एक्स्प्लोर

PMModi | कोरोनाच्या संकटकाळात पंतप्रधान मोदींचा जनतेशी संवाद; जाणून घ्या कधी आणि काय म्हणाले मोदी?

देशात कोरोना व्हायरस फोफावत आहे. आज आम्ही तुम्हाला कोरोनाच्या संकटकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केव्हा देशातील जनतेशी संवाद साधला आणि त्यांना काय संबोधन केलं याबाबत सांगणार आहोत.

नवी दिल्ली : देशात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढताना दिसत आहे. देशातील कोरोनाचा प्रकोप थांबवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात 21 दिवसांसाठी लॉकडाऊनची घोषणा केली होती. आज या लॉकडाऊनचा शेवटचा दिवस आहे. आज सकाळी 10 वाजता नरेंद्र मोदी देशातील जनतेला संबोधित करणार आहेत. देशातील कोरोना बाधितांच्या आकड्यात होणारी वाढ पाहता देशातील लॉकडाऊन वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच कोरोनाच्या संकट ओढावल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार देशातील जनतेशी संवाद साधत आहेत. आज आम्ही तुम्हाला कोरोनाच्या संकटकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केव्हा देशातील जनतेशी संवाद साधला आणि त्यांना काय संबोधन केलं याबाबत सांगणार आहोत...

मागील महिन्यात पंतप्रधानांनी 19 मार्च आणि 24 मार्चला देशाला संबोधित केलं आहे. त्यांनी 19 मार्च रोजी कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी संकल्प आणि संयम राखण्याचं आवाहन केलं होतं. तसेच 22 मार्च रोजी एका दिवसासाठी 'जनता कर्फ्यू'ची घोषणा केली होती. पंतप्रधान मोदींनी कोरोनाचा कहर रोखण्यासाठी 24 मार्च रोजी 21 दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली होती. तसेच 3 एप्रिल रोजी मोदी यांनी एक व्हिडीओ संदेश जारी केला होता. त्यामधून 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी घरातील सर्व लाइट्स बंद करून दिवे, मेणबत्ती. मोबाईल फ्लॅशची लाइट लावून कोरोनाला हरवण्यासाठी देशातील एकतेचं प्रदर्शन करण्याचं आवाहन केलं होतं.

पाहा व्हिडीओ : 'पीएम केअर फंड'चा सीएसआरमध्ये समावेश, कोरोनाच्या मदतनिधीवरून राजकारण?

कोरोना व्हायरसच्या संकटकाळात पंतप्रधान मोदींचा जनतेशी संवाद

19 मार्च 2020 : 22 मार्च रोजी 'जनता कर्फ्यू' ची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करत 22 मार्च रोजी सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत 'जनता कर्फ्यू'ची घोषणा केली होती. पंतप्रधान देशातील सर्व जनतेला आवाहन करताना म्हणाले होते की, 22 मार्च संध्याकाळी 5 वाजता कोरोना व्हायरसशी लढणाऱ्यांना मदत करणाऱ्या डॉक्टरांसह मेडिकल टीमचे आभार मानण्यात येतील. त्यांचे आभार मानण्यासाठी टाळ्या, थाळ्या किंवा घंटानाद करा.

24 मार्च 2020 : 25 मार्चपासून 21 दिवसांसाठी देशात लॉकडाऊनची घोषणा

पंतप्रधन नरेंद्र मोदींनी कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी 24 मार्च रोजी देशात 21 दिवसांसाठी लॉकडाऊनची घोषणा केली होती.

29 मार्च 2020 : मन की बात, लॉकडाऊनमुळे जनतेला झालेल्या त्रासाची मागितली माफी

29 मार्च रोजी मन की बातमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, देशात लॉकडाऊन लागू करण्यासाठी मी तुम्हा सर्वांची माफी मागतो, परंतु ही काळाची गरज होती. पंतप्रधान मोदींनी जनतेला आवाहन केलं होतं की, त्यांनी लॉकडाऊनचं पालन करावं आणि स्वतःसह आपल्या कुटुंबालाही कोरोनापासून वाचवावं.

3 एप्रिल 2020 : व्हिडीओ संदेश, 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी दिवे लावण्याचं आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवाहन केलं होतं की, 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता देशभरातील लोकांनी रात्री 9 मिनिटांसाठी आपल्या घरातील दिवे बंद करावे आणि त्याबदल्यात दिवे किंवा मेणबत्या लावाव्यात. यामागील हेतू देशातील एकता वाढवण्याचा होता..

संबंधित बातम्या : 

Coronavirus | लॉकडाऊन-2 मध्ये 'हे' बदल होऊ शकतात? पंतप्रधान मोदींच्या भाषणाआधी चर्चांना उधाण

PM Narendra Modi Lockdown Address LIVE Updates | देशातील लॉकडाऊन वाढणार? पंतप्रधान मोदी आज देशाला संबोधित करणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget