एक्स्प्लोर

'पालकांच्या संमतीविना तरुणींना लग्नाचं किमान वय 18 ऐवजी 21 करा'

अलिकडे तरुणींनी पालकांच्या संमतीविना, म्हणजेच पळून जाऊन लग्न करण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे तरुणींसाठी लग्न करण्याच्या पात्रतेचं वय 18 वर्षांवरुन 21 वर्ष करावं, अशी मागणी गोपाळ शेट्टी यांनी केली.

नवी दिल्ली : पालकांच्या संमतीविना लग्न करण्याचं किमान वय तरुणींसाठी 18 वरुन 21 वर्षांवर न्यावं, अशी मागणी मुंबईतील भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी केली. शेट्टी यासंदर्भात लोकसभेत खाजगी सदस्य विधेयक सादर करणार आहेत. अलिकडे तरुणींनी पालकांच्या संमतीविना, म्हणजेच पळून जाऊन लग्न करण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे तरुणींसाठी लग्न करण्याच्या पात्रतेचं वय 18 वर्षांवरुन 21 वर्ष करावं, अशी मागणी गोपाळ शेट्टी यांनी केली. पालकांची संमती असेल तर 18 व्या वर्षी लग्न व्हावं, पण पालकांची संमती नसेल तर मुलींना 21 व्या वर्षापर्यंत लग्न करता येऊ नये, यासाठी ही मागणी केल्याचं गोपाळ शेट्टी म्हणाले. 'शाळा-कॉलेजमध्ये तरुणी 16-17 व्या वर्षी प्रेमात पडतात. नकळत्या वयात त्या लग्नाचा निर्णय घेतात. पालकांची परवानगी नसेल, तर या मुली अठराव्या वर्षी रजिस्टर पद्धतीने लग्न करतात. मात्र अशावेळी पालकांवर डोंगर कोसळतो. कायदाही तरुणींच्या बाजूने असल्यामुळे पालक काहीच करु शकत नाहीत', असं गोपाळ शेट्टी सांगतात. अठराव्या वर्षी आंधळ्या प्रेमातून लग्न केलं, मात्र काही वर्षांतच लग्न मोडल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे हे विधेयक आणणार असल्याचं शेट्टींनी स्पष्ट केलं. जर पालकांच्या इच्छेविरुद्ध तरुणींना लग्न करायचं असेल, तर त्यांना किमान वयाची अट 21 वर्ष करावी. त्यामुळे लग्नाच्या निर्णयाबाबत विचार करण्यासाठी त्यांना तीन वर्षांचा अतिरिक्त वेळ मिळेल. तरुणी तोपर्यंत मॅच्युअर होतील आणि लग्नाबाबत सक्षमपणे निर्णय घेऊ शकतील, असा विश्वास शेट्टींना वाटतो. मतदान 18 व्या वर्षी चालतं, मग त्या वयात लग्नाची परवानगी का नाही, असा प्रश्न गोपाळ शेट्टींना विचारण्यात आला. 'मत चुकलं तरी पुन्हा पाच वर्षांनी योग्य उमेदवाराला मतदान करण्याची संधी तुम्हाला मिळते. मात्र लग्नासारखा आयुष्यभराचा निर्णय चुकला, तर पश्चाताप करावा लागतो. त्यातून बाहेर पडता येतं, मात्र झालेलं नुकसान भरुन काढता येत नाही' असंही शेट्टी म्हणाले. पाहा व्हिडिओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sushma Andhare on Raj Thackeray : राज ठाकरे सुपाऱ्या वाजवतात, सुषमा अंधारेंचा जोरदार हल्लाबोलABP Majha Headlines : 11 PM : 12 May 2024  : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Full Speech Thane Sabha : फोडाफोडी, शरद पवार ते उद्धव ठाकरे, सभेत राज ठाकरे बरसलेTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 11 PM: 12 May 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
Embed widget