एक्स्प्लोर

India-China Border Row : 'चीनने दिलेला शब्द पाळला नाही, त्यामुळेच...', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा 'ड्रॅगन'वर निशाणा

India-China Border Row : ऑस्ट्रियामध्ये एका मुलाखतीदरम्यान जयशंकर म्हणाले की, भारत आणि चीन यांच्यात सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणावर सुरक्षा दल न ठेवण्याचे करार झाले आहेत.

S Jaishankar on India-China Border Row : भारत (India) आणि चीन (China) यांच्यामधील संघर्ष सर्वज्ञात आहे. 'ड्रॅगन'कडून नेहमीच काही ना काही कुरापती सुरुच असतात. चीनकडून वारंवार नियम मोडले गेल्याचं सांगत भारताचे परराष्ट्र मंत्री (Minister of External Affairs of India) एस जयशंकर (S Jaishankar) यांनी पुन्हा एकदा चीनवर निशाणा साधला आहे. एस जयशंकर म्हणाले की, चीनने सीमा मुद्द्यांवर भारतासोबत केलेल्या करारांचे पालन केले नाही. जयशंकर म्हणाले की, चीनने नियंत्रण रेषेवर (LAC) मोठ्या प्रमाणात सोयीसुविधा वाढवल्या आहेत. केला. त्यामुळेच दोन्ही शेजाऱ्यांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असल्याचे त्यांनी सांगितले. परराष्ट्रमंत्री जयशंकर सध्या ऑस्ट्रियाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी सोमवारी (2 जानेवारी) ऑस्ट्रियामध्ये ORF ला मुलाखत दिली. या मुलाखतीत जयशंकर म्हणाले की, भारत आणि चीनमध्ये सीमा भागात मोठ्या प्रमाणावर सुरक्षा दल न ठेवण्याबाबत करार झाले आहेत.

'चीनने करारांचे पालन केले नाही'

जयशंकर म्हणाले की, चीनने भारतासोबतच्या करारांचे पालन केले नाही आणि त्यामुळेच सध्या दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती आहे. जयशंकर म्हणाले, 'भारत आणि चीनमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) बदल न करण्याचा करार केला होता, पण चीनने नियंत्रण रेषेवर बांधकाम करण्यास सुरुवात केली, सैन्य तैनात केले.'

सीमावादाच्या प्रश्नावर जयशंकर यांचे उत्तर

एका प्रश्नाचे उत्तर देताना परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हणाले की, भारताने कराराचे पालन केले नाही, असे चीनला म्हणू शकत नाही. चीन भारतावर आरोप करू शकतो, पण सॅटेलाइट इमेजेसमध्ये कोणाची चूक आहे, हे स्पष्टपणे दिसून येते. सीमेवर आधी सैन्य कोणी पाठवले, हे तुम्ही सॅटेलाइट इमेजवरून स्पष्टपणे पाहू शकता. चीनने भारतासोबत केलेल्या कराराचे पालन केले नाही.

तवांग सेक्टरमधील संघर्षानंतर तणाव वाढला

चीनचा भारतीय हद्दीत (India-China Dispute) घुसखोरीचा प्रयत्न भारतीय सैन्याने उलथून लावला. 9 डिसेंबर रोजी अरुणाचल प्रदेशच्या तवांग सेक्टरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतीय सैन्य आणि चिनी सैन्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत मध्ये दोन्ही देशांचे काही जवान जखमी झाले. तेव्हापासून भारत आणि चीनमध्ये तणाव पुन्हा वाढला आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
Independence Day 2026: स्वातंत्र्यावेळी भारताची लोकसंख्या किती होती? 2026 पर्यंत लोकसंख्येत किती वाढ? 
स्वातंत्र्यावेळी भारताची लोकसंख्या किती होती? देशाच्या लोकसंख्येत 2026 पर्यंत किती वाढ?
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदी देशवासियांना थोड्याचवेळात संबोधित करणार
Live blog updates: लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदी देशवासियांना थोड्याचवेळात संबोधित करणार
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Embed widget