एक्स्प्लोर

26th July In History: मुंबईत ढग फुटल्यासारखा पाऊस, 26 जुलैच्या त्या पावसात एक हजाराहून जास्त मुंबईकरांनी जीव गमावला, भारताने कारगिल युद्ध जिंकले; आज इतिहासात

26th July Important Events : आजच्याच दिवशी भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि कारगिल युद्ध जिंकलं. त्यानिमित्ताने देशात 26 जुलै हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. 

26th July Important Events : जून महिन्याच्या अखेरीस देशाच्या सर्व भागात पावसाची टीपटिप ऐकू येते आणि जुलैमध्ये मान्सून जोरात सुरू असतो. पण 26 जुलै 2005 रोजी ढगांतून पाऊस पडत नव्हता तर एक वादळ आलं होतं. मुंबईमध्ये त्या दिवशी पडलेल्या पावसाने कहर केला आणि त्यामुळे मुंबई थांबली. मुंबईची लोकल असो वा बस, सगळ्या गाड्या जागच्या जागी थांबल्या. या दिवशी झालेल्या पावसामुळे एक हजाराहून अधिक मुंबईकरांनी आपला जीव गमावला. 

देशाच्या आणि जगाच्या इतिहासात 26 जुलै या तारखेला नोंदवलेल्या काही महत्त्वाच्या घटनांचा क्रमवार तपशील पुढीलप्रमाणे आहे,

1844: भारतातील आघाडीचे शिक्षणतज्ञ गुरुदास बॅनर्जी यांचा जन्म.

1876: कलकत्ता येथे इंडियन असोसिएशनची स्थापना.

1945: विन्स्टन चर्चिल यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला.

1951: नेदरलँड्सने जर्मनीशी युद्ध संपवले.

1953: कम्युनिस्ट क्रांतिकारक फिडेल कॅस्ट्रो यांच्या नेतृत्वाखाली क्यूबन क्रांतीची सुरुवात.

1956 : इजिप्तने सुएझ कालव्यावर कब्जा केला

दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि युरोपियन देशांच्या पाठिंब्यावर अरब प्रदेशात ज्यू धर्मियांच्या इस्त्रायल हा देश वसला. पण त्यामुळे अरब देशांमध्ये मात्र असंतोष पसरला. त्यानंतर युरोपियन देशांची कोंडी करण्यासाठी इजिप्तचे (Egypt) राष्ट्राध्यक्ष गमाल अब्देल नासेर (Gamal Abdel Nasser) यांनी सुएज कालव्याचं (Suez Canal Crisis) राष्ट्रीयीकरण केलं आणि 26 जुलै 1956 रोजी त्याचा ताबा घेतला. पण त्यामुळे सुएज क्रायसिसचा प्रश्न निर्माण झाला आणि पुन्हा एकदा जागतिक युद्ध होतंय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. 

1965 - मालदीव ब्रिटीशांच्या ताब्यातून स्वतंत्र झाला.

1974 - फ्रान्सने मुरूरा बेटावर अणुचाचणी केली.

1999 : भारताने कारगिल युद्ध जिंकले, आज विजय दिवस

कारगिल विजय दिवस (Vijay Divas) हा देशवासियांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. हा दिवस भारतात दरवर्षी 26 जुलै रोजी साजरा केला जातो. या दिवशी, 1999 मध्ये, भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यांमध्ये कारगिल युद्ध (Kargil War) झाले. सुमारे 60 दिवस चाललेल्या युद्धात भारताने पाकिस्तानला धूळ चारली आणि विजय मिळवला. कारगिल विजय दिवस हा दिवस युद्धात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. या युद्धात 527 सैनिकांनी हौतात्म्य पत्करले आणि सुमारे 1400 जखमी झाले.

2005 : मुंबईत विक्रमी पाऊस आणि मोठं नुकसान

देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई कधीच थांबत नाही असं म्हणतात. पण 26 जुलै 2005 रोजी झालेल्या पावसामुळे (26 July 2005 Mumbai Rain) मुंबई थांबली. या मायानगरीने आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी जीवितहानी करणारा पाऊस अनुभवला होता. या पावसामध्ये एक हजाराहून अधिक मुंबईकरांनी आपला जीव गमावला होता. तर तब्बल 15 हजारांच्या आसपास घरं उद्ध्वस्त झाली आणि नागरिक रस्त्यावर आले. त्या दिवशी दिवसभर पडणाऱ्या पावसाने विक्रम केला. एकाच दिवसात तब्बल 944 मिमी पाऊस पडला. मुंबईच्या इतिहासातील गेल्या 100 वर्षांतील सर्वात मोठा पाऊस होता. 

ढग फुटल्यासारखा पाऊस कोसळत होता आणि कधीही न थांबणारी मुंबई स्तब्ध झाली होती. मुंबईची लोकल, बस... या सर्वच ठिकाणी नागरिक अडकून पडले होते. मुंबईच्या या पावसात जवळपास साडेपाच अब्ज रुपयांचं नुकसान झाल्याचं एका आकडेवारीतून स्पष्ट झालं. या पावसानंतर राज्य सरकारने त्याचा अभ्यास करण्यासाठी आणि भविष्यात अशी कोणतीही घटना घडू नये यासाठी उपाययोजना करण्यासाठी पर्यावरणवादी अभ्यासक डॉ. माधव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या समितीने 2006 साली आपला अहवाल दिला. 

2007: पाकिस्तानने अणुऊर्जेवर चालणाऱ्या क्रूझ क्षेपणास्त्र बाबर हत्फ-7ची यशस्वी चाचणी केली.

2008: युरोपियन शास्त्रज्ञांनी सौरमालेच्या बाहेर आणखी एक नवीन ग्रह शोधला.

2008: गुजरातमधील अहमदाबाद शहरात 21 बॉम्बस्फोट, 56 लोक ठार आणि 200 हून अधिक जखमी.

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar: मुंबईत एकत्र लढण्याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 'वेट अँड वॉच'; दोन दिवसात निर्णय न झाल्यास...; रोहित पवार स्पष्टच बोलले
मुंबईत एकत्र लढण्याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 'वेट अँड वॉच'; दोन दिवसात निर्णय न झाल्यास...; रोहित पवार स्पष्टच बोलले
'उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे' हे भाजप-शिंदे गटाचं काम, भाजप आमदार पराग शहानं भर रस्त्यात मराठी रिक्षावाल्याला मारलं ते दिसत नाही का? संजय राऊतांचा हल्लाबोल
'उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे' हे भाजप-शिंदे गटाचं काम, भाजप आमदार पराग शहानं भर रस्त्यात मराठी रिक्षावाल्याला मारलं ते दिसत नाही का? संजय राऊतांचा हल्लाबोल
BlueBird Block 2 Satellite: 'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
Thane Mahangarpalika Election 2026: ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार, ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला; ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार

व्हिडीओ

Uddhav Thackeray Matoshri : उद्धव ठाकरे दादरच्या दिशेने रवाना, बाळासाहेबांना अभिवादन करणार
Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report
Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar: मुंबईत एकत्र लढण्याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 'वेट अँड वॉच'; दोन दिवसात निर्णय न झाल्यास...; रोहित पवार स्पष्टच बोलले
मुंबईत एकत्र लढण्याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 'वेट अँड वॉच'; दोन दिवसात निर्णय न झाल्यास...; रोहित पवार स्पष्टच बोलले
'उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे' हे भाजप-शिंदे गटाचं काम, भाजप आमदार पराग शहानं भर रस्त्यात मराठी रिक्षावाल्याला मारलं ते दिसत नाही का? संजय राऊतांचा हल्लाबोल
'उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे' हे भाजप-शिंदे गटाचं काम, भाजप आमदार पराग शहानं भर रस्त्यात मराठी रिक्षावाल्याला मारलं ते दिसत नाही का? संजय राऊतांचा हल्लाबोल
BlueBird Block 2 Satellite: 'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
Thane Mahangarpalika Election 2026: ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार, ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला; ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला
Thane Election BJP: भाजपने वाल्याचा वाल्मिकी केलाच, ठाण्यातील तडीपार गुंड मयूर शिंदेचा पक्षप्रवेश संपन्न, 'या' प्रभागातून उमेदवारी मिळण्याची शक्यता
ठाण्यातील तडीपार गुंड अखेर पावन झालाच, मयूर शिंदेचा भाजपमध्ये प्रवेश, कोणत्या वॉर्डमधून उमेदवारी?
Dhairyasheel Mohite Patil : अजित दादांकडून प्रस्ताव आल्यास सोलापुरातही आघाडी होणार; निवडणूक प्रभारी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची माहिती
अजित दादांकडून प्रस्ताव आल्यास सोलापुरातही आघाडी होणार; निवडणूक प्रभारी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची माहिती
सावधान! पुढील 24 तासांत महाराष्ट्रात थंडी हाडं गोठवणार; हवामान विभागाचा इशारा, कुठे कसा असेल पारा?
सावधान! पुढील 24 तासांत महाराष्ट्रात थंडी हाडं गोठवणार; हवामान विभागाचा इशारा, कुठे कसा असेल पारा?
Embed widget