एक्स्प्लोर

Assam Flood : आसाममधील पूर ही 'गंभीर नैसर्गिक आपत्ती' म्हणून घोषीत, केंद्र सरकार करणार बाधितांचे पुनर्वसन 

केंद्र सरकारनं आसाम राज्यातील पूर ही 'गंभीर नैसर्गिक आपत्ती' म्हणून घोषित केल्याची माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी दिली आहे.

Assam Flood : पुरामुळं आसाम राज्याचे खूप मोठं नुकसान झालं आहे. पुरामुळं राज्यातील जवळपास 30 जिल्हे बाधित झाले होते. अतिवृष्टी आणि पुरामुळं अनेकांचा मृत्यू देखील झाला होता. तसेच शेतकऱ्यांच्या शेतजमिनीसह घरांचं देखील मोठं नुकसान झालं होतं. अशा या नुकसानग्रस्तांना केंद्र सरकारनं दिलासा दिला आहे. केंद्र सरकारनं राज्यातील पूर ही 'गंभीर नैसर्गिक आपत्ती' म्हणून घोषित केल्याची माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी दिली आहे. केंद्र सरकारकडून बाधित लोकांचे पुनर्वसन करण्यात येणार असून, सरकार पुनर्वसनाचा 90 टक्के खर्च उचलणार असल्याची माहिती सरमा यांनी दिली.

आसाममध्ये पुरामुळं जनजीवन विस्कळीत झालं होतं. तेथील नद्यांना पूर आल्यामुळं नागरिकांच्या घरात पाणी शिरलं होतं. अनेक कुटुंब यामुळं उघड्यावर आली होती. तसेच शेतीचंही मोठं नुकसान झालं आहे. या सर्वांना केद्र सरकारनं दिलासा दिला आहे. केंद्र सरकारच्या वतीनं बाधितांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. या पुरात ज्या विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकांचे नुकसान झालं आहे, अशा विद्यार्थ्यांना 1 हजार रुपये देण्यात येणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या अडचणी दूर करण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.  तसेच पायाभूत सुविधा पुरवण्याचे आणि पुनर्वसन करण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिल्याचे सरमा म्हणाले.


Assam Flood : आसाममधील पूर ही 'गंभीर नैसर्गिक आपत्ती' म्हणून घोषीत, केंद्र सरकार करणार बाधितांचे पुनर्वसन 

90 लाख लोक बाधित

6 एप्रिलपासून आसामला दोनदा पुराचा फटका बसला आहे. दुसरा पूर अधिक विनाशकारी होता. 90 लाख लोक म्हणजे राज्याच्या लोकसंख्येच्या एक तृतीयांश लोकांवर या पुराचा परिणाम झाला. तर या पुरामुळं 195 लोकांनी आपला जीव गमावला. अद्याप 37 जण बेपत्ता आहेत. आम्ही इतका भीषण पूर कधीच पाहिला नसल्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले.  बाधित लोकांना मदत शिबिरांमध्ये नेणे, त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणे, वैद्यकीय मदत देणे आणि पाणी ओसरल्यानंतर त्यांना घरी परतण्यास मदत करणे हे आमचे प्राधान्य होते. हे खूप आव्हानात्मक होते असेही सरमा म्हणाले. 


Assam Flood : आसाममधील पूर ही 'गंभीर नैसर्गिक आपत्ती' म्हणून घोषीत, केंद्र सरकार करणार बाधितांचे पुनर्वसन 

1 लाख 89 हजार 752 कुटुंबांना मदत

जवळपास 98 हजाराहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. तर 7 लाख 42 हजार 250 लोक विस्थापित झाले आहेत. त्यांनी मदत शिबिरांमध्ये आश्रय घेतला आहे. राज्य सरकारनं पहिल्यांदाच घरी परतणाऱ्यांना प्रति कुटुंब 3 हजार 800 रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे 1 लाख 89 हजार 752 कुटुंबांची ओळख पटली आहे. त्यांना मदत अदा करण्याच आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

या पुरामुळं बंधारे, रस्ते, पूल, शाळा, सरकारी इमारती आणि अंगणवाडी केंद्रांसारख्या खराब झालेल्या इमारतींचे ऑगस्टमध्ये मूल्यांकन करुन पुनर्बांधणी केली जाईल. पूर ही 'राष्ट्रीय समस्या' म्हणून घोषित करावी का, असे विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की, काही सामाजिक संघटनांनी अशी मागणी केली होती. परंतू केंद्र सरकारनं यापूर्वीच आसाममधील पूर ही 'गंभीर नैसर्गिक आपत्ती' म्हणून घोषित केली आहे. 

महत्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही;  मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही; मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
Aaditya Thackeray : भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pankaja Munde Majha Vision|संतोष देशमुख, धनूभाऊंचा राजीनामा,माझा व्हिजनवर पंकजा मुंडे भरभरून बोलल्याAjit Pawar Majha Vision: धनंजय मुंडेंचा राजीनामा ते नितेश राणेंवर रोखठोक भाष्य, अजित पवारांचं व्हिजनSpecial Report Jaykumar Gorhe : जयकुमार गोरेवर गंभीर आरोप, आता खंडणीसाठी अटक नेमकं प्रकरण काय?Imtiaz Jaleel Majha Vision| नागपूर दंगल ते औरंगजेब, माझा व्हिजनमध्ये जलीलांचा भाजप, आझमींवर निशाणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही;  मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही; मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
Aaditya Thackeray : भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
स्तन पकडणे, पायजम्याची नाडी खोलणे बलात्कार नाही; अलाहाबाद कोर्टाच्या निकालावर संताप, नीलम गोऱ्हेंचं सर्वोच्च न्यायालयास पत्र
स्तन पकडणे, पायजम्याची नाडी खोलणे बलात्कार नाही; अलाहाबाद कोर्टाच्या निकालावर संताप, नीलम गोऱ्हेंचं सर्वोच्च न्यायालयास पत्र
राज्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही; एकनाथ शिंदेंचा शब्द; म्हणाले, कुठलीच योजना बंद नाही
राज्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही; एकनाथ शिंदेंचा शब्द; म्हणाले, कुठलीच योजना बंद नाही
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
Video: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का?  दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, शीsss..
Video: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का? दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, शीsss..
Embed widget