एक्स्प्लोर

कृषी क्षेत्राला नोटाबंदीचा मोठा फटका, सरकारची कबुली

खरीपाची काढणी, विक्रीची लगबग आणि रब्बी पेरण्यांची घाई सुरु असतानाच नोटाबंदी जाहीर झाली होती. हे दोन्ही व्यवहार नगदीने होत असतात. त्याचवेळी नोटाबंदीने बाजारातून रोकड गायब केली. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला असल्याचे केंद्रीय कृषी मंत्रालयाने म्हटले आहे.

नवी दिल्ली : नोटाबंदीचा मोठा फटका शेतीक्षेत्राला बसला असल्याची कबुली कृषी मंत्रालयाने अखेर दिली आहे. या संबंधी केंद्रीय कृषी मंत्रालयाने अर्थ मंत्रालयाच्या स्थायी समितीला एक अहवाल सादर केला, त्यात याचा उल्लेख असल्याचे 'द हिंदू'ने म्हटले आहे. खरीपाची काढणी, विक्रीची लगबग आणि रब्बी पेरण्यांची घाई सुरु असतानाच नोटाबंदी जाहीर झाली होती. हे दोन्ही व्यवहार नगदीने होत असतात. त्याचवेळी नोटाबंदीने बाजारातून रोकड गायब केली. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला असल्याचे केंद्रीय कृषी मंत्रालयाने म्हटले आहे. नोटाबंदीनंतर लाखो शेतकऱ्यांना रब्बीसाठी खते, बियाणे खरेदीलाही पैसे नव्हते. अनेक मोठ्या बागायतदारांना सुद्धा रोजंदारीच्या मजुरांना द्यायला तसेच आंतरमशागतीच्या कामासाठी पैसे नव्हते असे हा अहवाल सांगतो. विशेष म्हणजे, नोटाबंदीनंतर दोन वर्षात पहिल्यांदाच सरकारने ही बाब मान्य केली आहे. वित्त मंत्रालयाच्या संबंधित स्थायी संसदीय समितीला दिलेल्या अहवालात कृषी मंत्रालयाने नोटाबंदीने शेतकऱ्यांवर वाईट परिणाम झाल्याचे म्हटले आहे. नोटाबंदीनंतर शेतकऱ्यांना नगदी पैशांची अडचण आल्याने शेतकरी रब्बी आणि खरीपाच्या पेरणीसाठी बी-बियाणे आणि खते देखील खरेदी करू शकले नाहीत, असे अहवालात म्हटले आहे. कृषी मंत्रालयाने सादर केलेल्या अहवालात नमूद केले आहे की, शेतकरी त्यांची खरीप पिके विक्रीला काढत असताना आणि रब्बी पिकांची पेरणी करत असतांना हा निर्णय घोषित झाला होता. शेतकऱ्यांना या काळात खरीप पिकांची विक्रीची प्रक्रिया आणि रब्बी पिकांच्या पेरणीसाठी मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम हवी होती, मात्र या निर्णयाने शेतकरी वर्ग अडचणीत आला. भारतातील 263 दशलक्ष शेतकरी प्रामुख्याने रोख अर्थव्यवस्थेवर आधारीत आहेत, असेही या अहवालात म्हटले आहे. लाखो सामान्य शेतकऱ्यांना खरीपाच्या पेरणीसाठी बियाणे आणि खते खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे मिळाले नाहीत. सोबतच मोठ्या शेतकऱ्यांना देखील अनेक समस्या आल्या. मजुरांना दररोज वेतन देण्यासह उत्पादनवाढीसाठी देखील त्यांना अडचणी आल्या असल्याचे अहवालात म्हटले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी याच वृत्ताचा आधार घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची झोड उठविली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने देखील नोटबंदीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असल्याचे कबूल केले आहे, शेतकऱ्यांवर निर्णयाचा मोठा परिणाम झाला आहे.  राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, नोटाबंदीने कोट्यवधी शेतकऱ्यांचे जगणे कठीण केले आहे. आता त्यांच्याजवळ बी-बियाणे, खते खरेदीसाठी देखील पैसे नाहीत. परंतु आज देखील मोदीजी शेतकऱ्यांची चेष्टा करत आहेत.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BJP: चंदीगडच्या भाजप मुख्यालयावरील ग्रेनेड हल्ला प्रकरणात 5 जणांना अटक, ISI चा कट उघड, पोर्तुगाल- जर्मनी कनेक्शन समोर   
चंदीगडच्या भाजप मुख्यालयावरील ग्रेनेड हल्ला प्रकरणात 5 जणांना अटक, ISI चा कट उघड, पोर्तुगाल- जर्मनी कनेक्शन समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 एप्रिल 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 एप्रिल 2026 | शनिवार
देशाची राजधानी हादरली! दिल्ली आणि जम्मू काश्मीरसह अनेक राज्यात भूकंपाचे धक्के, घरं सोडून नागरिक रस्त्यावर 
देशाची राजधानी हादरली! दिल्ली आणि जम्मू काश्मीरसह अनेक राज्यात भूकंपाचे धक्के, घरं सोडून नागरिक रस्त्यावर 
नोकरी सोडल्यानंतर किती दिवसात मिळणार तुमचे पैसे? काय सांगतो नवीन कामगार कायद्याचा नियम?
नोकरी सोडल्यानंतर किती दिवसात मिळणार तुमचे पैसे? काय सांगतो नवीन कामगार कायद्याचा नियम?

