एक्स्प्लोर

PMModi | कोरोनाच्या संकटकाळात पंतप्रधान मोदींचा जनतेशी संवाद; जाणून घ्या कधी आणि काय म्हणाले मोदी?

देशात कोरोना व्हायरस फोफावत आहे. आज आम्ही तुम्हाला कोरोनाच्या संकटकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केव्हा देशातील जनतेशी संवाद साधला आणि त्यांना काय संबोधन केलं याबाबत सांगणार आहोत.

नवी दिल्ली : देशात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढताना दिसत आहे. देशातील कोरोनाचा प्रकोप थांबवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात 21 दिवसांसाठी लॉकडाऊनची घोषणा केली होती. आज या लॉकडाऊनचा शेवटचा दिवस आहे. आज सकाळी 10 वाजता नरेंद्र मोदी देशातील जनतेला संबोधित करणार आहेत. देशातील कोरोना बाधितांच्या आकड्यात होणारी वाढ पाहता देशातील लॉकडाऊन वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच कोरोनाच्या संकट ओढावल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार देशातील जनतेशी संवाद साधत आहेत. आज आम्ही तुम्हाला कोरोनाच्या संकटकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केव्हा देशातील जनतेशी संवाद साधला आणि त्यांना काय संबोधन केलं याबाबत सांगणार आहोत...

मागील महिन्यात पंतप्रधानांनी 19 मार्च आणि 24 मार्चला देशाला संबोधित केलं आहे. त्यांनी 19 मार्च रोजी कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी संकल्प आणि संयम राखण्याचं आवाहन केलं होतं. तसेच 22 मार्च रोजी एका दिवसासाठी 'जनता कर्फ्यू'ची घोषणा केली होती. पंतप्रधान मोदींनी कोरोनाचा कहर रोखण्यासाठी 24 मार्च रोजी 21 दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली होती. तसेच 3 एप्रिल रोजी मोदी यांनी एक व्हिडीओ संदेश जारी केला होता. त्यामधून 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी घरातील सर्व लाइट्स बंद करून दिवे, मेणबत्ती. मोबाईल फ्लॅशची लाइट लावून कोरोनाला हरवण्यासाठी देशातील एकतेचं प्रदर्शन करण्याचं आवाहन केलं होतं.

पाहा व्हिडीओ : 'पीएम केअर फंड'चा सीएसआरमध्ये समावेश, कोरोनाच्या मदतनिधीवरून राजकारण?

कोरोना व्हायरसच्या संकटकाळात पंतप्रधान मोदींचा जनतेशी संवाद

19 मार्च 2020 : 22 मार्च रोजी 'जनता कर्फ्यू' ची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करत 22 मार्च रोजी सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत 'जनता कर्फ्यू'ची घोषणा केली होती. पंतप्रधान देशातील सर्व जनतेला आवाहन करताना म्हणाले होते की, 22 मार्च संध्याकाळी 5 वाजता कोरोना व्हायरसशी लढणाऱ्यांना मदत करणाऱ्या डॉक्टरांसह मेडिकल टीमचे आभार मानण्यात येतील. त्यांचे आभार मानण्यासाठी टाळ्या, थाळ्या किंवा घंटानाद करा.

24 मार्च 2020 : 25 मार्चपासून 21 दिवसांसाठी देशात लॉकडाऊनची घोषणा

पंतप्रधन नरेंद्र मोदींनी कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी 24 मार्च रोजी देशात 21 दिवसांसाठी लॉकडाऊनची घोषणा केली होती.

29 मार्च 2020 : मन की बात, लॉकडाऊनमुळे जनतेला झालेल्या त्रासाची मागितली माफी

29 मार्च रोजी मन की बातमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, देशात लॉकडाऊन लागू करण्यासाठी मी तुम्हा सर्वांची माफी मागतो, परंतु ही काळाची गरज होती. पंतप्रधान मोदींनी जनतेला आवाहन केलं होतं की, त्यांनी लॉकडाऊनचं पालन करावं आणि स्वतःसह आपल्या कुटुंबालाही कोरोनापासून वाचवावं.

3 एप्रिल 2020 : व्हिडीओ संदेश, 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी दिवे लावण्याचं आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवाहन केलं होतं की, 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता देशभरातील लोकांनी रात्री 9 मिनिटांसाठी आपल्या घरातील दिवे बंद करावे आणि त्याबदल्यात दिवे किंवा मेणबत्या लावाव्यात. यामागील हेतू देशातील एकता वाढवण्याचा होता..

संबंधित बातम्या : 

Coronavirus | लॉकडाऊन-2 मध्ये 'हे' बदल होऊ शकतात? पंतप्रधान मोदींच्या भाषणाआधी चर्चांना उधाण

PM Narendra Modi Lockdown Address LIVE Updates | देशातील लॉकडाऊन वाढणार? पंतप्रधान मोदी आज देशाला संबोधित करणार

महत्त्वाच्या बातम्या

UCC : जर राम एकच लग्न करणार तर रहीम दोन-चार लग्न करणार का? दुसरं लग्न करणाऱ्याला राज्यात राहू दिलं जाणार नाही; भाजपच्या मुख्यमंत्र्यांचं खळबळजनक वक्तव्य
जर राम एकच लग्न करणार तर रहीम दोन-चार लग्न करणार का? दुसरं लग्न करणाऱ्याला राज्यात राहू दिलं जाणार नाही; भाजपच्या मुख्यमंत्र्यांचं खळबळजनक वक्तव्य
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
Monsoon Session 2026 : काय आहे 'मिशन 360'? बजेट सत्रानंतर कसं बदललं संसदेचं गणित? मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पास होणार का?
काय आहे 'मिशन 360'? बजेट सत्रानंतर कसं बदललं संसदेचं गणित? मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पास होणार का?

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget