एक्स्प्लोर

महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री बहुजन समाजाचा : चंद्रशेखर आझाद

महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीची मोठी ताकद आहे मात्र तरीही इतरांकडे सारखे मागत फिरतात 'हमे सत्ता दो हमे सत्ता दो'. महाराष्ट्राच्या पुढच्या विधानसभा निवडणुकीत बहुजन समाजाचा मुख्यमंत्री होईल आणि या समाजाच्या हितासाठी काम करेल, असा विश्वास आझाद यांनी व्यक्त केला.

नवी दिल्ली : भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद उर्फ रावण महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्रामध्ये बहुजन समाज आणि अनुसूचित जातीतील समुदायाची इतकी मोठी संख्या असतानाही आम्ही कायम सत्तेपासून दूर का राहिलो, हे जवळून पाहण्यासाठी चाललो आहे, असं चंद्रशेखर आझाद यांनी सांगितलं. महाराष्ट्राच्या पुढच्या विधानसभा निवडणुकीत बहुजन समाजाचा मुख्यमंत्री होईल, असा विश्वासही आझाद यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र ही आमच्यासाठी पूजनीय भूमी आहे, कारण ती बाबासाहेबांची भूमी आहे. भीमा कोरेगाव हे आमच्यासाठी तीर्थस्थळ आहे. या मातीला नमन करण्यासाठी मी चाललो आहे, असं आझाद म्हणाले. 'एबीपी माझा'ला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत ते बोलत होते. आम्हाला दिलेली परवानगी नाकारल्याचं माझ्या कानावर आलं, पण संघटनेने ज्या ठिकाणी ठरवलं आहे, तिथेच सभा होईल. त्या ठिकाणचे वातावरण खराब होऊ नये ही सरकारची जबाबदारी असल्याचंही आझाद म्हणाले. महाराष्ट्रामध्ये बहुजन समाज आणि अनुसूचित जातीतील समुदायाची इतकी मोठी संख्या असतानाही आम्ही कायम सत्तेपासून दूर का राहिलो, हे जवळून पाहण्यासाठी चाललो आहे. महाराष्ट्रात आम्ही शासक बनू, मालक बनू यासाठी समाजाची ताकद मजबूत करायला चाललो आहे, असा एल्गारही आझाद यांनी केला. महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीची मोठी ताकद आहे मात्र तरीही इतरांकडे सारखे मागत फिरतात 'हमे सत्ता दो हमे सत्ता दो'. महाराष्ट्राच्या पुढच्या विधानसभा निवडणुकीत बहुजन समाजाचा मुख्यमंत्री होईल आणि या समाजाच्या हितासाठी काम करेल, असा विश्वास आझाद यांनी व्यक्त केला. खोटे गुन्हे लावले सहारनपूरमध्ये ज्यांनी आमच्यावरती अत्याचार केले त्यांनाच वाचवण्यासाठी माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले. माझ्यावरती एनएसए अंतर्गत गुन्हा दाखल केला. पण कोर्टात माझ्याविरोधात काहीच पुरावे मिळाले नाहीत. जेलमध्ये माझ्या वरती उपचार केले गेले नाहीत, माझ्या नातेवाईकांना भेटू दिले गेले नाही, असा दावा आझाद यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना केला. आपल्यावर झालेल्या अन्यायाचा सूड सरकारकडून घेण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. 