एक्स्प्लोर

Odisha Train Accident: बाप हा बाप असतो! पोराचं नाव मृतांमध्ये पण शवगृहातून त्याला जिवंत शोधून काढलं

Odisha Train Accident: कोलकातामध्ये राहणाऱ्या हेलाराम मलिक यांनी अपघातानंतर आपल्या मुलाचा शोध घेण्यासाठी तात्काळ बालासोर गाठलं. तिथे शवगृहात त्यांना त्यांचा मुलगा भेटला.

Odisha Train Accident:   ओडिशामधील (Odisha) बालासोरमध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातामध्ये (Railway Accident) अनेक मन हेलावून टाकणारी दृश्य समोर आली आहेत. लोकांनी आपली माणसं शोधण्यासाठी पूर्ण आकाशपाताळ एक करत आहे. मृतदेहांच्या ढिगाऱ्यामध्ये कोणी आपला मुलगा शोधत आहे तर कोणी आपला भाऊ शोधत आहे. परंतु या सगळ्यामध्ये असेही काही लोक आहेत ज्यांनी आपलं माणूस सापडेल ही आशा मावळू दिली नाही. असाच एक प्रसंग बालासोरच्या शवगृहामध्ये पाहायला मिळाला. तुमचा मुलगा जिवंत नाही, असे बहुतांशी कर्मचारी, प्रशासन सांगत असताना दुसरीकडे आपल्या पोटचा गोळा सुखरुप असल्याचा विश्वास मनात असणाऱ्या बापाने मुलाला शवगृहातून त्याला जिवंत बाहेर काढले. 

कोरोमंडल एक्सप्रेसमधून विश्वजीत मलिक नावाचा 24 वर्षीय तरुण प्रवास करत होता. परंतु या अपघातात त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली. मात्र, त्यावर त्याच्या वडिलांनी विश्वास ठेवला नाही आणि आपल्या मुलाला शोधून काढलचं. 'टाईम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, आपल्या मुलाला शोधून काढण्यासाठी वडिलांनी कोलकातावरुन 230 किमीचा प्रवास करुन बालासोर गाठलं. तिथे त्यांना त्यांचा मुलगा एका शवगृहात जिवंत सापडला. त्यानंतर त्यांनी त्याला पुढील उपचार करण्यासाठी कोलकत्याला परत नेले. 

तरुणाची प्रकृती स्थिर

हेलाराम मलिक यांनी आपल्या मुलाच्या मृत्यूच्या बातमीवर विश्वास ठेवला नाही. विश्वजीतची या अपघातनंतर एसएसकेएम या रुग्णालयात शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. त्यानंतर आता त्याची पुन्हा एकदा शस्त्रक्रिया करण्यात येईल. विश्वजीत या अपघातामध्ये गंभीर जखमी झाला होता. परंतु आता त्याची प्रकृती स्थिर आहे. हावडामध्ये दुकानदार असलेल्या हेलाराम मलिक यांनी शुक्रवारी (2 जून ) रोजी विश्वजीतला रेल्वे स्थानकावर सोडल्यावर काही तासानंतर त्यांना या घटनेबद्दलची माहिती समजली. 

त्यानंतर त्यांनी विश्वजीतशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पलीकडून त्यांना फक्त आक्रोश ऐकायला मिळाला. यानंतर हेलाराम हे एक स्थानिक रुग्णवाहिका चालक पलाश पंडित आणि त्यांचे मेहुणे दीपक दास यांच्यासोबत तात्काळ बालासोरसाठी रवाना झाले. त्यांनी त्या रात्री 230 किमीचा प्रवास केला. पण त्यांना त्यांचा मुलगा कोणत्याही रुग्णालयात सापडला नाही. 

डोळ्यांसमोर होते अनेक मृतदेह

दास यांनी सांगितलं की, 'आम्ही ही सगळी परिस्थिती पाहून देखील हार नाही मानली. आम्ही त्याच्या विषयी इतर लोकांकडे चौकशी केली. एका व्यक्तीने आम्हाला सांगितले की जर तुम्हाला रुग्णालयात तुमचा व्यक्ती भेटला नसेल तर तुम्ही शवगृहात जायला हवे. आम्हाला सुरुवातीला ही गोष्ट मान्य करण्यास वेळ लागला पण आम्ही शवगृहात विश्वजीतला शोधण्यासाठी गेलो. तिथे आमच्या डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच पडला होता. परंतु आम्हाला मृतदेहांच्या जवळ जाण्यास परवानगी नव्हती.'

विश्वजीत कसा सापडला?

दास यांनी पुढे म्हटलं की, 'थोड्या वेळाने कोणीतरी पाहिले की तिथल्या एका मृतदेहाचा हात हलत आहे. त्यानंतर मात्र शवगृहात एकच गोंधळ उडाला. आम्ही तिथेच असल्यामुळे ही सर्व घटना पाहत होतो. जेव्हा आम्ही तो हात हलताना पाहिले तेव्हा आमच्या लक्षात आले की ही हात विश्वजीतचाच आहे. विश्वजीत तेव्हा गंभीर जखमी होता आणि पूर्णपणे बेशुद्ध होता. आम्ही तात्काळ त्याला रुग्णवाहिकेमधून बालासोरच्या रुग्णालयात आणले. त्यानंतर तिथे त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्याची अवस्था पाहून आम्हाला त्याला कटकच्या रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला परंतु आम्ही त्याला आमच्या सोबत घेऊन आलो.' 

ओडिशामध्ये झालेला हा रेल्वे अपघात रेल्वेच्या इतिहासातील सर्वात मोठा अपघात मानला जात आहे. या अपघातात अनेक लोकांनी त्यांच्या जवळच्या व्यक्तींना गमावले.परंतु विश्वजीतच्या वडिलांसारखे अनेक लोक अजूनही आपल्या माणसांच्या शोधात आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Odisha Train Accident: "मी शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्यावर प्रेम करत राहीन..."; ओडिशातील अपघातग्रस्त रेल्वे रुळांवर विखुरली प्रेम कहाणी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली

व्हिडीओ

Ravindra Chavan on Vilasrao Deshmukh : आधी टीका जहरी , मग दिलगिरी Special Report
Santosh Dhuri Join BJP : संतोष धुरी यांचा राज ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' Special Report
Ajit pawar Sinchan Scam : अजितदादांना आतापर्यंत कोणत्या आरोपांत क्लिनचीट? Special Report
Shivaji Maharaj Politics :  नाही कुणा एकाचे, शिवराय सर्वांचे, सी.आर, पाटलांच्या वक्तव्याने नवा वाद Special Report
BJP VS NCP : भाजप-राष्ट्रवादीच्या विचारधारेची वादावादी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
Embed widget