एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Coronavirus : देशात कोरोना बाधितांची संख्या 6761वर; कम्युनिटी ट्रान्समिशन नाही, आरोग्य मंत्रालयाची माहिती
देशातील प्रत्येक राज्यांचा विचार केल्यास सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात समोर आले आहेत. महाराष्ट्रात 1500हून अधिक लोकांना कोरोनाती लागण झाली आहे. तर 125 बरे झाले असून 97 जणांचा मृत्यू झाला आहे.
![Coronavirus : देशात कोरोना बाधितांची संख्या 6761वर; कम्युनिटी ट्रान्समिशन नाही, आरोग्य मंत्रालयाची माहिती Coronavirus Indian Health Ministry says 896 new Covid 19 Case rise in last 24 hour Coronavirus : देशात कोरोना बाधितांची संख्या 6761वर; कम्युनिटी ट्रान्समिशन नाही, आरोग्य मंत्रालयाची माहिती](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/04/06134417/corona-india.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसमुळे रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसचे देशात 6761 रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनामळे 206 लोकांचा मृत्यू झाला आहे. मागील 24 तासांत कोरोना संसर्ग झालेले 869 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 37 लोकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत गेल्या 24 तासांत देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे.
देशात कम्युनिटी ट्रान्समिशन झालेलं नाही
अजून पर्यंत देशात कम्युनिटी ट्रान्समिशन झालेलं नाही. पण आपल्याला खबरदारी म्हणून जागृत राहणं गरजेचं असल्याचं आरोग्य मंत्रालयाने सांगितलं.
काल दिवसभरातील एकूण चाचण्यांच्या 0.2टक्के लोकांना कोरोना
आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल एकूण 16,002 कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या त्यात केवळ 0.2टक्के लोकांना कोरोना झाल्याचं समोर आलं. देशभरात एकूण 146 ठिकाणी कोरोनाच्या चाचण्या होत आहेत. तर 67 प्रयोगशाळांना कोरोनाची चाचणी करण्यासाठीची परवानगी देण्यात आली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार कोराना व्हायरच्या पार्श्वभूमीवर भारताने आत्तापर्यंत 20,473 परदेशी नागरिकांना त्याच्या देशात परत पाठवण्यात आलं आहे. तसेच परराज्यात असलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी सरकरार विचार करुन निर्णय घईल.
केंद्रीय गृहमंत्रालातील अधिकऱ्याने सांगितल्याप्रमाणे सरकारने जारी केलेल्या लॉकडाऊनच्या आदेशाचं राज्याने काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. कोणतीही सामाजिक, धार्मिक मिरवणूक किंवा मेळावा भरणार नाही याची काळजी घ्या. सोशल मीडियावर बारीक लक्ष ठेवा, जेणेकरून कोणतीही चुकीची माहिती त्याद्वारे परसरणार नाही, अशा सूचना गृहमंत्रालयाने राज्य सरकारांने दिल्या आहेत.
VIDEO | गल्ली ते दिल्ली कोरोनासंदर्भातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा | बातम्यांचं अर्धशतक
राज्यनिहाय आकडेवारी
देशातील प्रत्येक राज्यांचा विचार केल्यास सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात समोर आले आहेत. महाराष्ट्रात 1500हून अधिक लोकांना कोरोनाती लागण झाली आहे. तर 125 बरे झाले असून 97 जणांचा मृत्यू झाला आहे.
आंध्र प्रदेशात 363, अंदमान-निकोबार 11, अरुणाचल प्रदेशा 1, आसाम 2,, बिहार 60, चंदीगड 1, छत्तीसगड 10, दिल्ली 898, गोवा 7, गुजरात 241, हरियाणा169, हिमाचल प्रदेश 28, जम्मू-कश्मीर184, झारखंड 13, कर्नाटक 197, केरळ 357, लडाख 15, मध्य प्रदेश 259, मणिपूर 2, मिजोरम 1, ओडिसा 44, पाँडेचेरी 5, पंजाब 132, राजस्थान 463, तमिळनाडू 834, तेलंगणा 473, त्रिपुरा 1, उत्तराखंड 35, उत्तर प्रदेश 431 आणि पश्चिम बंगाल 116 कोरोनाचे रुग्ण समोर आले आहेत.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
क्रिकेट
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion