एक्स्प्लोर

15 ऑगस्ट : स्वातंत्र्यदिनाच्या दहा रंजक गोष्टी

मुंबई : भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्त्व महात्मा गांधी यांनी केलं होतं. पण 15 ऑगस्ट 1947 रोजी जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा ते या जल्लोषात सहभागी झाले नव्हते.   भारताच्या स्वातंत्र्याशी संबंधित दहा रंजक गोष्टी  
  1. भारताच्या स्वातंत्र्याच्या दिवशी महात्मा गांधी दिल्लीपासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या बंगालच्या नोआखलीमध्ये होते. हिंदू आणि मुस्लिमांमध्ये सुरु असलेला धार्मिक हिंसाचार रोखण्यासाठी ते उपोषण करत होते.
 
  1. 15 ऑगस्ट रोजी भारत स्वतंत्र होणार हे निश्चित झालं, त्यावेळी जवाहरलाल नेहरु आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी महात्मा गांधींना पत्र लिहिलं. या पत्रात लिहिलं होतं की, “15 ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्यदिन असेल. तुम्ही राष्ट्रपिता आहात. यात सहभागी व्हा आणि आशीर्वाद द्या.”
 
  1. गांधी यांनी या पत्राचं उत्तर असं पाठवलं की, “कलकत्तामध्ये हिंदू-मुस्लिम एकमेकांचा जीव घेत असताना मी जल्लोष साजरा करण्यासाठी कसा येऊ शकतो? दंगल रोखण्यासाठी मी माझे प्राण देईन.”
 
  1. जवाहरलाल नेहरु यांनी ऐतिहासिक भाषण अर्थात ‘ट्रिस्ट विथ डेस्टनी’ 14 ऑगस्टच्या मध्यरात्री व्हॉईसराय लॉजमधून (सध्याचं राष्ट्रपती भवन) दिलं होतं. तेव्हा नेहरु पंतप्रधान बनले नव्हते. हे भाषण संपूर्ण जगाने ऐकलं, पण गांधीजी त्या दिवशी नऊ वाजताच झोपले होते.
 
  1. 15 ऑगस्ट, 1947 रोजी लॉर्ड माऊंटबॅटन यांनी त्यांच्या कार्यालयात काम केलं. दुपारी नेहरुंनी त्यांना आपल्या मंत्रिमंडळाची यादी सोपवली आणि त्यानंतर इंडिया गेटजवळ प्रिन्सेस गार्डनमध्ये एक सभेला संबोधित केलं.
 
  1. प्रत्येक स्वातंत्र्यदिनाला भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवतात. पण 15 ऑगस्ट 1947 रोजी असं झालं नव्हतं. लोकसभा सचिवालयाच्या एका पत्रानुसार, “नेहरुंनी 16 ऑगस्ट, 1947 रोजी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला होता.”
 
  1. भारताचे तत्कालीन व्हॉईसराय लॉर्ड माऊंटबॅटन यांचे माध्यम सचिव कॅम्पबेल जॉनसन यांच्या माहितीनुसार, “जपानच्या शरणागतीची दुसरं वर्ष 15 ऑगस्टला होणार होतं. त्याच दिवशी भारताला स्वतंत्र करण्याचा निर्णय झाला.”
 
  1. 15 ऑगस्टपर्यंत भारत आणि पाकिस्तानमध्ये सीमारेषा निश्चित झाली नव्हता. याचा निर्णय 17 ऑगस्ट रोजी रेडक्लिफ लाईनच्या घोषणेद्वारे झाला.
 
  1. भारत 15 ऑगस्ट रोजी स्वतंत्र झाला खरा, पण देशाचं स्वत:चं राष्ट्रगीत बनलं नव्हतं. रविंद्रनाथ टागोर यांनी 1911 मध्येच ‘जन-गण-मन’ लिहिलं होतं, परंतु 1950 मध्ये त्याची राष्ट्रगीत म्हणून अधिकृत निवड झाली.
 
  1. 15 ऑगस्त हा भारतासह इतर तीन देशांचाही स्वातंत्र्यदिन आहे. दक्षिण कोरिया जापानपासून 15 ऑगस्ट, 1945 रोजी स्वतंत्र झाला होता. ब्रिटनपासून बहरीन 15 ऑगस्ट, 1971 रोजी आणि फ्रान्सपासून कांगो 15 ऑगस्ट, 1960 मध्ये स्वतंत्र झाला होता.
  एबीपी माझा वेब टीम
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Crude Oil in India : जगाला चकवा देत जया, डोरना आणि फेलिसिटी भारतात दाखल, हॉर्मुझमधून 60 लाख बॅरेल इराणी तेल देशात
जगाला चकवा देत जया, डोरना आणि फेलिसिटी भारतात दाखल, हॉर्मुझमधून 60 लाख बॅरेल इराणी तेल देशात
Narendra Modi : 30 मिनिटांच्या भाषणात 60 वेळा काँग्रेसचं नाव, महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
30 मिनिटांच्या भाषणात 60 वेळा काँग्रेसचं नाव, महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
आम्ही हरलो नाही, आमचा संकल्प कायम, काँग्रेसला करारा जवाब मिळणार, महिला आरक्षण विधेयकावरुन पंतप्रधानांचा हल्लाबोल 
आम्ही हरलो नाही, आमचा संकल्प कायम, काँग्रेसला करारा जवाब मिळणार, महिला आरक्षण विधेयकावरुन पंतप्रधानांचा हल्लाबोल 
Narendra Modi : काँग्रेसने महिलांच्या अधिकाराची भ्रूणहत्या केली, स्वप्नांचा चक्काचूर केला, त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागणार; नरेंद्र मोदींची टीका
ज्यांनी महिला आरक्षण विधेयकाला विरोध केला त्यांना परिणाम भोगावे लागतील, त्यांनी महिलांच्या स्वप्नांचा चक्काचूर केला; नरेंद्र मोदींची विरोधकांवर टीका

व्हिडीओ

PM Modi UNCUT : काँग्रेसने महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या केली, स्वप्नांचा चक्काचूर केला- मोदी
PM Modi on Women Reservation Bill : काँग्रेसने त्यांचं अस्तित्व गमावलं तुफान हल्लाबोल
PM Modi on Women Reservation Bill : नारीशक्ती विधेयक नामंजूर, पंतप्रधान मोदींनी मागितली माफी
Sanjay Raut PC : 'मोदी हैं तो नामुमकिन हैं' अशी परिस्थिती, राऊतांचा हल्लाबोल
Sharad Ponkshe Nanded Speech : 1 लाख खरात एकत्र केले तर 1 अकबर तयार होईल, शरद पोंक्षे यांचं विधान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: बाॅम्बवर्षावातही माऊलीची नवजात बालकांना वाचवण्याची धडपड, जीवाच्या आकांताने पळापळ, आयसीयूतील रुग्ण रस्त्यावर; इराणी हॉस्पिटलवर अमेरिका-इस्त्रायलच्या नरसंहार हल्ल्याचा सव्वा दोन मिनिटांचा भयावह व्हिडिओ
Video: बाॅम्बवर्षावातही माऊलीची नवजात बालकांना वाचवण्याची धडपड, जीवाच्या आकांताने पळापळ, आयसीयूतील रुग्ण रस्त्यावर; इराणी हॉस्पिटलवर अमेरिका-इस्त्रायलच्या नरसंहार हल्ल्याचा सव्वा दोन मिनिटांचा भयावह व्हिडिओ
IPL 2026 Points Table: चेन्नईविरुद्धच्या विजयानंतर गुणतालिकेत हैदराबादची मोठी झेप; ‘हा’ संघ बाहेर पडणार? पाहा कोणता संघ कोणत्या स्थानावर?
चेन्नईविरुद्धच्या विजयानंतर गुणतालिकेत हैदराबादची मोठी झेप; ‘हा’ संघ बाहेर पडणार? पाहा कोणता संघ कोणत्या स्थानावर?
Pune Crime News : खळबळजनक! मुठा नदीपात्रात अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडला, घातपाताचा संशय, पुणे पोलिसांकडून तपास सुरु
खळबळजनक! मुठा नदीपात्रात अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडला, घातपाताचा संशय, पुणे पोलिसांकडून तपास सुरु
Bhandara Crime News: भंडाऱ्यात गो तस्करांची मुजोरी, थेट पोलिसाची कॉलर पकडून धक्काबुक्की अन्...; नेमकं काय घडलं?
भंडाऱ्यात गो तस्करांची मुजोरी, थेट पोलिसाची कॉलर पकडून धक्काबुक्की अन्...; नेमकं काय घडलं?
Jaykumar Gore : राज्यावर एल निनोचं संकट, उन्हाळ्यात एकच पाण्याचे आवर्तन, उजनी धरणात पाणी काटकसरीने वापर, पालकमंत्री जयकुमार गोरेंचं सोलापूरकरांना आवाहन
राज्यावर एल निनोचं संकट, उन्हाळ्यात एकच पाण्याचे आवर्तन, उजनी धरणात पाणी काटकसरीने वापर, पालकमंत्री जयकुमार गोरेंचं सोलापूरकरांना आवाहन
Rohit Pawar and PM Modi: पराभवाचंही भांडवल करुन राजकीय पोळी भाजण्यात भाजपइतकं माहीर...; पंतप्रधान मोदींच्या भाषणावर रोहित पवारांची टीका
पराभवाचंही भांडवल करुन राजकीय पोळी भाजण्यात भाजपइतकं माहीर...; पंतप्रधान मोदींच्या भाषणावर रोहित पवारांची टीका
West Bengal Election 2026: महिला आरक्षणावरुन रणकंदन, पण पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजप-काँग्रेसने किती महिलांना उमेदवारी दिली?
महिला आरक्षणावरुन रणकंदन, पण पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजप-काँग्रेसने किती महिलांना उमेदवारी दिली?
Akshay Tritiya 2026: आजची अक्षय्य तृतीया दुप्पट भाग्याची! सोने-चांदी खरेदीचा 'हा' शुभ मुहूर्त, फार कमी लोकांना माहित, देवी लक्ष्मीच्या कृपेने भरभराट..
आजची अक्षय्य तृतीया दुप्पट भाग्याची! सोने-चांदी खरेदीचा 'हा' शुभ मुहूर्त, फार कमी लोकांना माहित, देवी लक्ष्मीच्या कृपेने भरभराट..
Embed widget