व्हिडीओ

Special Report on Nashik Accident : कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू, गुन्हेगार कोण?
Kolhapur Rada Special Report : एक झाड, 2 गावात वाद; कोल्हापूरच्या शिरोळा तालुक्यात अनोखा संघर्ष
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं का? जय पवार पहिल्यांदाच बोलले, पत्रकार परिषद न घेण्याचंही सांगितलं
Nanded Crime : रुग्णालयात जाऊन काटा काढला, नांदेडमधील गँगवॉरची थरकाप उडवणारी कहाणी
Solapur Anjangaon : अंजनगावातील छ. शिवरायांच्या पुतळ्याचा वादावर तोडगा कसा निघाला?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Kharat Nashik Crime: मोठी बातमी: एसआयटीने चौकशी करुन घरी सोडलं अन् अशोक खरातच्या मुलाने रंग दाखवलेच, हर्षवर्धन खरात नॉट रिचेबल, पळून गेल्याची शक्यता
मोठी बातमी: एसआयटीने चौकशी करुन घरी सोडलं अन् अशोक खरातच्या मुलाने रंग दाखवलेच, हर्षवर्धन खरात नॉट रिचेबल, पळून गेल्याची शक्यता
Baramati Byelection 2026 Candidates: बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांविरोधात 19 उमेदवारांनी शड्डू ठोकला, कोण-कोण रिंगणात?
बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांविरोधात 19 उमेदवारांनी शड्डू ठोकला, कोण-कोण रिंगणात?
T Raja Singh: नितेश राणेंना माझं समर्थन, महाराष्ट्रातील सर्व मदरसे उद्ध्वस्त करा; टी. राजा सिंह यांचे वादग्रस्त विधान
नितेश राणेंना माझं समर्थन, महाराष्ट्रातील सर्व मदरसे उद्ध्वस्त करा; टी. राजा सिंह यांचे वादग्रस्त विधान
Rahuri By Election : राहुरीत प्राजक्त तनपुरे कोणाकडून लढणार, शरद पवारांची राष्ट्रवादी की अपक्ष, मविआत सगळेच इच्छुक
राहुरी पोटनिवडणुकीसाठी मविआकडून कोण लढणार, ठाकरेंच्या शिवसेनेत आणि काँग्रेसमध्येही इच्छुक, प्राजक्त तनपुरेंचा सस्पेन्स कायम
Navi Mumbai Crime: काळी जादू करण्यासाठी सांताक्रुझमधील आई अन् मुलीला फार्महाऊसवर नेऊन विवस्त्र व्हायला सांगितलं अन् नको ते केलं, नवी मुंबईतील विकृत भोंदूबाबाचा पर्दाफाश
नवी मुंबईतील विकृत भोंदूबाबाचा महिलांवर अत्याचार, मध्यरात्री खालापूरच्या फार्म हाऊसवर न्यायचा अन्...
Donald Trump : होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करण्यास 48 तासांचा अल्टीमेटम, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी म्हणाले...
होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करण्यास 48 तासांचा अल्टीमेटम, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी म्हणाले...
Ashok Kharat Crime news: आधी अशोक खरातने सर्वस्व लुटलं, मग इंटरनेटवर व्हिडीओ व्हायरल झाले, पीडित महिलांना प्रचंड मानसिक धक्का
आधी अशोक खरातने सर्वस्व लुटलं, मग इंटरनेटवर व्हिडीओ व्हायरल झाले, पीडित महिलांना प्रचंड मानसिक धक्का
Ashok Kharat : अशोक खरात नॉमिनी असलेल्या 132 बँक खात्यांमधून कोट्यवधींचे व्यवहार; जगदंबा पतसंस्थेचे व्यवस्थापकाची कबुली, सगळंच सांगितलं!
अशोक खरात नॉमिनी असलेल्या 132 बँक खात्यांमधून कोट्यवधींचे व्यवहार; जगदंबा पतसंस्थेचे व्यवस्थापकाची कबुली, सगळंच सांगितलं!
Embed widget