एक्स्प्लोर

तीन पक्षाचे सरकार त्यांच्या वजनाने पडेल, त्या दिवशी भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करेल : देवेंद्र फडणवीस

कारवाईच्या भीतीमुळे संजय राऊत बोलत असल्याचे सांगताना जर चूक नसेल तर कशाला कारवाई होईल आणि अशी चुकीची कारवाई केल्यावर कोर्ट सोडेल का? असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी केला.

पंढरपूर : राज्यातील तीन पक्षांचे सरकार हे त्यांच्या वजनानेच पडणार असून यानंतर भाजप लगेच स्वबळावर सत्ता स्थापन करेल. यासाठी कोणताही मुहूर्त ठरवलेला नसल्याचे विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पंढरपूर येथे पदवीधर उमेदवाराच्या प्रचारासाठी आले असता ते बोलत होते. आज देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीला दिवंगत जेष्ठ आमदार सुधाकर परिचारक यांचे घरी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले आणि नंतर भगताचार्य कै वा ना उत्पात यांचे घरी भेट दिली. यानंतर कार्तिकी यात्रेच्या तोंडावर मंदिरात न जाता नामदेव पायरी जवळूनच विठ्ठलाचे दर्शन घेतले. यावेळी आमदार सुभाष देशमुख, विजय देशमुख, रणजितसिंह मोहिते पाटील, प्रशांत परिचारक, गोपीचंद पडळकर, राम सातपुते, खासदार रणजित निंबाळकर, खासदार जय सिद्धेश्वर स्वामी, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे उपस्थित होते. असले सरकार चालत नसते, आम्हाला कोणतीही घाई नाही वाट बघा असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. संजय राऊत यांच्याकडून ईडी प्रकरणातील कारवाईनंतर होत असलेल्या टीकेचा समाचार घेताना संजय राऊत यांच्यापेक्षा खालच्या पातळीवर आम्हाला बोलता येते, मात्र आमची ती संस्कृती नाही. ते वापरतात त्यापेक्षा वाईट शब्द आम्ही वापरू शकतो असं फडणवीस यांनी म्हटलं. असे शब्द केवळ होत असलेल्या कारवाईच्या भीतीमुळे संजय राऊत बोलत असल्याचे सांगताना जर चूक नसेल तर कशाला कारवाई होईल आणि अशी चुकीची कारवाई केल्यावर कोर्ट सोडेल का? असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी केला.

चुकीच्या पद्धतीने केलेल्या कारवाईबाबत काय होते ते अर्णब गोस्वामी यांच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने दाखवून दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले. केंद्रीय संस्थांच्या गैरवापराची एकही केस दाखवा असे आव्हान देताना गैरवापर केला असता तर परिस्थितीच वेगळी दिसली असती. पंतप्रधान अथवा केंद्रीय गृहमंत्री कधीही या संस्थांच्या कामात हस्तक्षेप करत नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले . संजय राऊत देत असलेल्या फालतू धमक्यांना आम्ही भीक नाही घालत, असंही संजय राऊत यांनी म्हटलं.

सध्या संजय राऊत यांना बिहार दिसू लागले असून सत्तेत आल्यावर शिवसेना व संजय राऊत कसे बदलत गेले हे लव्ह जिहाद प्रकरणावरून दिसतंय. 2014 मध्ये व्हॅलेंटाईन डे दिवशी बसणाऱ्या जोडप्याने मारहाण करणारी शिवसेना आता लव्ह जिहादबाबत अग्रलेख लिहितंय हे पाहून गंमत वाटते, असा टोलाही फडणवीसांनी संजय राऊत आणि शिवसेनेला लगावला .

महत्त्वाच्या बातम्या

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता टोलकरी गडकरींचा राजीनामा झाला पाहिजे, हर्षवर्धन सपकाळांची मागणी 
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता टोलकरी गडकरींचा राजीनामा झाला पाहिजे, हर्षवर्धन सपकाळांची मागणी 
सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीवरुन राजकारण तापलं, सोसायटी ठरावावरुन कराडमध्ये दोन गटात जोरदार हाणामारी, 10 जणांवर गुन्हा दाखल
सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीवरुन राजकारण तापलं, सोसायटी ठरावावरुन कराडमध्ये दोन गटात जोरदार हाणामारी, 10 जणांवर गुन्हा दाखल
Marathi Actor Hemant Dhome: 'गोळ्या घालणाऱ्यांना आजही नीट झोप येत नाही' हेमंत ढोमेंची सणसणीत कविता, नेटकऱ्यांकडून कौतुक
'गोळ्या घालणाऱ्यांना आजही नीट झोप येत नाही' हेमंत ढोमेंची सणसणीत कविता, नेटकऱ्यांकडून कौतुक
Siddaramaiah: 'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Siddaramaiah: 'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
Zimbabwe vs India, 3rd T20I: टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार : मंगलप्रभात लोढा
‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार : मंगलप्रभात लोढा
Paper Leak: पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
Devendra Fadnavis: तुम्ही दिल्लीला जाणार का, शिक्षणमंत्री होणार का? देवेंद्र फडणवीसांनी अवघ्या दोन ओळीत विषय संपवला; म्हणाले, मी...
तुम्ही दिल्लीला जाणार का, शिक्षणमंत्री होणार का? देवेंद्र फडणवीसांनी अवघ्या दोन ओळीत विषय संपवला; म्हणाले, मी...
Thackeray Brothers Rally : हातात तिरंगा अन् मनात समाधानाची भावना...मुंबईत ठाकरे बंधूंची अभिनंदन सभा; शिवाजी पार्क परिसरात तरुणाईचा जल्लोष, पाहा PHOTOS
हातात तिरंगा अन् मनात समाधानाची भावना...मुंबईत ठाकरे बंधूंची अभिनंदन सभा; शिवाजी पार्क परिसरात तरुणाईचा जल्लोष, पाहा PHOTOS
Uddhav Thackeray and Nitin Gadkari: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता पुढचा नंबर नितीन गडकरींचा? उद्धव ठाकरेंनी भाषणातून हिंट दिली, म्हणाले...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता पुढचा नंबर नितीन गडकरींचा? उद्धव ठाकरेंनी भाषणातून हिंट दिली, म्हणाले...
Embed widget