एक्स्प्लोर

Coronavirus | लॉकडाऊन हा कोरोनावरील उपाय नाही, टेस्टिंग सर्वात मोठं शस्त्र : राहुल गांधी

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंद्वारे पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी कोरोनाशी लढण्यासाठी टेस्टिंग वाढवण्याची मागणी केली आहे.

नवी दिल्ली : लॉकडाऊन हा कोरोनावरचा उपाय नाही, ते फक्त पॉझ बटण आहे. कोरोनाविरोधात सर्वात मोठं शस्त्र म्हणजे टेस्टिंग आणि टेस्टिंग क्षमता वाढवायला हवी, असा सल्ला काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी दिला. देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

कोरोनाशी लढण्यासाठी राहुल गांधी यांनी मोदी सरकारला अनेक सल्ले दिले. ते म्हणाले की, "कोरोनाला पराभूत करण्यासाठी आपल्याला अर्थव्यवस्था आणि वैद्यकीय या दोन स्तरावर काम करावं लागेल."

लॉकडाऊन म्हणजे पॉझ बटण, उपाय नाही राहुल गांधी म्हणाले की, "देशात सध्या कोरोनाचं खूप मोठं संकट आहे. लॉकडाऊन हा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यावरील उपाय नाही. लॉकडाऊन केवळ पॉझ बटण आहे. लॉकडाऊन उठताच कोरोनाबाधितांची संख्या वाढले. अशा परिस्थितीत आपल्याला कोरोना रोखण्यासाठी रणनीती तयार करुन काम करायला हवं. टेस्टिंग वाढवायला हवी आहे. सोबतच वैद्यकीय सुविधाही वाढवायला हव्या, जेणेकरुन कोरोनाशी लढता येईल. आपली टेस्टिंग क्षमता अतिशय कमी आहे. प्रत्येक जिल्ह्यात सरासरी 350 चाचण्या होत आहेत. टेस्टिंगची क्षमता वाढवावी, असा माझा सल्ला आहे." तसंच देशात टेस्टिंग किटची मोठी कमतरता असल्याचं राहुल गांधी म्हणाले.

"कोरोनामुळे देशात आणीबाणीची परिस्थिती आहे. कोरोनाशी लढण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला निधी द्यावा, त्यांना जीएसटी परतावा द्यावा," अशी मागणीही राहुल गांधी यांनी केली.

बेरोजगारीवर उपाय शोधायला हवा मोदी सरकारला सल्ला देताना राहुल गांधी म्हणाले की, "आपल्याला अर्थव्यवस्थेच्या स्तरावर तयार राहायला हवं. गरिबांसमोर धान्याचं संकट येणार आहे. बेरोजगारी वाढत आहे. यावर उपाय शोधायला हवा. यासाठी सूक्ष्म-लघु उद्योगांसाठी पॅकेजची व्यवस्था करायला हवी. सोबतच मोठ्या कंपन्याना मदत करायली हवी."

गरिबांना प्रत्येक आठवड्यात धान्य द्या ज्या लोकांना पैशांची गरज आहे, त्यांच्यापर्यंत आर्थिक मदत पोहोचत नाही. धान्याचं संकट आहे. अनेक लोकांकडे रेशन कार्ड नसल्याने, त्यांना त्याशिवायच धान्य द्यायला हवं. गरिबांना प्रत्येक आठवड्यात 10 किलो तांदूळ किंवा गहू , एक किलो साखर आणि डाळ द्यावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ
कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ
Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी घेतला राज ठाकरेंच्या नातवाचा गालगुच्चा, नंतर फोटोही काढला
पंतप्रधान मोदींनी घेतला राज ठाकरेंच्या नातवाचा गालगुच्चा, नंतर फोटोही काढला
...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला कायद्यात पकडलं, सर्वोच्च न्यायालयासही विनंती
...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला कायद्यात पकडलं, सर्वोच्च न्यायालयासही विनंती
Vileparle bomb bag: विलेपार्ले स्थानकाजवळ बेवारस बॅग सापडली, बॉम्ब असल्याचा संशय, पोलिसांनी परिसर खाली केला
विलेपार्ले स्थानकाजवळ बेवारस बॅग सापडली, बॉम्ब असल्याचा संशयाने खळबळ, पोलिसांनी परिसर खाली केला

व्हिडीओ

Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report Girish Mahajan : वृक्षतोडीला वाढता विरोध, सरकार काय करणार? साधुग्राम कुठे उभारणार?
Special Report Akola School : जयजयकार पाकिस्तानचा, पोलिसांकडून तपास; वास्तव काय?
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ
कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ
Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी घेतला राज ठाकरेंच्या नातवाचा गालगुच्चा, नंतर फोटोही काढला
पंतप्रधान मोदींनी घेतला राज ठाकरेंच्या नातवाचा गालगुच्चा, नंतर फोटोही काढला
...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला कायद्यात पकडलं, सर्वोच्च न्यायालयासही विनंती
...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला कायद्यात पकडलं, सर्वोच्च न्यायालयासही विनंती
Vileparle bomb bag: विलेपार्ले स्थानकाजवळ बेवारस बॅग सापडली, बॉम्ब असल्याचा संशय, पोलिसांनी परिसर खाली केला
विलेपार्ले स्थानकाजवळ बेवारस बॅग सापडली, बॉम्ब असल्याचा संशयाने खळबळ, पोलिसांनी परिसर खाली केला
पुणे, मुंबईपेक्षाही कमी लोकसंख्या असलेल्या बहरिनमध्ये असं नेमकं आहे तरी काय? शियाबहुल असूनही इराणकडे न झुकता शेजारच्या सुन्नीबहुल सौदीच्या जीवावर उड्या!
पुणे, मुंबईपेक्षाही कमी लोकसंख्या असलेल्या बहरिनमध्ये असं नेमकं आहे तरी काय? शियाबहुल असूनही इराणकडे न झुकता शेजारच्या सुन्नीबहुल सौदीच्या जीवावर उड्या!
आमचे नेते एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेमुळेच भाजप सत्तेत, त्यांच्या उठावानेच भाजपची ताकद वाढली : शंभूराज देसाईंचे थेट विधान
आमचे नेते एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेमुळेच भाजप सत्तेत, त्यांच्या उठावानेच भाजपची ताकद वाढली : शंभूराज देसाईंचे थेट विधान
परभणी जिल्ह्यात भीषण अपघात, कारची समोरासमोर धडक; जागेवरच 3 ठार 2 जखमी
परभणी जिल्ह्यात भीषण अपघात, कारची समोरासमोर धडक; जागेवरच 3 ठार 2 जखमी
एकाच तालुक्यातील 85 ग्रामपंचायत सदस्यांना ठरवलं अपात्र, अपर जिल्हाधिकाऱ्यांचा नेतेमंडळींना दणका
एकाच तालुक्यातील 85 ग्रामपंचायत सदस्यांना ठरवलं अपात्र, अपर जिल्हाधिकाऱ्यांचा नेतेमंडळींना दणका
Embed widget