Coronavirus India Cases : देशात एका दिवसात सर्वाधिक मृत्यूची नोंद; गेल्या 24 तासांत 4205 कोरोना रुग्णांचा मृत्यू
आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 348,421 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.

Coronavirus India Cases : देशात कोरोनाचा कहर काही थांबायचं नाव घेत नाहीये. दरदिवशी मृत्यूचा आकडा नवनवे उच्चांक गाठताना दिसत आहे. या व्हायरसने आतापर्यंत दीड लाखांहून अधिक लोकांचा जीव घेतला आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 348,421 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 4205 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, 3,55,338 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत एका दिवसात झालेल्या मृत्यूंच्या नोंदींपैकी ही सर्वाधिक नोंद आहे. यापूर्वी 7 मे रोजी 4187 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला होता.
11 मेपर्यंत देशभरात 17 कोटी 52 लाख 35 हजार 991 कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात 24 लाख 46 हजार 674 लसीचे डोस देण्यात आले आहेत. तर आतापर्यंत जवळपास 30.75 कोटी टेस्ट करण्यात आल्या आहेत. गेल्या दिवसभरात 19.83 लाख कोरोना सॅम्पल टेस्ट करण्यात आले आहेत. ज्याचा पॉझिटिव्ह रेट 17 टक्क्यांहून अधिक आहे.
देशातील आजची कोरोना स्थिती :
एकूण कोरोना रुग्णसंख्या : दोन कोटी 33 लाख 40 हजार 938
एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या : एक कोटी 93 लाख 82 हजार 642
एकूण सक्रिय रुग्णसंख्या : 37 लाख 4 हजार 99
एकूण मृत्यू : 2 लाख 54 हजार 197
देशात कोरोनामुळे मृत्यूदर 1.09 टक्के आहे. तर रिकव्हरी रेट 83 टक्क्यांहून कमी आहे. सक्रिय रुग्णांची संख्या कमी होऊन 16 टक्क्यांहून अधिक झाला आहे. कोरोना सक्रिय रुग्णांच्या संख्येत भारत देशभरात दुसऱ्या स्थानी आहे. एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येतही भारत दुसऱ्या स्थानी आहे. तर जगभरात अमेरिका, ब्राझील, मेक्सिकोनंतर सर्वाधिक मृत्यू भारतात झाला आहे.
राज्यात मंगळवारी 40, 956 रुग्णांची नोंद, तर 71,966 रुग्ण कोरोनामुक्त
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा हळूहळू कमी होताना दिसत आहे. काल राज्यात 71 हजार 966 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आज नवीन 40 हजार 956 रुग्णांचे निदान झाले आहे. कालही राज्यात 37 हजार 326 रुग्णांची नोंद झाली होती.
राज्यात आजपर्यंत एकूण 45,41,391 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 87.67 टक्के झाला आहे. तर राज्यात आज 793 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 1.49 टक्के एवढा आहे.
Before You Go
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम






















