एक्स्प्लोर

UPSC Toppers Interview : UPSC मुलाखतीमधील 9 प्रश्न आणि 5 टाॅपर्सची उत्तरे, एकाने थेट कवितेमध्येच उत्तर देऊन टाकले !

UPSC मुलाखतीमध्ये विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांविषयी नेहमीच उत्सुकता असते. काही हटके प्रश्न विचारून संबंधित विद्यार्थ्याचा आत्मविश्वास, ज्ञान, हजरजबाबीपणा आणि फिल्ड बॅकग्राऊंडही तपासून पाहिले जाते.

UPSC Toppers Interview : UPSC ची लेखी परीक्षा सहज पास होणारे अत्यंत हुशार विद्यार्थी सु्द्धा मुलाखतीमध्ये बऱ्याचवेळा गोंधळून जातात. त्यामुळे मुलाखतीमध्ये विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांविषयी नेहमीच उत्सुकता असते. त्याचबरोबर नेमका कोणता प्रश्न विचारला जाईल, याचाही कोलाहल मनाच्या गाभाऱ्यात सुरु असतो. मुलाखतीमध्ये फक्त विषयाशी निगडीत प्रश्न विचारले जात नाहीत, तर काही हटके प्रश्न विचारून संबंधित विद्यार्थ्याचा आत्मविश्वास, ज्ञान, हजरजबाबीपणा आणि फिल्ड बॅकग्राऊंडही तपासून पाहिले जाते. राजस्थानमधून UPSC-2021 मधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी दैनिक भास्करशी बोलताना विचारलेल्या प्रश्नांची तसेच त्यांनी दिलेल्या उत्तराची माहिती दिली. 

तर जाणून घेऊया UPSC साठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारे प्रश्न विचारले जातात. 

रवी सिहाग : हिंदी माध्यमातून टाॅपर  (आॅल इंडिया 18 वी रँक)

प्रश्न - नागार्जुनच्या कवितांमध्ये कोणती विशेष खासियत आहे

उत्तर -  'जनता मुझसे पूछ रही क्या बतलाऊं, जनकवि हूं मैं साफ कहूंगा क्यों हकलाऊं' अशा नागार्जुनच्या कवितेच्या पंक्तीच त्याने म्हणून दाखवल्या. त्यानंतर त्याने सांगितले की, नागार्जुन यांची कविता समाजासाठी प्रेरणादायी आहेत. 

पवन कुमार कुमावत (आॅल इंडिया  551 वी रँक) सध्या बाडमेर जिल्हा उद्योग केंद्रात संचालक आहेत

प्रश्न - खादीन काय आहे ?

उत्तर- खादीन हे पश्चिम राजस्थानमधील शेताच्या बाजूला सिद्ध-पाल बांधून शेतजमिनीवर पावसाचे पाणी साठवण्याचे आणि अशा प्रकारे साठवलेल्या पाण्यापासून शेतजमिनीत पुरेसा ओलावा निर्माण करून त्यात पिके घेण्याचे पारंपरिक तंत्र आहे.

प्रश्न - आजच्या प्रदुषित वातावरणात तारे कसे दिसतात ? ते सर्वांत सुंदर कोणत्या ठिकाणावरून दिसतात ?

उत्तर - मी ग्रामीण जडणघडणीतून आलो आहे, त्या ठिकाणी सर्व काही सुंदर दिसते. बहुंताश वेळा लाईट नसते. त्यामुळे घराच्या छतावर झोपून रात्रीच्या वेळी चंद्र ताऱ्यांसह आकाश पाहतो. उंच पर्वतावरून आकाशाचा आनंद घेता येऊ शकतो. खरं, तर पवन यांनी आपल्या आवडीमध्ये निसर्गाची आवड असल्याचे नमूद केल होते. 

राघव मीना (IPS ट्रेनिंग करत आहेत) एसटी कोट्यातून आॅल इंडिया  6 वी रँक

राघव मीना फायनान्स आणि परराष्ट्र व्यवहारांवर प्रश्न विचाररण्यात आले. 

प्रश्न- LIC IPO का आणत आहे ? सरकारी कंपन्या IPO का आणतात ?

उत्तर - क्रिटीकल इन्वेस्टमेंटसाठी पैसा जवळ असावा, अशी सरकारची भावना आहे. मुळात सरकार सार्वजनिक गुंतवणुकीतून भांडवल वाढवण्यासाठी IPO आणते.

प्रश्न - भारत-चीनमध्ये सध्या कोणता मुद्दा चालू आहे?

उत्तर - भारत-चीनमध्ये सध्या सर्वांत मोठा मुदा विद्यार्थ्यांच्या व्हिसावरून चालला आहे. कोरोनामध्ये चीनमधून भारतात आलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा चीन व्हिसा मंजूर करत नाही आहे.  

डॉ. कृष्णकांत ( आॅल इंडिया  382  वी रँक) 

प्रश्न - मोफत सरकारी योजना योग्य आहेत का ?

उत्तर - उचित सक्षमीकरणासाठी या योजना योग्य आहेत. मात्र, अशा योजनांचा योग्य सेग्रिगेशन व्हायला हवे आणि पात्र लोकांना याचा लाभ मिळायला हवा. त्याचबरोबर अर्थव्यवस्थेला नुकसान होणार नाही, याचीही काळजी घ्यायला हवी. कमाईचे योग्य व्यवस्थापन व्हायला हवे. 

प्रश्न - गुजरात, महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये तीन पर्याय असल्यास कोणत्या ठिकाणी पोस्टिंग घ्याल ?

उत्तर -  जर राजस्थानमध्ये पोस्टींग मिळाल्यास स्वीकारेन, कारण मी राजस्थानचा असल्याने राजस्थानला चांगल्या पद्धतीने ओळखतो. 

डॉ. राहुल ( आॅल इंडिया  536  वी रँक) 

प्रश्न - भारत रशिया-युक्रेन मुद्याला कसे पाहतो आणि त्याचा भारतावर काय परिणाम झाला आहे ? 

उत्तर - सुरुवातीपासूनच रशिया भारताचा विश्वासू मित्र राहिला आहे. युद्धानंतर युरोपकडून सातत्याने भारतावर दबाव होता की त्यांनी रशियाविरोधात व्हायला हवे. हा एक मोठा दबाव भारतावर होता, कारण मित्राच्या विरोधात भारत होऊ शकत नाही. बाकी जागतिक परिणाम दुसऱ्या देशांवर झाले ते तर आहेतच. 

भविष्यकुमार ( आॅल इंडिया  29  वी रँक) 

प्रश्न - श्रीलंकेतील राजकीय संकटाचे काय कारणे आहेत ? भारत श्रीलंकेसोबत सुरु असलेल्या मच्छीमारांच्या समस्येवर कसा मात करू शकतो ?

उत्तर - भविष्य यांनी उत्तर देताना सांगितले की, कोरोना महामारीने श्रीलंकेचा पर्यटन महसूल बुडाला. श्रीलंकन सरकारकडून सेंद्रीय शेती, चीनच्या जाळ्यात अडकेलेले द्विपक्षीय संबंध, भ्रष्टाचार आणि घराणेशाही ही तेथील राजकीय संकटाची कारणे आहेत. श्रीलंकेला आर्थिक सल्ला आणि लाईन ऑफ क्रेडिट देऊन भारत सावरु शकतो. तसेच तमिळनाडू राज्याच्या द्विपक्षीय संबंधाने श्रीलंकेसोबतचा मच्छीमारांचा प्रश्न सोडवला जाऊ शकतो.  

 इतर महत्त्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune : बारामती, दौंड तालुक्यात शरद पवारांच्या गटाला एकही जागा नाही, सगळ्या जागा अजितदादा लढवणार
बारामती, दौंड तालुक्यात शरद पवारांच्या गटाला एकही जागा नाही, सगळ्या जागा अजितदादा लढवणार
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
ठाकरेंचे नगरसेवक म्हणत उदय सामंतांचं सूचक वक्तव्य; दावोसहून महाराष्ट्रात आल्यानंतर राजकीय MOU
ठाकरेंचे नगरसेवक म्हणत उदय सामंतांचं सूचक वक्तव्य; दावोसहून महाराष्ट्रात आल्यानंतर राजकीय MOU

व्हिडीओ

Tuljapur Temple Donation Issue : भक्ताची अंगठी, अडवणुकीची घंटी; मंदिर प्रशासनाचा अजब ठराव
Chandrapur Congress On Mahapalika Election : गटबाजीचा पूर 'हात'चं जाणार चंद्रपूर Special Report
Beed Girl Letter Ajit Pawar : शिकायचं की ऊसोड करायची? चिमुकलीने पत्रातून मांडली व्यथा Special Report
Politics On CM Fadnavis Davos : गुंतवणुकीचं मिशन, दावोसवरुन टशन; राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
KDMC MNS Supports Shivsena : जनतेचा कौल विसरले सत्तेसाठी 'चिकटले' Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune : बारामती, दौंड तालुक्यात शरद पवारांच्या गटाला एकही जागा नाही, सगळ्या जागा अजितदादा लढवणार
बारामती, दौंड तालुक्यात शरद पवारांच्या गटाला एकही जागा नाही, सगळ्या जागा अजितदादा लढवणार
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
ठाकरेंचे नगरसेवक म्हणत उदय सामंतांचं सूचक वक्तव्य; दावोसहून महाराष्ट्रात आल्यानंतर राजकीय MOU
ठाकरेंचे नगरसेवक म्हणत उदय सामंतांचं सूचक वक्तव्य; दावोसहून महाराष्ट्रात आल्यानंतर राजकीय MOU
Sarita Mhaske : मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत
Julia Ain: 'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
Embed widget