एक्स्प्लोर

Ravi Kishan: काँग्रेसने जर लोकसंख्या नियंत्रण कायदा आणला असता तर मला चार मुलं झाली नसती; भाजपचे खासदार रवी किशन यांचं वक्तव्य

काँग्रेसने या आधी सत्ता असताना लोकसंख्या नियंत्रणाच्या बाबतीत गंभीर असायला हवं होतं असं मत भाजपचे खासदार आणि अभिनेता रवी किशन यांनी व्यक्त केलं आहे. 

Ravi Kishan On Population: देशात लोकसंख्या नियंत्रण विधेयकावरून (Population Control Bill) मोठी चर्चा सुरू आहे. देशातील वाढती लोकसंख्या ही चिंतेची बाब बनली असून त्यावर कायदा करण्यासाठी पाऊलं उचलली जात आहेत. त्याचदरम्यान भाजपचे खासदार आणि अभिनेते रवी किशन  (BJP Ravi Kishan On Population Control Bill) यांनी वाढत्या लोकसंख्येला काँग्रेस पक्ष जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. जर काँग्रेसने लोकसंख्या नियंत्रणाचा कायदा केला असता तर मला चार मुलं झाली नसती असं वक्तव्य रवी किशन यांनी केलं आहे. 

आपल्याला चार अपत्यं असल्याने वाढती लोकसंख्या कशी समस्या ठरु शकते याचा अनुभव असल्याचं खासदार रवी किशन यांनी म्हटलं आहे. आज तक या वृत्तवाहिनीवरील एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी म्हटलं की, "मला चार अपत्यं आहेत, यामध्ये माझा कोणताही दोष नाही. काँग्रेसची सत्ता असताना त्यांनी जर लोकसंख्या नियंत्रणाचा कायदा केला असता तर ही परिस्थिती आलीच नसती, मी चार मुलं जन्माला घातलीच नसती."

वाढती लोकसंख्या ही देशासमोरील सर्वात मोठी समस्या असून त्यावर काँग्रेस कधीच गंभीर नव्हती असा आरोप खासदार रवी किशन यांनी केला. काँग्रेसने वेळीच पाऊलं उचलली नाहीत, त्यामुळे भाजपला आता हे विधेयक आणावं लागत असल्याचंही ते म्हणाले. 

Population Control Bill: रवी किशन संसदेत विधेयक सादर करणार 

केंद्र सरकारने देशात लोकसंख्या नियंत्रणाचा कायदा लागू करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. त्यानुसार आता दोन पेक्षा जास्त अपत्यं जन्माला घातल्यास सरकारी योजनांचा लाभ मिळणं बंद होणार आहे. गोरखपूरचे भाजपचे खासदार रवी किशन हे लोकसंख्या नियंत्रण खासगी विधेयक मांडणार आहेत.

लोकसंख्या वाढीच्या समस्येचा विचार ज्यावेळी आपण करतो त्यावेळी आपल्याचा चार अपत्यं असल्याचं वाईट वाटतंय अशी खंतही खासदार रवी किशन यांनी व्यक्त केली. देशातील या आधीचे सरकार जर विचारशील असतं तर आज ही वेळ आली नसती असंही ते म्हणाले. 

भाजपचे खासदार असलेल्या रवी किशन यांना तीन मुली आणि एक मुलगा अशी चार अपत्यं आहेत. रवी किशन यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रकात ही माहिती नमूद केली आहे. 

सध्याचे केंद्रातले भाजप सरकार केवळ मंदिरांचे निर्माण करत नाही तर देशातील पायाभूत सुविधांचाही विकास करत असल्याचं खासदार रवी किशन यांनी म्हटलं. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Akhilesh Yadav: यूपीच्या यादवांनी बिहारी यादवांना दिलेल्या हटके शुभेच्छांनी राजकीय भूवया उंचावल्या! माजी सीएम अखिलेश तेजस्वींना नेमकं काय म्हणाले?
यूपीच्या यादवांनी बिहारी यादवांना दिलेल्या हटके शुभेच्छांनी राजकीय भूवया उंचावल्या! माजी सीएम अखिलेश तेजस्वींना नेमकं काय म्हणाले?
भारतात कोणी गैर हिंदू नाहीत, मुस्लिम आणि ख्रिश्चनांचे पूर्वज हिंदू होते  मोहन भागवत
भारतात कोणी गैर हिंदू नाहीत, मुस्लिम आणि ख्रिश्चनांचे पूर्वज हिंदू होते : मोहन भागवत
Maharashtra Crime: मुंबईत धावत्या डंपरमध्ये मागून दुचाकी घुसली, दुचाकीवार चिरडल्याने जागीच ठार; बीडला ऑटो रिक्षा चालकाला स्कार्पिओने दीड किमी फरफटत नेलं
मुंबईत धावत्या डंपरमध्ये मागून दुचाकी घुसली, दुचाकीवार चिरडल्याने जागीच ठार; बीडला ऑटो रिक्षा चालकाला स्कार्पिओने दीड किमी फरफटत नेलं
Buldhana Election 2025: नामांकन दाखल करण्याची मुदत एक दिवसावर, पण बुलढाण्यात एकाही पक्षाचा उमेदवार ठरेना, आज मोठ्या राजकीय घडामोडी
नामांकन दाखल करण्याची मुदत एक दिवसावर, पण बुलढाण्यात एकाही पक्षाचा उमेदवार ठरेना, आज मोठ्या राजकीय घडामोडी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

TOP 100 Headlines : Maharashtra Superfast News : 9 NOV 2025 : टॉप 100 बातम्या : ABP Majha
Water Cut: कल्याण-टिटवाळा पाणीपुरवठा मंगळवारी १२ तास बंद, KDMC ने नागरिकांना केलं महत्त्वाचं आवाहन
Rohit Pawar : कोणत्याही नेत्याचा नातेवाईक असो, कारवाई झालीच पाहिजे - रोहित पवार
Local Body Polls: अजित पवारांच्या उपस्थितीत बारामती नगरपालिकेच्या इच्छुकांच्या गाठीभेटी
Maharashtra Politics: 'कार्यकर्ते वेगळं बोलतायत', Ajit Pawar यांचे स्वबळाचे संकेत, महायुतीत फूट?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Akhilesh Yadav: यूपीच्या यादवांनी बिहारी यादवांना दिलेल्या हटके शुभेच्छांनी राजकीय भूवया उंचावल्या! माजी सीएम अखिलेश तेजस्वींना नेमकं काय म्हणाले?
यूपीच्या यादवांनी बिहारी यादवांना दिलेल्या हटके शुभेच्छांनी राजकीय भूवया उंचावल्या! माजी सीएम अखिलेश तेजस्वींना नेमकं काय म्हणाले?
भारतात कोणी गैर हिंदू नाहीत, मुस्लिम आणि ख्रिश्चनांचे पूर्वज हिंदू होते  मोहन भागवत
भारतात कोणी गैर हिंदू नाहीत, मुस्लिम आणि ख्रिश्चनांचे पूर्वज हिंदू होते : मोहन भागवत
Maharashtra Crime: मुंबईत धावत्या डंपरमध्ये मागून दुचाकी घुसली, दुचाकीवार चिरडल्याने जागीच ठार; बीडला ऑटो रिक्षा चालकाला स्कार्पिओने दीड किमी फरफटत नेलं
मुंबईत धावत्या डंपरमध्ये मागून दुचाकी घुसली, दुचाकीवार चिरडल्याने जागीच ठार; बीडला ऑटो रिक्षा चालकाला स्कार्पिओने दीड किमी फरफटत नेलं
Buldhana Election 2025: नामांकन दाखल करण्याची मुदत एक दिवसावर, पण बुलढाण्यात एकाही पक्षाचा उमेदवार ठरेना, आज मोठ्या राजकीय घडामोडी
नामांकन दाखल करण्याची मुदत एक दिवसावर, पण बुलढाण्यात एकाही पक्षाचा उमेदवार ठरेना, आज मोठ्या राजकीय घडामोडी
Tanaji Sawant: इकडे तानाजी सावंतांची मित्रपक्ष राष्ट्रवादीवर आगपाखड; सत्तेशिवाय राहूच शकत नाही म्हणत हल्लाबोल, तिकडं सावंतांना घेरण्यासाठी विरोधकांसह महायुतीही एकवटली
इकडे तानाजी सावंतांची मित्रपक्ष राष्ट्रवादीवर आगपाखड; सत्तेशिवाय राहूच शकत नाही म्हणत हल्लाबोल, तिकडं सावंतांना घेरण्यासाठी विरोधकांसह महायुतीही एकवटली
Ajit Pawar & Parth Pawar: 300 कोटी गुंतवताना एक वडील म्हणून पार्थने तुम्हाला विचारलं नाही का? अजित पवार म्हणाले....
300 कोटी गुंतवताना एक वडील म्हणून पार्थने तुम्हाला विचारलं नाही का? अजित पवार म्हणाले....
Tadoba-Andhari Tiger Reserve : ताडोबाच्या 'चंदा' आणि 'चांदणी' वाघिणींच्या स्थलांतराला स्थानिकांचा कडाडून विरोध; 'सह्याद्री'तील व्याघ्र पुनर्वसन रखडणार? 
ताडोबाच्या 'चंदा' आणि 'चांदणी' वाघिणींच्या स्थलांतराला स्थानिकांचा कडाडून विरोध; 'सह्याद्री'तील व्याघ्र पुनर्वसन रखडणार? 
Akola Riots : 'अकोला दंगल' चौकशीच्या एसआयटी रचनेवरून सर्वोच्च न्यायालयाच्या द्वि सदस्यीय खंडपीठात मतभेद; पारित केलेत दोन वेगवेगळे आदेश
'अकोला दंगल' चौकशीच्या एसआयटी रचनेवरून सर्वोच्च न्यायालयाच्या द्वि सदस्यीय खंडपीठात मतभेद; पारित केलेत दोन वेगवेगळे आदेश
Embed widget