Bijapur Naxal News : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल-नक्षलवादी चकमक सुरू, सहा नक्षलवाद्यांचा खात्मा; टॉप कमांडर लिंगा, पापारावला जंगलात घेरलं
Chhattisgarh Naxal News : बिजापूर जिल्ह्यातील गंगालूर पोलिस स्टेशन हद्दीतील पीडिया जंगल परिसरात नक्षलवाद्यांचे टॉप कमांडर असल्याची माहिती सुरक्षा रक्षकांना मिळाली होती.
![Bijapur Naxal News : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल-नक्षलवादी चकमक सुरू, सहा नक्षलवाद्यांचा खात्मा; टॉप कमांडर लिंगा, पापारावला जंगलात घेरलं Bijapur Naxal Security forces encounter in Chhattisgarh six killed top commander linga paparao surrounded maharashtra gadchiroli news Bijapur Naxal News : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल-नक्षलवादी चकमक सुरू, सहा नक्षलवाद्यांचा खात्मा; टॉप कमांडर लिंगा, पापारावला जंगलात घेरलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/07/b89c8c8b032b8d0b4742efd7963ea3541709774400523658_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
गडचिरोली : छत्तीसगढमधील बिजापूर जिल्ह्यातील गंगालूल पोलिस स्टेशनच्या हद्दीतील पीडिया जंगल परिसरात नक्षलवाद्यांशी चकमक सुरू असून त्यामध्ये आतापर्यंत 6 नक्षलवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती समोर आली आहे. नक्षलवाद्यांच्या मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुरक्षा रक्षकांनी नक्षलवाद्यांच्या टॉप कमांडर लिंगा आणि पापारावला या जंगलात घेरल्याची माहिती आहे.
बिजापूर जिल्ह्यातील गंगालूर पोलिस स्टेशन हद्दीतील पीडिया जंगल परिसरात सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये मोठी चकमक सुरू आहे. गुरुवारी रात्री उशिरा जवानांच्या संयुक्त पथकाला नक्षल विरोधी अभियानासाठी या परिसरात रवाना करण्यात आलं होतं. त्यानंतर शुक्रवारी सकाळपासून ही चकमक सुरू आहे.
नक्षलवादी कमांडर लिंगा, पापाराव उपस्थित असल्याची माहिती
पीडिया जंगलात असलेल्या अनेक बड्या नक्षलवाद्यांना जवानांनी घेरल्याची माहिती आहे. दोन्हीकडून अजूनही अधूनमधून चकमक सुरू आहे. घटनास्थळावरून ठार झालेल्या नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. छत्तीसगडमधील तीन जिल्ह्यांतील जवान हे नक्षलविरोधी अभियानात असून सकाळपासून चकमक सुरू आहे. एक बडा नक्षलवादी नेता या जंगलात असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी ही कारवाई सुरू केली.
गांगलूर पोलीस स्टेशन हद्दीतील पीडिया भागातील जंगलात कट्टर नक्षलवादी कमांडर लिंगा, पापाराव आणि इतर मोठे नेते उपस्थित असल्याची माहिती सैनिकांना मिळाली होती. नक्षलवाद्यांच्या या समितीमध्ये डीकेएसझेडसी, डीव्हीसीएम आणि एसीएम कॅडरमधील बडे नक्षलवादीही आहेत.
माहितीनंतर शेजारच्या दंतेवाडा, सुकमा आणि विजापूर जिल्ह्यांतील एसटीएफ, डीआरजी, सीआरपीएफ आणि कोब्रा बटालियनच्या 1200 जवानांनी संयुक्त कारवाई केली. जिथे शुक्रवारी सकाळी जंगलात झालेल्या भीषण चकमकीत सहा नक्षलवादी ठार झाले.
या आधीच्या कारवाईत 10 नक्षलवादी मारले गेले
या आधी 30 एप्रिल रोजी बस्तर पोलिसांना नारायणपूर चकमकीत मोठे यश मिळाले होते. नक्षलवादी आणि जवानांमध्ये सुमारे 9 तास चाललेल्या चकमकीत जवानांनी 10 नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये 3 महिला आणि 7 पुरुष माओवाद्यांचा समावेश आहे. 29 एप्रिल रोजी नक्षलवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळताच सैनिक नारायणपूर आणि कांकेर जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात शोधासाठी निघाले होते. रात्रभर शोध घेतल्यानंतर 30 एप्रिलला सकाळी डीआरजी आणि एसटीएफच्या जवानांचा अबुझमाडमधील ताकामेटाच्या जंगलात नक्षलवाद्यांशी सामना झाला. त्यामध्ये 10 नक्षलवादी मारले गेले तर घटनास्थळावरून एके-47 सह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)