एक्स्प्लोर

Brahmos Misfire: ब्रह्मोसचं मिसफायर, सरकारी तिजोरीला 24 कोटींचा भुर्दंड; केंद्र सरकारची दिल्ली उच्च न्यायालयात माहिती

Brahmos Misfire: गेल्या वर्षी अपघाताने पाकिस्तानात डागल्या गेलेल्या ब्रह्मोस क्षेपणास्त्रामुळे सरकारी तिजोरीला 24 कोटींचा भुर्दंड बसला, तसंच शेजारी देशासोबतचे संबंधही ताणले गेल्याचं केंद्र सरकारचं म्हणणं आहे.

Brahmos Misfire: मार्च 2022 मध्ये एक ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिसफायर (Brahmos Misfire) झालं होतं. मिसफायर झाल्यानंतर हे क्षेपणास्त्र 125 किलोमीटर अंतरावर जाऊन पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात जाऊन कोसळलं होतं. या प्रकरणी केंद्र सरकारनं हे क्षेपणास्त्र चुकून डागण्यात आलं होतं, तसेच यामुळे सरकारी तिजोरीला 24 कोटींचा भुर्दंड बसला असून शेजारील देशांसोबतचे संबंधही ताणले गेल्याची माहिती दिल्ली उच्च न्यायालयात दिली आहे. 

गेल्या वर्षी अपघाताने पाकिस्तानात डागल्या गेलेल्या ब्राह्मोस क्षेपणास्त्रामुळे सरकारी तिजोरीला 24 कोटींचा भुर्दंड बसला, तसंच शेजारी देशासोबतचे संबंधही ताणले गेले. दिल्ली उच्च न्यायालयात सुरु असलेल्या खटल्यात केंद्र सरकारनं ही माहिती दिली आहे. त्या चुकीसाठी हवाईदलाच्या तीन अधिकाऱ्यांची सेवा समाप्त करण्याच्या कारवाईचं सरकारकडून समर्थन करण्यात आलं आहे.

हिंदुस्तान टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, केंद्र सरकारनं न्यायालयात भारतीय हवाई दलाच्या तीन विंग कमांडरना बडतर्फ केल्याचं समर्थन केलं आहे. दरम्यान, विंग कमांडर अभिनव शर्मा यांनी बडतर्फीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. विंग कमांडर अभिनव शर्मा यांच्या बडतर्फीच्या विरोधात सरकारनं दिलेल्या माहितीनुसार, कोर्ट मार्शलच्या वेळी अधिकाऱ्यांना पूर्ण सुविधा देण्यात आल्या होत्या आणि त्यांची बाजू मांडण्यासाठी त्यांना पूर्ण वेळ देण्यात आला होता.

केंद्र सरकारनं न्यायालयात माहिती देताना म्हटलं की, "राज्याच्या सुरक्षेसाठी व्यापक परिणामांसह या विषयाचं संवेदनशील स्वरूप लक्षात घेऊन याचिकाकर्त्यांच्या सेवा समाप्त करण्याचा जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक निर्णय घेण्यात आला होता. 23 वर्षांनंतर भारतीय हवाई दलात असा निर्णय घेण्यात आला आहे. कारण या प्रकरणातील वस्तुस्थिती आणि परिस्थिती लक्षात घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात होती. अधिकाऱ्यांच्या बडतर्फीच्या निर्णयाबाबत बोलताना केंद्रानं कोणताही पक्षपात न करता जनहितार्थ निर्णय घेतल्याचं सांगितलं.

दरम्यान, याचिकाकर्ते विंग कमांडर अभिनव शर्मा यांनी हवाई दल कायदा, 1950 च्या कलम 18 नुसार त्यांच्या विरोधात जारी केलेल्या बडतर्फीच्या आदेशाला आव्हान दिलं होतं. घटनेच्या वेळी ते अभियांत्रिकी अधिकारी म्हणून तैनात होते. अभिनव शर्मा यांनी आपल्या याचिकेत म्हटलं आहे की, त्यांना फक्त देखभालीचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं. त्यांना ऑपरेशनल ट्रेनिंग देण्यात आलेलं नव्हतं. त्यांनी आपलं कर्तव्य चोख बजावलं आणि ऑपरेशनचं संचालन करणाऱ्या सर्व लढाऊ SOP चं पालन केलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget