एक्स्प्लोर

Farmers Protest : कृषी सुधारणांसाठी दिल्लीत लाखभर शेतकरी घेऊन पोहचू, सुप्रीम कोर्टाच्या मध्यस्थी समितीच्या अध्यक्षांचा इशारा

Farmers Protest : कृषी सुधारणा करा अन्यथा दिल्लीत पुन्हा एकदा मोर्चा काढण्यात येईल असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या मध्यस्ती समितीने केंद्र सरकारला दिला आहे.

नवी दिल्ली : एकीकडे केंद्र सरकारने तीन वादग्रस्त कृषी कायदे माघारी घेऊनही आंदोलनाचा पेच मिटलेला दिसत नाही. तर दुसरीकडे  कृषी सुधारणा आवश्यकच आहेत, त्यासाठी उद्या गरज पडल्यास आम्हीही लाखभर शेतकरी घेऊन दिल्लीत पोहचू असा इशारा खुद्द सुप्रीम कोर्टानं नेमलेल्या मध्यस्थी समितीच्या अध्यक्षांनी दिला आहे. या मध्यस्थ समितीचे अध्यक्ष आणि शेतकरी नेते अनिल घनवट यांनी एबीपी माझाला दिलेल्या स्फोटक मुलाखतीत हा दावा केला आहे. शिवाय अहवाल वेळेत देऊनही तो सार्वजनिक होत नसल्यानं समिती चांगलीच आक्रमकही झाली आहे.  

समितीचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी सुप्रीम कोर्टाला पुन्हा एकदा पत्र लिहिले आहे. सातत्यानं मागणी करुनही कोर्टानं हा अहवाल अजूनही सार्वजनिक केलेला नाही. आम्ही दोन-तीन महिने वाट पाहू, नंतर कोर्टाचा अवमान झाला तरी मग आम्हाला हा अहवाल सार्वजनिक करावा लागेल असा इशारा अनिल घनवट यांनी एबीपी माझाशी बोलताना दिला आहे. 12 जानेवारी 2021 रोजी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी ही समिती नेमली होती. या समितीनं तीन महिन्यात काही शेतकरी संघटनांशी बोलून आपला अहवाल कोर्टाला 21 मार्च 2021 रोजी सादर केला होता. 

पण इतके महिने उलटल्यानंतरही हा अहवाल अजून बाहेर आलेला नाहीय. ही समिती जेव्हा नेमली तेव्हा ती सरकारधार्जिणी असल्याचा आरोप करण्यात आला होता. पण सरकारनं हे कायदे योग्य प्रक्रियेनुसार आणले नाहीत असाही उल्लेख समितीनं कोर्टाला लिहिलेल्या पत्रात केला आहे. तीन कृषी कायदे मागे घेतले गेले असली तरी आम्ही सुचवलेल्या मार्गानुसारच्या सुधारणा कृषी क्षेत्रात आवश्यक आहेत.  या सुधारणा चालू राहाव्यात ही मागणी घेऊन आम्हीही दिल्लीत लाखभर शेतकरी गोळा करुन पोहचू असाही इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. 

त्याचवेळी कायदे मागे घेतल्यानंतर एमएसपीच्या लिखित हमीची जी मागणी होत आहे, तीही पूर्णपणे अव्यवहार्य असल्याचा दावा अनिल घनवट यांनी केला आहे. देशात 23 पीकांना एमएसपी मिळतो, उद्या बाकीचे शेतकरीही एमएसपीची मागणी करतील. आर्थिकदृष्ट्या हे कुठल्याही सरकारला शक्य नाही. जे कुठलं सरकार हे करायला जाईल ते कर्जाच्या ओझ्यात डूबून जाईल असंही वक्तव्य समितीचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी केलं. 

सुप्रीम कोर्टानं जानेवारी महिन्यात ही समिती नेमली होती. दिलेल्या वेळेत आम्ही अहवाल पूर्ण करुन दिला. जर आमचा अहवाल वेळीच सार्वजनिक केला असता, तर त्यावर दोन्ही बाजूंनी चर्चा झाली असती, आणि योग्य तोडगा निघाला असता असाही दावा त्यांनी केलाय. 

संबंधित बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget