एक्स्प्लोर
Advertisement
बिहारमध्ये कोणत्याही परिस्थितीत मध्यावधी होऊ नये : भाजप
भाजप सरकार स्थापन करणार का, या प्रश्नावर सुशील कुमार मोदी यांनी उत्तर दिलं. कोणत्याही आमदाराची मध्यावधीची इच्छा नाही, असं सुशील कुमार मोदी म्हणाले.
पाटणा : बिहारचे माजी उप मुख्यमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते सुशील कुमार मोदी यांनी नितीश कुमार यांच्या राजीनाम्याचं स्वागत केलं आहे. कोणत्याही परिस्थितीत मध्यावधी निवडणूक होऊ नये, अशी भूमिका भाजपने घेतली असल्याची माहिती सुशील कुमार मोदी यांनी दिली.
नितीश कुमार त्यांच्या प्रतिमेप्रमाणेच भ्रष्टाचारासमोर झुकले नाहीत. त्यांच्या या निर्णयाचं स्वागत आहे, असं सुशील कुमार मोदी म्हणाले.
भाजप सरकार स्थापन करणार का, या प्रश्नावर सुशील कुमार मोदी यांनी उत्तर दिलं. कोणत्याही आमदाराची मध्यावधीची इच्छा नाही, असं सुशील कुमार मोदी म्हणाले.
दरम्यान बिहार भाजपने विधीमंडळाच्या बैठकीत तीन सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. ही समिती राजकीय समिकरण आणि केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करणार आहे. या समितीमध्ये सुशील कुमार मोदी, प्रेम कुमार आणि बिहारचे प्रदेशाध्यक्ष नित्यानंद राय यांचा समावेश आहे.
नितीश कुमार यांची पहिली प्रतिक्रिया
“बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासूनची जी परिस्थिती सुरु आहे, त्यामध्ये काम करणं अशक्य झालं आहे. लालू यादव आणि काँग्रेसशी परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी चर्चा केली, मात्र काहीही तोडगा निघाला नाही”, अशी प्रतिक्रिया नितीश कुमार यांनी राजीनाम्यानंतर दिली.
जेडीयूच्या आमदारांच्या बैठकीनंतर नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.
बिहार विधानसभेतील पक्षीय बलाबल (एकूण 243 सदस्य) :
- आरजेडी (लालू) – 80
- जेडीयू (नितीश कुमार) – 71
- काँग्रेस – 27
- भाजप – 53
- सीपीआय – 3
- लोक जनशक्ती पार्टी – 2
- राष्ट्रीय लोक समता पार्टी – 2
- हिंदुस्तानी अवाम मोर्चा – 1
- अपक्ष – 4
कोण कुणाला फोडणार? बिहारचं राजकीय गणित काय असेल?
नितीश कुमार यांचा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
राजकारण
मुंबई
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion