एक्स्प्लोर

मी तसं म्हणालोच नाही, कृषी कायद्यासंदर्भातील 'त्या' वक्तव्यावर कृषीमंत्री तोमर यांचे स्पष्टीकरण...

कृषी कायदे रद्द केल्यामुळे आम्ही नाराज नाही. 'एक कदम पिछे हटे है, आगे फिर बढेंगे' असे वक्तव्य कृषीमंत्री तोमर यांनी केले होते. या वक्तव्यावर जोरदार टीका होत आहे. आता यावर तोमर यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

नवी दिल्ली :  कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर (Narendra Singh Tomar) यांनी कृषी कायद्यांबाबत केलेल्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या वक्तव्यावरुन राजकीय आरोप प्रत्यारोप देखील सुरू आहेत. कृषी कायदे रद्द केल्यामुळे आम्ही नाराज नाही. 'एक कदम पिछे हटे है, आगे फिर बढेंगे' असे विधान कृषीमंत्री तोमर यांनी केले होते. त्यांच्या या विधानामुळे कृषी कायद्यांबाबत केंद्र सरकार पुन्हा काही नवीन विचार करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. मात्र, तोमर यांनी या विधानावर अखेर स्पष्टीकरण दिले आहे.

नागपूरमध्ये आयोजीत करण्यात आलेल्या कृषी शिखर संमेलनात बोलताना नरेंद्रसिंग तोमर यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल प्रसारमाध्यमांनी त्यांनी विचारला होता. याबवर बोलताना तोमर म्हणाले की, केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे चांगले होते. मात्र, काही कारणांमुळे ते रद्द करण्यात आले. भारत सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करेल. आम्ही पुन्हा कायदा आणू, असे मी म्हटले नव्हते, असे स्पष्टीकरण तोमर यांनी दिले आहे.

मोदी सरकारने 70 वर्षानंतर शेती क्षेत्रात बदल घडवणारे कायदे केले होते. मात्र, काही जणांना या सुधारणा योग्य वाटल्या नाहीत, अस म्हणत तोमर यांनी विरोधकांना टोला लगावला होता. शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे. शेतकरी मजबूत राहीला तर देश मजबूत होणार असल्याचे तोमर म्हणाले. कोरोनाच्या क्षेत्राचा सर्व क्षेत्राला फटका बसला, मात्र, कृषी अर्थव्यवस्था या प्रतिकूल परिस्थितीतही मजबूत स्थितीत राहिल्याचे तोमर म्हणाले होते. तसेच 'एक कदम पिछे हटे है, आगे फिर बढेंगे' या त्यांच्या विधानामुळे वेगळीच चर्चा सुरू झाली होती. 

कृषीमंत्री तोमर यांनी केलेल्या या वक्तव्यावर काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनी देखील टीका केली आहे. केंद्र सरकारने जर आता शेतकरी विरोधी भूमिका घेतली, तर पुन्हा देशातील अन्नदाता आंदोलन करेल, असा इशारा  राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी दिला आहे. पहिल्यांदा अहंकाराला हरवले होते, आता पुन्हा तुमच्या अहंकाराला हरवू असे गांधी म्हणालेत. तसेच कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या मागितलेल्या माफीचा अपमान केला असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. तर तोमर यांच्या विधानाने तीन शेतकरी विरोधी कृषी कायदे परत आणण्याचे षडयंत्र उघड केले आहे. कृषीमंत्र्यांच्या वक्तव्याने मोदी सरकारचे शेतकरी विरोधी कारस्थान आणि चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर मोदी सरकार पुन्हा एकदा तीन काळे शेतकरी विरोधी कायदे नव्या स्वरूपात आणण्याचा कट रचत असून भांडवलदारांच्या दबावाखाली ते करत असल्याची टीक काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

देवाच्या नावाखाली 60 हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठीच शक्तिपीठ महामार्ग; त्यापेक्षा विदर्भ ते कोकण जोडणारा कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वेमार्ग तातडीने पूर्ण करा; राजू शेट्टींचा हल्लाबोल
देवाच्या नावाखाली 60 हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठीच शक्तिपीठ महामार्ग; त्यापेक्षा विदर्भ ते कोकण जोडणारा कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वेमार्ग तातडीने पूर्ण करा; राजू शेट्टींचा हल्लाबोल
मुंबईत वर्षा गायकवाडांच्या बालहट्टानं काय मिळवलं? कार्यकर्ते असूनही काँग्रेसने तब्बल 20 जागा वाऱ्यावर सोडल्या, वंचितने सुद्धा 16 जागांवर उमेदवार दिलेच नाहीत
मुंबईत वर्षा गायकवाडांच्या बालहट्टानं काय मिळवलं? कार्यकर्ते असूनही काँग्रेसने तब्बल 20 जागा वाऱ्यावर सोडल्या, वंचितने सुद्धा 16 जागांवर उमेदवार दिलेच नाहीत
कुंभमेळ्याचे बजेट गिरीश महाजन विरोधीपक्ष फोडण्यासाठी वापरतात; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप
कुंभमेळ्याचे बजेट गिरीश महाजन विरोधीपक्ष फोडण्यासाठी वापरतात; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप
IAS तुकाराम मुंढेंनी सांगितली 'आयुष्य घडवणारी आठवण'; 25 मे 2005 रोजीचा अत्यानंदी दिवस
IAS तुकाराम मुंढेंनी सांगितली 'आयुष्य घडवणारी आठवण'; 25 मे 2005 रोजीचा अत्यानंदी दिवस

व्हिडीओ

Aaditya Thackeray Speech Dadar : आदित्य ठाकरेंचं दादरमध्ये दणदणीत भाषण, मुख्यमंत्र्‍यांवर टीका
Raj Thackeray Nashik Speech : तपोवन ते फडणवीस, जनसंघ ते भाजप ; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण
Uddhav Thackeray Speech Nashik : भाजपने झेंड्यावरील हिरवा रंग काढावा ; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले
Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE
Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देवाच्या नावाखाली 60 हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठीच शक्तिपीठ महामार्ग; त्यापेक्षा विदर्भ ते कोकण जोडणारा कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वेमार्ग तातडीने पूर्ण करा; राजू शेट्टींचा हल्लाबोल
देवाच्या नावाखाली 60 हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठीच शक्तिपीठ महामार्ग; त्यापेक्षा विदर्भ ते कोकण जोडणारा कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वेमार्ग तातडीने पूर्ण करा; राजू शेट्टींचा हल्लाबोल
मुंबईत वर्षा गायकवाडांच्या बालहट्टानं काय मिळवलं? कार्यकर्ते असूनही काँग्रेसने तब्बल 20 जागा वाऱ्यावर सोडल्या, वंचितने सुद्धा 16 जागांवर उमेदवार दिलेच नाहीत
मुंबईत वर्षा गायकवाडांच्या बालहट्टानं काय मिळवलं? कार्यकर्ते असूनही काँग्रेसने तब्बल 20 जागा वाऱ्यावर सोडल्या, वंचितने सुद्धा 16 जागांवर उमेदवार दिलेच नाहीत
कुंभमेळ्याचे बजेट गिरीश महाजन विरोधीपक्ष फोडण्यासाठी वापरतात; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप
कुंभमेळ्याचे बजेट गिरीश महाजन विरोधीपक्ष फोडण्यासाठी वापरतात; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप
IAS तुकाराम मुंढेंनी सांगितली 'आयुष्य घडवणारी आठवण'; 25 मे 2005 रोजीचा अत्यानंदी दिवस
IAS तुकाराम मुंढेंनी सांगितली 'आयुष्य घडवणारी आठवण'; 25 मे 2005 रोजीचा अत्यानंदी दिवस
Shahada Accident : भीषण अपघात! प्रवासी टॅक्सी आणि ट्रकची जोरदार धडक; पाच जण गंभीर तर दोघांची प्रकृती चिंताजनक, कारचा अक्षरश: चक्काचूर
भीषण अपघात! प्रवासी टॅक्सी आणि ट्रकची जोरदार धडक; पाच जण गंभीर, तर दोघांची प्रकृती चिंताजनक, कारचा अक्षरश: चक्काचूर
Akola News : कुपवाड्यातील दहशतवाद विरोधी कारवाईत महाराष्ट्राच्या शूर जवानाला वीरमरण; शहीद नायक वैभव लहानेंना अकोल्यात मानवंदना
कुपवाड्यातील दहशतवाद विरोधी कारवाईत महाराष्ट्राच्या शूर जवानाला वीरमरण; शहीद नायक वैभव लहानेंना अकोल्यात मानवंदना
Nanded Municipal Election 2026: 'एक वेळेस संधी द्या, वर्षभरात विकास झाला नाही तर राजीनामा देईन'; ठाकरे गटाच्या महिला उमेदवाराकडून थेट शासकीय बाँडवर हमी!
'एक वेळेस संधी द्या, वर्षभरात विकास झाला नाही तर राजीनामा देईन'; ठाकरे गटाच्या महिला उमेदवाराकडून थेट शासकीय बाँडवर हमी!
Kolhapur Municipal Corporation Election: 'निवडून आल्यावर आम्ही भ्रष्टाचार करणार नाही, पक्ष सोडणार नाही' कोल्हापुरात 'आप' राजर्षी शाहू आघाडीच्या उमेदवारांचे मतदारांना स्टॅम्पवर शपथपत्र
'निवडून आल्यावर आम्ही भ्रष्टाचार करणार नाही, पक्ष सोडणार नाही' कोल्हापुरात 'आप' राजर्षी शाहू आघाडीच्या उमेदवारांचे मतदारांना स्टॅम्पवर शपथपत्र
Embed widget