एक्स्प्लोर

Manmohan Singh's Demise : मनमोहन सिंगांच्या सरकारविरोधात देशभर रान उठवलं, दिल्लीत आंदोलन केलं, त्यांच्या निधनाची वार्ता ऐकताच अण्णा हजारे म्हणाले...

Manmohan Singh's Demise : मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर काही माणसं जन्माला येतात आणि जातात मात्र, काही माणसं समाज आणि देशाचा विचार करतात. त्यापैकी मनमोहन सिंग होते, असे उद्गार अण्णा हजारे यांनी काढले आहे.

Manmohan Singh Death : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं काल (गुरूवारी ता 26) निधन (Dr Manmohan Singh passes Away) झालं आहे. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या निधनामुळे देशभरात शोक व्यक्त केला जात आहे. तर डॉ. मनमोहन सिंग यांना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच यावेळी त्यांच्या आठवणींना देखील उजाळा दिला आहे. काही माणसं जन्माला येतात आणि जातात मात्र, काही माणसं समाज आणि देशाचा विचार करतात. त्यापैकी मनमोहन सिंग होते, असे उद्गार अण्णा हजारे यांनी काढले आहे.

त्याचबरोबर त्यांच्याबाबच्या आठवणी सांगताना अण्णा हजारे म्हणाले, आंदोलनाच्या माध्यमातून डॉ. मनमोहन सिंग यांची आणि माझी अनेक वेळा भेट झाली. नेहमी देशाविषयी आणि समाजाविषयी आस्था असणाऱ्या माणसाचे दुःखद निधन झाल्याने दुःख वाटते आहे, अशा भावना अण्णा हजारे यांनी यावेळी व्यक्त केल्या आहे. मनमोहन सिंग हे खऱ्या अर्थाने सच्चा माणूस होते. नेहमी देशाचा विचार करायचे निसर्गाच्या रूढीप्रमाणे माणसं येतात-जातात. मात्र, एक सच्चा माणूस गेल्याने दुःख वाटले अशी प्रतिक्रिया जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली आहे.

देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशातील विविध स्तरातून शोक व्यक्त होत आहे. त्यांनी देशातील अनेक महत्त्वाच्या पदांवरती काम केलं आहे, त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय देखील घेतलेले आहेत. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे दोन वेळाचे देशाचे पंतप्रधान होते. 2004 ते 2014 या 10 वर्षाच्या काळात त्यांनी देशाचं पंतप्रधानपद भूषवलं होतं. देशाच्या अर्थव्यवस्थेतील ऐतिहासिक बदलांसाठी ते कायम देशवासियांच्या स्मरणात आहेत.  डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी समजताच राजकीय, सामाजिक, कला, क्रिडा, साहित्य क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनानंतर भारतात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

मनमोहन सिंग यांच्या जाण्याने देशाचं नुकसान- चंद्रशेखर बावनकुळे

आज आपल्या संपूर्ण देशामध्ये देशामध्ये दुःखाची लाट आहे. देशाचे माजी प्रधानमंत्री अर्थतज्ञ मनमोहन सिंगजी आपल्यात नाहीत. भारत सरकारने सात दिवस दुखवटा जाहीर केला आहे. अत्यंत संवेदनशील, शांतपणे आणि सर्वांना सांभाळून आणि आदराच स्थान निर्माण करण्याचं काम मनमोहन सिंग यांनी केलं. मनमोहन सिंग यांची कारकीर्द, त्यांचा राजकीय प्रवास आणि मनमोहन सिंगजी यांच्या ज्या देशाला विकासाकडे नेण्याकरता ज्या ठेवी ठेवलेल्या आहेत, त्या पुढच्या काळात पुढच्या पिढीला आमच्या सारख्या पिढीसाठी प्रेरणादायी आहेत, मी त्यांना श्रद्धांजली व्यक्त करतो अशी भावना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केल्या आहेत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

CBI च्या नव्या संचालकांच्या नियुक्तीवर महत्त्वाची बैठक, महाराष्ट्राच्या महासंचालकांचे नाव चर्चेत; राहुल गांधींचा विरोध, Note of Dissent सादर
CBI च्या नव्या संचालकांच्या नियुक्तीवर महत्त्वाची बैठक, महाराष्ट्राच्या महासंचालकांचे नाव चर्चेत; राहुल गांधींचा विरोध, Note of Dissent सादर
एअर इंडियानं उचललं मोठं पाऊल, तब्बल 1000 हून अधिक कर्मचाऱ्यांना दिला नारळ, नेमकं कारण काय? 
एअर इंडियानं उचललं मोठं पाऊल, तब्बल 1000 हून अधिक कर्मचाऱ्यांना दिला नारळ, नेमकं कारण काय? 
RBI  : सर्वोदय सहकारी बँकेवर RBI ची मोठी कारवाई, खराब आर्थिक स्थितीमुळे परवाना रद्द
RBI  : सर्वोदय सहकारी बँकेवर RBI ची मोठी कारवाई, खराब आर्थिक स्थितीमुळे परवाना रद्द
Khan Sir On Paper Leak : मुलांचे 10 रुपयाचे डायपर लीक होत नाही, यांचा NEET पेपर लीक होतो; खान सर NTA वर संतापले
मुलांचे 10 रुपयाचे डायपर लीक होत नाही, यांचा NEET पेपर लीक होतो; खान सर NTA वर संतापले

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule on Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे!
Kolhapur Gold Silver : सोनं खरेदी थांबवा मोदींकडून आवाहन, कोल्हापुरातील सराफा व्यापारी काय म्हणाले?
Ambadas Danve on Modi : मोदींना आवाहन करावं लागतं म्हणजे त्यांनी अपयशाची कबुली दिली
Tamil Nadu News : तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट? प्रकरण काय?
Raj Thackeray On Modi : देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय- राज ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Khan Sir On Paper Leak : मुलांचे 10 रुपयाचे डायपर लीक होत नाही, यांचा NEET पेपर लीक होतो; खान सर NTA वर संतापले
मुलांचे 10 रुपयाचे डायपर लीक होत नाही, यांचा NEET पेपर लीक होतो; खान सर NTA वर संतापले
Rahul Gandhi : पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
महाराष्ट्रात सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील वापरतात; मोदींचे आवाहन, जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरुन हल्लाबोल
महाराष्ट्रात सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील वापरतात; मोदींचे आवाहन, जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरुन हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
NEET Exam Cancelled : नीट परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
NEET परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
Embed widget