एक्स्प्लोर

अलिकडच्या काळात भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचा गैरवापर होत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचं मत

तबलीघी जमात खटल्यादरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले. तसेच केंद्र सरकारच्या भूमिकेवर न्यायालयाने ताशेरे ओढले.

नवी दिल्ली: अलिकडच्या काळात भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचा गैरवापर झाल्याचं दिसून आलं आहे असे मत सर्वोच्च न्यायालयाने तबलीघी जमात प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान व्यक्त केले. तसेच या प्रकरणात न्यायालयाने केंद्र सरकारने घेतलेल्या निष्काळजी आणि कोडग्या भूमिकेवरही ताशेरे ओढले. सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ उलेमा-ई-हिंद आणि इतर काहींनी केलेल्या याचिकेवर सुनावणी करत आहे. यावेळी त्यांनी कोरोना प्रसाराच्या सुरवातीला माध्यमांच्या एका गटाने तबलीघी जमातीवर जातीय द्वेष पसरवल्याचा आरोप केला. जेष्ठ वकील दुष्यंत दवे यांनी न्यायालयात तबलीघी जमातीची बाजू मांडताना सांगितले की केंद्र सरकारने त्यांच्या प्रतिज्ञापत्रकात असे सांगितले आहे की याचिकाकर्ते हे भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली गोंधळ माजवण्याचा प्रयत्न करताहेत. यावर बेंच म्हणाले की ज्याप्रमाणे तुम्ही याबाबत तुम्हाला पाहिजे ते विधान करू शकता त्याप्रमाणे सरकारदेखील त्यांच्या प्रतिज्ञापत्रकात त्यांना योग्य वाटेल ते मत माडू शकतात. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सचिवाने हे प्रतिज्ञापत्रक दाखल करण्याऐवजी त्या खात्याच्या अतिरिक्त सचिवांनी हे प्रतिज्ञापत्रक दाखल केले यावर बेंचने नाराजी व्यक्त करत त्यांनी तबलीगी जमातीवर माध्यमांच्या वार्तांकनासंदर्भात दाखल केलेले प्रतिज्ञापत्रक हे 'अनावश्यक' आणि 'मुर्खपणाचे' आहे असे विधान केले. तुम्ही न्यायालयाला अशा प्रकारची वागणूक देवू शकत नाही असे न्या. बोबडे आणि सुब्रमण्यन यांच्या खंडपीठाने सरकारला बजावले. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सरकारने माध्यमांच्या अशा वार्तांकनाला आळा घालण्यासाठी भूतकाळात कोणती पावले उचलली याबाबत तपशिलवार प्रतिज्ञापत्रक सादर करावे असे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सचिवांना निर्देश दिले. न्यायालयाने याप्रकरणाची सुनावणी दोन आठवडे पुढे ढकलली आहे. व्हिडिओ कॉन्फरंसच्या माध्यमातून झालेल्या या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की सरकार केबल टेलिव्हिजन नेटवर्क (नियंत्रण) कायदा,1995 सेक्शन 20 नुसार लोकहितासाठी केबल टेलिव्हिजन नेटवर्कवर काही बंधने आणू शकते. बेंचने सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांना सांगितले की अतिरिक्त सचिवांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रकात आरोप योग्यरित्या मांडण्यात आले नाहीत. केंद्र सरकारने ऑगस्टमध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रकात असे म्हंटले होते की मरकज निजामुद्दीन प्रकरणात काही मुस्लीम गटांनी माध्यमांनी वृत्तांकन करू नये यासाठी सर्व माध्यमांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नागरिकांच्या माहिती मिळवण्याच्या आणि पत्रकारांच्या समाजाला माहिती देण्याच्या अधिकारावर गदा आली. जमात उलेमा-ई-हिंद ने केंद्र सरकारने मरकज संबंधी फेक न्यूज पसरवण्याला आळा घालावा आणि त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यात असे म्हंटले आहे की दुर्दैवाने तबलीघी घटनेचा वापर संपूर्ण मुस्लीम समाजाला बदनाम करण्यासाठी करण्यात आला आणि यापुढे अशा बातम्या प्रसारित करण्यावर बंदी आणावी अशी मागणी केली. तबलीघी जमात परिषद दिल्लीतील मरकज निजामुद्दीन या ठिकाणी मार्च महिन्यात झाली होती. कोरोनाच्या सुरवातीच्या काळात झालेल्या या घटनेमुळे तबलीगींनी देशाच्या सर्व भागात कोरोना पसरवल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Charter Plane Crash: 9 आसनी चार्टर्ड विमान कोसळले, पायलटसह 6 जण गंभीर जखमी; भीषण अपघात नेमका घडला तरी कसा?
9 आसनी चार्टर्ड विमान कोसळले, पायलटसह 6 जण गंभीर जखमी; भीषण अपघात नेमका घडला तरी कसा?
शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला दे धक्का; आमदारावर आरोप, भाजपचे तीन माजी नगरसेवक शिवसेनेत
शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला दे धक्का; आमदारावर आरोप, भाजपचे तीन माजी नगरसेवक शिवसेनेत
Prakash Ambedkar on Badlapur Nagarsevak: भाजप हा खाणाऱ्यांचा पक्ष होताच, तो आता बलात्कारातील आरोपींचा पक्ष झाला, व्यभिचाराचा मार्ग RSS भाजपने अवलंबला आहे; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
भाजप हा खाणाऱ्यांचा पक्ष होताच, तो आता बलात्कारातील आरोपींचा पक्ष झाला, व्यभिचाराचा मार्ग RSS भाजपने अवलंबला आहे; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
देवाच्या नावाखाली 60 हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठीच शक्तिपीठ महामार्ग; त्यापेक्षा विदर्भ ते कोकण जोडणारा कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वेमार्ग तातडीने पूर्ण करा; राजू शेट्टींचा हल्लाबोल
देवाच्या नावाखाली 60 हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठीच शक्तिपीठ महामार्ग; त्यापेक्षा विदर्भ ते कोकण जोडणारा कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वेमार्ग तातडीने पूर्ण करा; राजू शेट्टींचा हल्लाबोल

व्हिडीओ

Aaditya Thackeray Speech Dadar : आदित्य ठाकरेंचं दादरमध्ये दणदणीत भाषण, मुख्यमंत्र्‍यांवर टीका
Raj Thackeray Nashik Speech : तपोवन ते फडणवीस, जनसंघ ते भाजप ; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण
Uddhav Thackeray Speech Nashik : भाजपने झेंड्यावरील हिरवा रंग काढावा ; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले
Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE
Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Charter Plane Crash: 9 आसनी चार्टर्ड विमान कोसळले, पायलटसह 6 जण गंभीर जखमी; भीषण अपघात नेमका घडला तरी कसा?
9 आसनी चार्टर्ड विमान कोसळले, पायलटसह 6 जण गंभीर जखमी; भीषण अपघात नेमका घडला तरी कसा?
शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला दे धक्का; आमदारावर आरोप, भाजपचे तीन माजी नगरसेवक शिवसेनेत
शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला दे धक्का; आमदारावर आरोप, भाजपचे तीन माजी नगरसेवक शिवसेनेत
Prakash Ambedkar on Badlapur Nagarsevak: भाजप हा खाणाऱ्यांचा पक्ष होताच, तो आता बलात्कारातील आरोपींचा पक्ष झाला, व्यभिचाराचा मार्ग RSS भाजपने अवलंबला आहे; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
भाजप हा खाणाऱ्यांचा पक्ष होताच, तो आता बलात्कारातील आरोपींचा पक्ष झाला, व्यभिचाराचा मार्ग RSS भाजपने अवलंबला आहे; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
देवाच्या नावाखाली 60 हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठीच शक्तिपीठ महामार्ग; त्यापेक्षा विदर्भ ते कोकण जोडणारा कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वेमार्ग तातडीने पूर्ण करा; राजू शेट्टींचा हल्लाबोल
देवाच्या नावाखाली 60 हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठीच शक्तिपीठ महामार्ग; त्यापेक्षा विदर्भ ते कोकण जोडणारा कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वेमार्ग तातडीने पूर्ण करा; राजू शेट्टींचा हल्लाबोल
पुण्यात मेट्रो मोफत, अजित पवारांची घोषणा; पण महापालिकेला अधिकार आहे का? सध्या प्रवासी, तिकीट उत्पन्न किती?
पुण्यात मेट्रो मोफत, अजित पवारांची घोषणा; पण महापालिकेला अधिकार आहे का? सध्या प्रवासी, तिकीट उत्पन्न किती?
मोठी बातमी! अखेर बदलापूर बाल लैंगिक अत्याचारातील आरोपी तुषार आपटेचा राजीनामा; भाजपची पुन्हा नाचक्की
मोठी बातमी! अखेर बदलापूर बाल लैंगिक अत्याचारातील आरोपी तुषार आपटेचा राजीनामा; भाजपची पुन्हा नाचक्की
मुंबईत वर्षा गायकवाडांच्या बालहट्टानं काय मिळवलं? कार्यकर्ते असूनही काँग्रेसने तब्बल 20 जागा वाऱ्यावर सोडल्या, वंचितने सुद्धा 16 जागांवर उमेदवार दिलेच नाहीत
मुंबईत वर्षा गायकवाडांच्या बालहट्टानं काय मिळवलं? कार्यकर्ते असूनही काँग्रेसने तब्बल 20 जागा वाऱ्यावर सोडल्या, वंचितने सुद्धा 16 जागांवर उमेदवार दिलेच नाहीत
कुंभमेळ्याचे बजेट गिरीश महाजन विरोधीपक्ष फोडण्यासाठी वापरतात; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप
कुंभमेळ्याचे बजेट गिरीश महाजन विरोधीपक्ष फोडण्यासाठी वापरतात; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप
Embed widget