एक्स्प्लोर

Amarnath Yatra : अमरनाथ यात्रेसाठी 3 लाख भाविकांची नोंदणी, यंदा यात्रेला विक्रमी गर्दी होण्याची शक्यता, असा असेल बंदोबस्त

Amarnath Yatra 2022 : यंदा अमरनाथ यात्रेसाठी 8 लाखांहून अधिक भाविक येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याआधी 2018 साली अमरनाथ यात्रेला 2.85 लाख यात्रेकरू आले होते.

Amarnath Yatra 2022 : 30 जूनपासून सुरु होत असलेल्या अमरनाथ यात्रेला यंदा विक्रमी गर्दी होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत या यात्रेसाठी तीन लाख यात्रेकरुंनी नोंदणी केली आहे. ही नोंदणी देशभरातील 566 केंद्रांवर करण्यात आली आहे. यंदा आठ लाखांहून अधिक भाविक यात्रेसाठी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनामुळे दोन वर्षानंतर यात्रा होत असल्याने यंदा यात्रेकरूंची मोठी गर्दी पाहायला मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर जम्मू परिसरात पोलिसांकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी घेतली जात आहे. 

8 लाखांहून अधिक भाविक येण्याची शक्यता
यंदा अमरनाथ यात्रेसाठी जास्तीत जास्त भाविक येण्याची अपेक्षा आहे. यापूर्वी 2018 मध्ये यात्रेसाठी 2.85 लाख भाविक आले होते. 2011 मध्ये सर्वाधिक 6.35 लाख यात्रेकरू आले होते. तर यंदाच्या वर्षी यात्रेसाठी आठ लाखांहून अधिक भाविक यात्रेसाठी येऊ शकतात, असा जम्मू-काश्मीर प्रशासनाचा अंदाज आहे.

अतिरिक्त पाच हजार सैनिकांचा बंदोबस्त
जम्मूमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था करण्यासाठी अतिरिक्त पाच हजार सैनिकांचा बंदोबस्त करण्यात आला आहे. अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांचा कारवायांना आळा घालण्यासाठी अतिरिक्त जवान तैनात करण्यात आले आहेत. 43 दिवसांच्या अमरनाथ यात्रेला 30 जूनपासून सुरूवात होत आहे. कोरोनामुळे अमरनाथ यात्रा दोन वर्ष रद्द करण्यात आली होती. त्यामुळे यंदा यात्रेला भाविकांची मोठी गर्दी उसळण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत पोलिसांकडून सुरक्षेचा आराखडा तयार करण्यात आला आहे. 

कडेकोट सुरक्षा व्यवस्था
कोरोना महामारीमुळे ही यात्रा तीन वर्ष रद्द झाली होती. यात्रेसाठी प्रशासनाकडून सर्व प्रकारची तयारी करण्यात येत आहे. यात्रेसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्थाही ठेवण्यात आली असून प्रशासन सतर्क आहे. त्यासाठी जवानांकडून परिसरात पाळत ठेवली जात आहे. ड्रोनच्या निगराणीची व्यवस्था करण्यात आली आहे.

यात्रेकरूंची सोय लक्षात घेता प्रशासन त्यांच्या मुक्काम, भोजन आणि वैद्यकीय सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी पहिल्यांदाच सहा रुग्णालयं उभारण्यात आली आहेत. पहलगाम, बालटाल आणि सोनमर्ग येथेही कोविड केअर रुग्णालयं उभारण्यात आली आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

UCC : जर राम एकच लग्न करणार तर रहीम दोन-चार लग्न करणार का? दुसरं लग्न करणाऱ्याला राज्यात राहू दिलं जाणार नाही; भाजपच्या मुख्यमंत्र्यांचं खळबळजनक वक्तव्य
जर राम एकच लग्न करणार तर रहीम दोन-चार लग्न करणार का? दुसरं लग्न करणाऱ्याला राज्यात राहू दिलं जाणार नाही; भाजपच्या मुख्यमंत्र्यांचं खळबळजनक वक्तव्य
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
Monsoon Session 2026 : काय आहे 'मिशन 360'? बजेट सत्रानंतर कसं बदललं संसदेचं गणित? मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पास होणार का?
काय आहे 'मिशन 360'? बजेट सत्रानंतर कसं बदललं संसदेचं गणित? मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पास होणार का?

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget