एक्स्प्लोर

Assam Flood : आसाममधील पूर ही 'गंभीर नैसर्गिक आपत्ती' म्हणून घोषीत, केंद्र सरकार करणार बाधितांचे पुनर्वसन 

केंद्र सरकारनं आसाम राज्यातील पूर ही 'गंभीर नैसर्गिक आपत्ती' म्हणून घोषित केल्याची माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी दिली आहे.

Assam Flood : पुरामुळं आसाम राज्याचे खूप मोठं नुकसान झालं आहे. पुरामुळं राज्यातील जवळपास 30 जिल्हे बाधित झाले होते. अतिवृष्टी आणि पुरामुळं अनेकांचा मृत्यू देखील झाला होता. तसेच शेतकऱ्यांच्या शेतजमिनीसह घरांचं देखील मोठं नुकसान झालं होतं. अशा या नुकसानग्रस्तांना केंद्र सरकारनं दिलासा दिला आहे. केंद्र सरकारनं राज्यातील पूर ही 'गंभीर नैसर्गिक आपत्ती' म्हणून घोषित केल्याची माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी दिली आहे. केंद्र सरकारकडून बाधित लोकांचे पुनर्वसन करण्यात येणार असून, सरकार पुनर्वसनाचा 90 टक्के खर्च उचलणार असल्याची माहिती सरमा यांनी दिली.

आसाममध्ये पुरामुळं जनजीवन विस्कळीत झालं होतं. तेथील नद्यांना पूर आल्यामुळं नागरिकांच्या घरात पाणी शिरलं होतं. अनेक कुटुंब यामुळं उघड्यावर आली होती. तसेच शेतीचंही मोठं नुकसान झालं आहे. या सर्वांना केद्र सरकारनं दिलासा दिला आहे. केंद्र सरकारच्या वतीनं बाधितांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. या पुरात ज्या विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकांचे नुकसान झालं आहे, अशा विद्यार्थ्यांना 1 हजार रुपये देण्यात येणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या अडचणी दूर करण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.  तसेच पायाभूत सुविधा पुरवण्याचे आणि पुनर्वसन करण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिल्याचे सरमा म्हणाले.


Assam Flood : आसाममधील पूर ही 'गंभीर नैसर्गिक आपत्ती' म्हणून घोषीत, केंद्र सरकार करणार बाधितांचे पुनर्वसन 

90 लाख लोक बाधित

6 एप्रिलपासून आसामला दोनदा पुराचा फटका बसला आहे. दुसरा पूर अधिक विनाशकारी होता. 90 लाख लोक म्हणजे राज्याच्या लोकसंख्येच्या एक तृतीयांश लोकांवर या पुराचा परिणाम झाला. तर या पुरामुळं 195 लोकांनी आपला जीव गमावला. अद्याप 37 जण बेपत्ता आहेत. आम्ही इतका भीषण पूर कधीच पाहिला नसल्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले.  बाधित लोकांना मदत शिबिरांमध्ये नेणे, त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणे, वैद्यकीय मदत देणे आणि पाणी ओसरल्यानंतर त्यांना घरी परतण्यास मदत करणे हे आमचे प्राधान्य होते. हे खूप आव्हानात्मक होते असेही सरमा म्हणाले. 


Assam Flood : आसाममधील पूर ही 'गंभीर नैसर्गिक आपत्ती' म्हणून घोषीत, केंद्र सरकार करणार बाधितांचे पुनर्वसन 

1 लाख 89 हजार 752 कुटुंबांना मदत

जवळपास 98 हजाराहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. तर 7 लाख 42 हजार 250 लोक विस्थापित झाले आहेत. त्यांनी मदत शिबिरांमध्ये आश्रय घेतला आहे. राज्य सरकारनं पहिल्यांदाच घरी परतणाऱ्यांना प्रति कुटुंब 3 हजार 800 रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे 1 लाख 89 हजार 752 कुटुंबांची ओळख पटली आहे. त्यांना मदत अदा करण्याच आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

या पुरामुळं बंधारे, रस्ते, पूल, शाळा, सरकारी इमारती आणि अंगणवाडी केंद्रांसारख्या खराब झालेल्या इमारतींचे ऑगस्टमध्ये मूल्यांकन करुन पुनर्बांधणी केली जाईल. पूर ही 'राष्ट्रीय समस्या' म्हणून घोषित करावी का, असे विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की, काही सामाजिक संघटनांनी अशी मागणी केली होती. परंतू केंद्र सरकारनं यापूर्वीच आसाममधील पूर ही 'गंभीर नैसर्गिक आपत्ती' म्हणून घोषित केली आहे. 

महत्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
Ajit Pawar : मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली

व्हिडीओ

Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report
Nashik Sudhakar Badgujar : एबी फॉर्मची मारामार बडगुजरांनी लाटले चार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
Ajit Pawar : मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
आम्ही महायुतीसोबच, पण..; रामदास आठवलेंचं बंड झालं थंड; देवेंद्र फडणवीसांकडून मिळाला शब्द
आम्ही महायुतीसोबच, पण..; रामदास आठवलेंचं बंड झालं थंड; देवेंद्र फडणवीसांकडून मिळाला शब्द
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे-पवारांच्या युतीला दे धक्का; उमेदवाराने परस्पर अर्ज माघारी घेतला; निवडणुकांपूर्वीच 1 जागा झाली कमी
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे-पवारांच्या युतीला दे धक्का; उमेदवाराने परस्पर अर्ज माघारी घेतला; निवडणुकांपूर्वीच 1 जागा झाली कमी
साडेतीन वर्षांनी नवाब मलिक मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर, म्हणाले, काहींनी बोंबाबोंब केली, तरी अजितदादा माझ्या पाठिशी उभे राहिले! निवडणूक आयोगाच्या कारभारावर सडकून प्रहार
साडेतीन वर्षांनी नवाब मलिक मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर, म्हणाले, काहींनी बोंबाबोंब केली, तरी अजितदादा माझ्या पाठिशी उभे राहिले! निवडणूक आयोगाच्या कारभारावर सडकून प्रहार
ITC : केंद्राच्या निर्णयाचा सलग दुसऱ्या दिवशी ITC ला फटका, दोन दिवसात 72300 कोटी स्वाहा, LIC चे 11460 कोटी पाण्यात
ITC चा स्टॉक सलग दुसऱ्या दिवशी कोसळला, दोन दिवसात 73200 कोटी स्वाहा, LIC चे 11460 कोटी बुडाले
Embed widget