2014 मध्ये 'भीम आर्मी'ची स्थापना केली. शिक्षणाच्या क्षेत्रातही आम्ही गेल्या काही दिवसांपासून काम करत आहोत. काशिराम हे माझे आदर्श आहेत, त्यांचा संघर्ष मी पाहिलेला आहे. तोच वारसा पुढे चालवायचा आहे, असा मानस चंद्रशेखर आझाद यांनी बोलून दाखवला. आझाद ते रावण चंद्रशेखर आझाद हे नाव माझ्या वडिलांनी दिलं. नंतर काही कारणांमुळे नंतर रावण हे नाव जोडलं गेलं. समाजाने दिलेलं नाव मी स्वीकारलं असल्याचंही ते म्हणाले. नंतर काही जण वेगळ्या पद्धतीने याचा वापर करु लागले. योगीजी प्रचारात म्हणू लागले, की जे रामभक्त आहेत त्यांनी आम्हाला मत द्यावं, आणि जे रावणभक्त आहेत, त्यांनी दुसऱ्या पक्षांना द्यावं, असंही आझाद यांनी सांगितलं. भीम आर्मी हे नाव कसं पडलं? भीम आर्मी बहुजन समाजाच्या हितासाठी, सुरक्षेसाठी काम करणारी आहे. लोक आमच्या घरात घुसून मारणार असतील तर आम्ही रक्षण करायचं नाही का? असा सवाल करत 'याला कुणी हिंसा म्हणणार असेल तर ते त्यांनी मानावं' असं चंद्रशेखर आझाद म्हणाले. मला रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार सारखे काही ना काही प्रयत्न करत आहे, हे लोकशाहीचं हनन असल्याचा आरोपही त्यांनी केला. राजकारणात येण्याचा तूर्तास विचार नाही. जे समाज आदेश देईल त्यानुसार काम करत राहणार, असंही त्यांनी स्पष्ट केलं. भाजपविरोधात राग भाजपविरोधात आमचा राग आहे, कारण भाजपला चालवणारा संघ आहे आणि संघ देशाला तोडण्याचे काम करत आहे, असा घणाघातही चंद्रशेखर आझादांनी केला. जे लोक या देशाच्या तिरंग्याला मानत नाहीत, ज्यांनी बाबासाहेबांचे विचार मातीत घालवले, जे पूर्णपणे संविधानविरोधी आहेत त्यांचा आम्ही विरोध करत आहोत, असंही ते म्हणाले. हे सरकार पूर्णपणे सामान्य नागरिकांच्या विरोधातलं आहे. बुलंदशहरमध्ये अनुसूचित जातीतील दोघांना मारल्यानंतर त्यांच्याबद्दल कुणी बोलत नाही, उलट हे मांस गायीचं होतं की आणखीन कुणाचं? याची चर्चा होते. भाजपची भूमिका ही दुतोंडी सापासारखी असून या सापांना आम्ही कदापि सत्तेत येऊ देणार नसल्याचंही आझाद म्हणाले. प्रकाश आंबेडकर यांनी कोणासोबत जावं हे मी आता सांगू शकत नाही. पण अनुसूचित जाती आणि मुस्लिम हे दोन्ही मोठे वर्ग आहेत ते एकत्र झाले आणि ओबीसींची त्यांना साथ मिळाली तर आम्हाला सत्ता मिळवण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकत नाही. मी काँग्रेस किंवा भाजपचं सरकार आणू इच्छित नाही आम्हाला बहुजनांचे सरकार हवं आहे, असंही चंद्रशेखर आझाद म्हणाले. मायावतींची मी स्तुती केली पण त्या माझ्यापासून का दुरावा बाळगत आहेत हे त्यांनाच माहित. भाजपच्या शासनात लोकशाहीचा गळा दाबला जात आहे. भीमा कोरेगाव प्रकरणात सरकारने जी कारवाई केली, ती स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी, असा आरोप आझाद यांनी केला. पाहा संपूर्ण मुलाखत
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

CEC Impeachment Row : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, विरोधकांचा संताप
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, विरोधकांचा संताप
बँकेत FD करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! कोणत्या बँकेत किती मिळतोय व्याजदर? जाणून घ्या सविस्तर माहिती
बँकेत FD करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! कोणत्या बँकेत किती मिळतोय व्याजदर? जाणून घ्या सविस्तर माहिती
भारतापेक्षा दुबईमध्ये सोने स्वस्त का मिळते? ऐकावेळी किती सोने आणता येते? जाणून घ्या सविस्तर माहिती
भारतापेक्षा दुबईमध्ये सोने स्वस्त का मिळते? ऐकावेळी किती सोने आणता येते? जाणून घ्या सविस्तर माहिती
West Bengal Election : ममता बॅनर्जी की BJP? बंगालमध्ये धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता, MATRIZE ओपिनियन पोलची आकडेवारी समोर
ममता बॅनर्जी की BJP? बंगालमध्ये धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता, MATRIZE ओपिनियन पोलची आकडेवारी समोर

व्हिडीओ

Sharad Pawar : पवार कुटुंबाचा प्रमुख म्हणून 'तो' माझा निर्णय, बारामती निवडणुकीवर शरद पवार नेमकं काय म्हणाले?
Sharad Pawar: बारामती निवडणुकीवरुन पार्थ पवारांचा काँग्रेसला इशारा; शरद पवारांचं स्मीतहास्य, एका वाक्यात विषय मिटवला
Dattatray Bharne Speech Baramati : हात जोडून विनंती विरोधी फॉर्म काढून घ्या,हीच दादांंना श्रद्धांजली
Laxman Hake On Baramati Election :आधी निवडणूक लढण्याची गर्जना, आता माघार का? लक्ष्मण हाके म्हणाले...
Anjali Damania PC : राऊत- अंधारेंवर प्रहार; सीडीआर कुठून आला? अंजली दमानियांचा मोठा खुलासा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: जळगावात एलपीजी गॅस पंपावरील गॅसचे दर महिनाभरात 53 वरून 130 रुपयांवर
Maharashtra Live blog updates: जळगावात एलपीजी गॅस पंपावरील गॅसचे दर महिनाभरात 53 वरून 130 रुपयांवर
CEC Impeachment Row : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, विरोधकांचा संताप
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, विरोधकांचा संताप
Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यात हजारो कोटींचे टेंडर मॅनेज, सर्वांचे कमिशन फिक्स; लाचखोर अधिकारी विलास लाडची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
नाशिक कुंभमेळ्यात हजारो कोटींचे टेंडर मॅनेज, सर्वांचे कमिशन फिक्स; लाचखोर अधिकारी विलास लाडची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
US-Iran Tension : एका रात्रीत इराणला संपवू शकतो, ती रात्र कदाचित उद्याच... डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, पश्चिम आशियातील तणाव वाढला
एका रात्रीत इराणला संपवू शकतो, ती रात्र कदाचित उद्याच... डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
मोगरा फुलला.... पुण्यातील दगडूशेठ गणेश मंदिरात 51 लाख फुलाची सजावट, बाप्पांचे मनमोहक रुप
मोगरा फुलला.... पुण्यातील दगडूशेठ गणेश मंदिरात 51 लाख फुलाची सजावट, बाप्पांचे मनमोहक रुप
नांदेडमध्ये मॉर्निंग वॉक गेलेल्या सोनूला संपवलं, हत्येचं कारण समोर; प्रेमसंबंधाची किनार, वडिलांची फिर्याद
नांदेडमध्ये मॉर्निंग वॉक गेलेल्या सोनूला संपवलं, हत्येचं कारण समोर; प्रेमसंबंधाची किनार, वडिलांची फिर्याद
Wealth Inequality India : धक्कादायक! देशातील 1 टक्के लोकांकडे 40 टक्के संपत्ती, फक्त 1,688 श्रीमंतांकडे देशाच्या 50 टक्के संपत्ती
धक्कादायक! देशातील 1 टक्के लोकांकडे 40 टक्के संपत्ती, फक्त 1,688 श्रीमंतांकडे देशाच्या 50 टक्के संपत्ती
IIT Baba Wedding: कुंभमेळ्यातील IIT यन बाबाचं शुभ मंगल सावधान; अभयची अर्धांगिनी आहे तरी कोण, कधी केलंय लग्न?
कुंभमेळ्यातील IIT यन बाबाचं शुभ मंगल सावधान; अभयची अर्धांगिनी आहे तरी कोण, कधी केलंय लग्न?
Embed widget