एक्स्प्लोर

Dhule News : धुळ्यातील दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्गांना अपघातांचा विळखा? चार वर्षांत 887 अपघात, तर 278 मृत्यू

Maharashtra Dhule News : राज्यातील राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचे सापळे बनत चालले आहेत, असा सूर आता सर्वत्र उमटायला सुरुवात झाली आहे. याला कारण आहे वाढती अपघातांची संख्या.

Maharashtra Dhule News : आधी समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) झालेला अपघात आणि त्यानंतर मुंबई-आग्रा महामार्गावरील (Dhule-Mumbai-Agra Highway) पळासनेर गावाजवळ झालेला अपघात यांमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला. महामार्गांवर होणाऱ्या अपघातांची दिवसेंदिवस संख्या वाढत आहे. धुळे जिल्ह्यातील दोन राष्ट्रीय महामार्गांवर गेल्या चार वर्षांत 887 अपघात झाले आहेत. 278 लोकांनी आपला जीव गमवावा लागला आहे. 

राज्यातील राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचे सापळे बनत चालले आहेत, असा सूर आता सर्वत्र उमटायला सुरुवात झाली आहे. याला कारण आहे वाढती अपघातांची संख्या. मागील शनिवारी समृद्धी महामार्गावर झालेला बसचा भीषण अपघात आणि त्यानंतर गेल्या दोन दिवसांपूर्वी मुंबई-आग्रा महामार्गावरील पळासनेर गावाजवळ झालेला कंटेनरचा भीषण अपघात यामध्ये अनेकांनी आपला जीव गमावला. वाढती अपघातांची संख्या ही सध्या चिंतेची बाब आहे. 

धुळे जिल्ह्यातून मुंबई - आग्रा आणि नागपूर - सूरत हे दोन राष्ट्रीय महामार्ग जातात. या दोन महामार्गांवरून रात्रंदिवस वाहनांची वर्दळ सुरू असते, शहरांसह जिल्ह्यात वाढणारी वाहनांची संख्या, महामार्गावरून वाहन चालविताना होणारं नियमांचं उल्लंघन ही वारंवार अपघात होण्यामागील प्रमुख कारणं आहेत. विशेष म्हणजे, या दोन्ही महामार्गांवर वाढणारे अपघात रोखण्यासाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत, धुळे जिल्ह्यात गेल्या चार वर्षांत तब्बल 887 अपघात झाले असून 278 जणांचा मृत्यू झाला आहे. 

धुळे जिल्ह्यातील दोन्ही राष्ट्रीय महामार्गाच्या ठिकाणी 18 ठिकाणं अशी आहेत की, तिथे सातत्यानं अपघात होतात. मात्र या ब्लॅक स्पॉट समजला जाणाऱ्या ठिकाणी कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत, सूरत नागपूर महामार्गाचे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेले काम अजूनही संथ गतीनं सुरू आहे. यामुळे एकीकडे नागरिकांचा प्रवास सुसाट व्हावा यासाठी राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती होत असली तरी दुसरीकडे मात्र होणाऱ्या अपघातांची संख्या अफाट असल्यानं हे अपघात रोखण्यासाठी प्रशासनानं तात्काळ उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

धुळे-मुंबई-आग्रा महामार्गावर झालेला भीषण अपघात 

धुळे - मुंबई - आग्रा महामार्गावर (Dhule-Mumbai-Agra Highway) पळासनेर (Palasner) गावाजवळ भीषण अपघात (Accident) झालेला. ब्रेक फेल होऊन कंटेनर एका हॉटेलमध्ये शिरल्यामुळे भीषण अपघात झाला होता. या अपघातात 12 जणांचा चिरडून जागीच मृत्यू झाला होता. तर या भीषण अपघातात पंधरा ते वीसजण जखमी झाले होते. मृतांची संख्या आणखी वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget