एक्स्प्लोर

सिद्धूंना भोवणार 35 वर्षे जुने रोड रेज प्रकरण? शिक्षेत वाढ करण्यासाठी याचिका दाखल, दोन आठवड्यानंतर सुनावणी

रोड रेज प्रकरणी पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्या शिक्षेत वाढ करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

नुकतेच पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 20 फेब्रुवारी रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली. ज्याचा निकाल 10 मार्च रोजी जाहीर होणार आहे. याच दरम्यान पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू हे अडचणीत सापडले आहेत. रोड रेज प्रकरणी नवज्योतसिंग सिद्धू यांच्या शिक्षेत वाढ करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. हे प्रकरण 35 वर्ष जुने असून याआधीही याप्रकरणी याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. ही याचिका दाखल करणाऱ्या याचिकाकर्त्याने सांगितलं आहे की, याप्रकरणी अधिक तपास करण्याची आवश्यकता आहे. ज्या घटनेत एखाद्याचा मृत्यू झाला आहे, त्या घटनेत केवळ सदोष मनुष्यवधाचे कलम लावणे चुकीचे असल्याचे याचिकाकर्त्याने म्हटले आहे. याप्रकरणी न्यायालयाने सिद्धू यांना उत्तर देण्यास सांगितले असून याची सुनावणी दोन आठवड्यानंतर होणार असल्याचं म्हटले आहे. दरम्यान, ऐन निवडणुकीत हे प्रकरण समोर आल्याने विरोधकांनी त्यांना घेरण्यास सुरुवात केली आहे. 

काय आहे प्रकरण? 

1988 मध्ये पंजाबमधील पटियाला येथे झालेल्या या घटनेत गुरनाम सिंग यांचा मृत्यू झाला होता. सिद्धू आणि त्याचा मित्र कंवरसिंग संधू यांना पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाने ही हत्या हेतुपूर्वक केली नसल्याने त्यांना दोषी ठरवून तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. पण जुलै 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने संधूची पूर्णपणे निर्दोष मुक्तता केली. तर सिद्धूला केवळ सदोष मनुष्यवधाच्या प्रकरणी दोषी ठरवण्यात आले. याप्रकरणी त्यांना केवळ एक हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

याविरोधात गुरनाम सिंग यांच्या कुटुंबीयांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे. 13 सप्टेंबर 2018 रोजी न्यायालयाने याचिका विचारार्थ स्वीकारली. मात्र त्यानंतर केवळ शिक्षेत वाढ करण्याच्या मागणीवरच विचार करणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले होते. याचा अर्थ असा होता की, सिद्धू यांच्या विरोधात मनुष्यवधाचा खटला चालवला जाणार नाही. तत्पूर्वी, आपल्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने त्यांना केवळ आयपीसीच्या कलम 323 अंतर्गत दोषी ठरवले होते. जे सदोष मनुष्यवधाच्या प्रकरणांमध्ये लागू होते. या कलमात शिक्षेत वाढ करण्याच्या मागणीचा विचार केला जाणार आहे. या कलमात जास्तीत जास्त 1 वर्षाच्या कारावासाची तरतूद आहे. मात्र, सिद्धूला केवळ दंड आकारून सोडून देण्यात आले होते.

दरम्यान, शुक्रवारी हे प्रकरण न्यायमूर्ती ए एम खानविलकर आणि न्यायमूर्ती संजय किशन कौल यांच्या विशेष खंडपीठासमोर मांडण्यात आले. याचिकाकर्ते जसविंदर सिंग (आता त्यांचे निधन झाले आहे) यांच्या बाजूने उपस्थित असलेले ज्येष्ठ वकील सिद्धार्थ लुथरा यांनी न्यायाधीशांसमोर यापूर्वीच्या दोन निकालांचे उदाहरण दिले. ते म्हणाले की, 'विरसा सिंग विरुद्ध पंजाब, 1958' आणि 'रिचपाल सिंग मीना विरुद्ध घासी, 2014' या निकालांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, मारहाणीनंतर एखाद्याचा मृत्यू झाला असेल तर अशा प्रकरणी सदोष मनुष्यवधाचे कलम लागू करणे चुकीचे आहे. न्यायालयाने या खटल्याची व्याप्ती वाढवावी, अशी मागणी लुथरा यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या

TMC Crisis : भाजपच्या तिकिटावर खासदार होऊन दाखवा, बघुया तुम्ही किती हिरो आहात; महुआ मोईत्रांचं फुटीरांना आव्हान, युसूफ पठाणची लाज काढली
भाजपच्या तिकिटावर खासदार होऊन दाखवा, बघुया तुम्ही किती हिरो आहात; महुआ मोईत्रांचं फुटीरांना आव्हान, युसूफ पठाणची लाज काढली
LPG Price Hike : मोठी बातमी! घरगुती गॅस सिलेंडर आणखी महाग होणार; केंद्र सरकारनं सांगितलं त्यामागचं मोठं कारण
मोठी बातमी! घरगुती गॅस सिलेंडर आणखी महाग होणार; केंद्र सरकारनं सांगितलं त्यामागचं मोठं कारण
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मांडले 3 मुद्दे; संजय राऊतांनी दिली माहिती, म्हणाले, आम्ही 4 जण बैठकीला होतो
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मांडले 3 मुद्दे; संजय राऊतांनी दिली माहिती, म्हणाले, आम्ही 4 जण बैठकीला होतो
Pradhan Mantri Ujjwala Yojana: दरवाढीचे चटके बसत असतानाच मोदी सरकारचा आता उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा तगडा झटका
दरवाढीचे चटके बसत असतानाच मोदी सरकारचा आता उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा तगडा झटका

व्हिडीओ

India Alliance Meeting : 4 राज्यात बिघाडी, आता आठवली इंडिया आघाडी | Special Report
Nashik Vidhan Parishad : एकाचं फत्ते काम, दुसऱ्याने फोडला घाम | Special Report
Abhijeet Dipke Cockroach Janta Party PC : आता मी एकटा नाही, लाखो तरुण माझ्यासोबत : अभिजीत दीपके
Sunil Tatkare on RajyaSabha NCP : ...म्हणून राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली-सुनील तटकरे
Akola Govt Hospital : अकोला जिल्हा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: 'तत्काळ गोळीबार थांबवा' ट्रम्पकडून इराण आणि इस्त्रायलला इशारा; सलग दुसऱ्या दिवशी बेंजामिन नेत्यानाहूंना कानपिचक्या
'तत्काळ गोळीबार थांबवा' ट्रम्पकडून इराण आणि इस्त्रायलला इशारा; सलग दुसऱ्या दिवशी बेंजामिन नेत्यानाहूंना कानपिचक्या
Pradhan Mantri Ujjwala Yojana: दरवाढीचे चटके बसत असतानाच मोदी सरकारचा आता उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा तगडा झटका
दरवाढीचे चटके बसत असतानाच मोदी सरकारचा आता उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा तगडा झटका
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मांडले 3 मुद्दे; संजय राऊतांनी दिली माहिती, म्हणाले, आम्ही 4 जण बैठकीला होतो
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मांडले 3 मुद्दे; संजय राऊतांनी दिली माहिती, म्हणाले, आम्ही 4 जण बैठकीला होतो
Cockroach Janata Party: काँकरोच जनता पार्टीचा दिल्लीनंतर पुण्यातही एल्गार करणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार
काँकरोच जनता पार्टीचा दिल्लीनंतर पुण्यातही एल्गार करणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार
Suryakumar Yadav T20 Mumbai: कॅप्टनसीवरून हटवल्यानंतर सूर्यकुमारचा वानखेडेवर 'तांडव'; 36 बॉलमध्ये 72 धावा कुटत टीकाकारांची बोलती बंद!
कॅप्टनसीवरून हटवल्यानंतर सूर्यकुमारचा वानखेडेवर 'तांडव'; 36 बॉलमध्ये 72 धावा कुटत टीकाकारांची बोलती बंद!
थरकाप उडवणारी घटना, कंपनीत वितळलेलं स्टील अंगावर पडून 8 कामगारांचा कोळसा, सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
थरकाप उडवणारी घटना, कंपनीत वितळलेलं स्टील अंगावर पडून 8 कामगारांचा कोळसा, सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
पश्चिम बंगालमधील 15 वर्षांची सत्ता जाताच 58 आमदारांनंतर 20 खासदारांची सुद्धा 'ममता' आटली; दीदींची साथ सोडत भाजपला पाठिंबा, देशात आणखी एका प्रादेशिक पक्षाचे गल्ली ते दिल्ली दोन तुकडे
पश्चिम बंगालमधील 15 वर्षांची सत्ता जाताच 58 आमदारांनंतर 20 खासदारांची सुद्धा 'ममता' आटली; दीदींची साथ सोडत भाजपला पाठिंबा, देशात आणखी एका प्रादेशिक पक्षाचे गल्ली ते दिल्ली दोन तुकडे
India vs Afghanistan: भारताने अफगाणिस्तानचा एक डाव आणि 300 धावांनी धुव्वा उडवला, पण तरीही WTC गुणतालिकेत एक गुण सुद्धा का मिळाला नाही?
भारताने अफगाणिस्तानचा एक डाव आणि 300 धावांनी धुव्वा उडवला, पण तरीही WTC गुणतालिकेत एक गुण सुद्धा का मिळाला नाही?
Embed widget