Nashik Vidhan Parishad Politics : एकाचं फत्ते काम, दुसऱ्याने फोडला घाम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivaji Patil on Satej Patil: मुख्यमंत्र्यांबाबत भान ठेवून बोलावं, RSS चा काय संबंध आणि त्यांच्याबद्दल का बोलताय? आमदार शिवाजी पाटलांची सतेज पाटलांना विचारणा
मुख्यमंत्र्यांबाबत भान ठेवून बोलावं, RSS चा काय संबंध आणि त्यांच्याबद्दल का बोलताय? आमदार शिवाजी पाटलांची सतेज पाटलांना विचारणा
Chhagan Bhujbal NCP: सगळेच कष्ट करतात पण काहीजण कष्ट न करताही पुढे जातात; छगन भुजबळांचं सूचक वक्तव्य, रोख कोणाकडे?
सगळेच कष्ट करतात पण काहीजण कष्ट न करताही पुढे जातात; छगन भुजबळांचं सूचक वक्तव्य, रोख कोणाकडे?
इराणचा जाॅर्डन, कुवेत अन् बहरीनमधील अमेरिकन एअरबेसवर धडाधड हल्ला; दक्षिण इराणमध्ये अमेरिकेच्या हल्ल्यानंतर IRGC चा पलटवार, जगाला धडकी भरवणाऱ्या 24 तासातील 5 मोठ्या घडामोडी
इराणचा जाॅर्डन, कुवेत अन् बहरीनमधील अमेरिकन एअरबेसवर धडाधड हल्ला; दक्षिण इराणमध्ये अमेरिकेच्या हल्ल्यानंतर IRGC चा पलटवार, जगाला धडकी भरवणाऱ्या 24 तासातील 5 मोठ्या घडामोडी
पाकव्याप्त काश्मिरात पाकिस्तानी लष्कराची मोगलाई; मानवी हक्क उल्लंघन, महागाई, बेरोजगारीविरोधात आंदोलन चिरडलं, निशस्त्र आंदोलकांवरील गोळीबारात 19 मुलांसह 7 गर्भवती ठार
पाकव्याप्त काश्मिरात पाकिस्तानी लष्कराची मोगलाई; मानवी हक्क उल्लंघन, महागाई, बेरोजगारीविरोधात आंदोलन चिरडलं, निशस्त्र आंदोलकांवरील गोळीबारात 19 मुलांसह 7 गर्भवती ठार
Supreme Court India: लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवणे म्हणजे चारित्र्यावर डाग नव्हे; सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?
लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवणे म्हणजे चारित्र्यावर डाग नव्हे; सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?
Hunar Hali and Mayank Gandhi Divorce: प्रसिद्ध सेलिब्रिटी कपलच्या नऊ वर्षांच्या संसारात मिठाचा खडा; घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण, 2016 मध्ये थाटामाटात केलेलं लग्न
प्रसिद्ध सेलिब्रिटी कपलच्या नऊ वर्षांच्या संसारात मिठाचा खडा; घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण, 2016 मध्ये थाटामाटात केलेलं लग्न
Pune Congress: पुणे विधानपरिषद निवडणुकीनंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर! अरविंद शिंदेंची प्रदेशाध्यक्षांविरोधात हायकमांडकडे तक्रार, नेमकं काय घडलंय?
पुणे विधानपरिषद निवडणुकीनंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर! अरविंद शिंदेंची प्रदेशाध्यक्षांविरोधात हायकमांडकडे तक्रार, नेमकं काय घडलंय?
Adhik Maas 2026: कुलदेवीला जायचं राहून गेलं? अधिक मास संपण्यापूर्वी घरच्या घरी 'अशी' भरा कुलदेवीची ओटी, 'या' वस्तूशिवाय ओटी अपूर्ण..
कुलदेवीला जायचं राहून गेलं? अधिक मास संपण्यापूर्वी घरच्या घरी 'अशी' भरा कुलदेवीची ओटी, 'या' वस्तूशिवाय ओटी अपूर्ण..
Embed widget