एक्स्प्लोर

मेल्यानंतर आपलं अंत्यदर्शन घ्यायला किती लोक येतील? पठ्ठ्याने स्वतःची अंत्ययात्रा काढली, सत्य समजल्यावर लोकांनी...

Bihar Viral News : हवाई दलातून निवृत्त झालेल्या एका कर्मचाऱ्याने स्वतःच्या खर्चाने स्मशानभूमी बांधली आणि अजब शक्कल लढवत स्वतःचीच अंत्ययात्रा काढली.

Bihar Viral Video : आपल्या आजूबाजूला अनेक विक्षिप्त लोक राहतात, त्याचा प्रत्यय अनेकदा येतो. सोशल मीडिया असो वा कोणतेही प्लॅटफॉर्म, लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी काय काय शक्कल लढवतील हे सांगता येत नाही. बिहारमध्ये (Bihar) एका हवाई दलातून (Air Force Veteran) निवृत्त झालेल्या सैनिकाने असं काही केलं की त्याला वेडं म्हणावं की काय असा प्रश्न अनेकांना पडला. आपण मेल्यावर आपल्या अंत्ययात्रेला कोण कोण येतं हे पाहण्यासाठी या व्यक्तीने मरण्याचं नाटक  केलं आणि स्वतःची अंत्ययात्राही काढली.

बिहारच्या गया जिल्ह्यातील कोंची गावात वायुसेनेतून निवृत्त झालेले 74 वर्षीय मोहनलाल (Mohan Lal Bihar) नावाच्या ज्येष्ठ नागरिकाने आपल्या मृत्यूच नाटक रचलं आणि अंत्ययात्राही (Funeral Procession) काढली. या विचित्र पण भावनिक घटनेची चर्चा सध्या सोशल मीडियावर (Social Media) जोरदार रंगली आहे.

Bihar Viral Video : मेल्यानंतर कोण येईल हे पाहण्यासाठी नाटक

मोहनलाल यांनी आपल्या गावात लोकांना अंत्यसंस्कारासाठी योग्य जागा मिळावी म्हणून स्वतःच्या खर्चाने, तब्बल सहा लाख रुपये खर्च करून स्मशानभूमी Cremation Ground) बांधले. पावसाळ्यात गावकऱ्यांना प्रेतांना अग्नी देताना खूप अडचणी यायच्या, त्यामुळे त्यांनी 6 लाख रुपयांच्या खर्चाने नवीन स्मशानभूमी उभारली.

या उपक्रमाची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून त्यांनी हटके आयडिया लढवली. स्वतःच्या ‘मृत्यू’ची बातमी पसरवली आणि तिरडीवर स्वतःचा पुतळा ठेवला आणि त्याची अंत्ययात्राही काढली.

मोहन लाल यांच्या अंत्ययात्रेत गावातील शेकडो लोक सहभागी झाले. अनेकांनी मोहनलाल यांच्या ‘मृत्यू’वर अश्रू ढाळले, काहींनी फुलांचे हारही अर्पण केले. थोड्या वेळानंतर जेव्हा मोहनलाल स्वतः हसत समोर आले, तेव्हा लोक अवाक् झाले. 'मला फक्त एवढं जाणून घ्यायचं होतं की, माझ्या जाण्यानंतर कोण कोण माझ्या अंत्ययात्रेला येईल. या ठिकाणी झालेली गर्दी पाहता लोक खरंच माझ्यावर किती प्रेम करतात हे समोर आलं.”

Mohanlal Bihar Viral News : सोशल मीडियावर चर्चा

गावातील लोकांनी त्यांच्या या उपक्रमाचं कौतुक केलं. अनेकांनी सांगितलं की, मोहनलाल यांच्यामुळेच आता गावात अंत्यसंस्कारासाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध झाली आहे.

दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला असून नेटिझन्स (Netizens) वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिलं, 'हे लोक भन्नाट आहेत पण हृदयाने चांगले आहेत'. तर दुसऱ्याने लिहिलं, 'लोकांचं प्रेम पाहण्यासाठी हा आयडिया मस्त आहे'. तर आणखी एका यूजरने म्हटलं, 'चाचा ऑन फायर आहेत, काय भन्नाट प्रयोग केला आहे.'

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : मेलोनींवर कमेंट, राहुल गांधींवर फौजदारी गुन्हा दाखल होणार? परदेशी पंतप्रधान खटला भरू शकतो का? काय आहे नियम?
मेलोनींवर कमेंट, राहुल गांधींवर फौजदारी गुन्हा दाखल होणार? परदेशी पंतप्रधान खटला भरू शकतो का? काय आहे नियम?
Independence Day 2026 Wishes : स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश
स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश
Maharashtra Live News Updates: 'सुनेत्रा पवार सगळ्यांना पुरून उरतील'; अभिनेते सयाजी शिंदे यांचे मोठे वक्तव्य 
Maharashtra Live News Updates: 'सुनेत्रा पवार सगळ्यांना पुरून उरतील'; अभिनेते सयाजी शिंदे यांचे मोठे वक्तव्य 
Census 2027: जात, धर्म, बँक खातं ते कोरोना लस कुठे घेतली?; जनगणनेवेळी तुम्हाला विचारले जाणारे 40 प्रश्न; पाहा संपूर्ण यादी!
जात, धर्म, बँक खातं ते कोरोना लस कुठे घेतली?; जनगणनेवेळी तुम्हाला विचारले जाणारे 40 प्रश्न; पाहा संपूर्ण यादी!

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
Embed widget