एक्स्प्लोर

तीन पक्षाचे सरकार त्यांच्या वजनाने पडेल, त्या दिवशी भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करेल : देवेंद्र फडणवीस

कारवाईच्या भीतीमुळे संजय राऊत बोलत असल्याचे सांगताना जर चूक नसेल तर कशाला कारवाई होईल आणि अशी चुकीची कारवाई केल्यावर कोर्ट सोडेल का? असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी केला.

पंढरपूर : राज्यातील तीन पक्षांचे सरकार हे त्यांच्या वजनानेच पडणार असून यानंतर भाजप लगेच स्वबळावर सत्ता स्थापन करेल. यासाठी कोणताही मुहूर्त ठरवलेला नसल्याचे विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पंढरपूर येथे पदवीधर उमेदवाराच्या प्रचारासाठी आले असता ते बोलत होते. आज देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीला दिवंगत जेष्ठ आमदार सुधाकर परिचारक यांचे घरी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले आणि नंतर भगताचार्य कै वा ना उत्पात यांचे घरी भेट दिली. यानंतर कार्तिकी यात्रेच्या तोंडावर मंदिरात न जाता नामदेव पायरी जवळूनच विठ्ठलाचे दर्शन घेतले. यावेळी आमदार सुभाष देशमुख, विजय देशमुख, रणजितसिंह मोहिते पाटील, प्रशांत परिचारक, गोपीचंद पडळकर, राम सातपुते, खासदार रणजित निंबाळकर, खासदार जय सिद्धेश्वर स्वामी, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे उपस्थित होते. असले सरकार चालत नसते, आम्हाला कोणतीही घाई नाही वाट बघा असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. संजय राऊत यांच्याकडून ईडी प्रकरणातील कारवाईनंतर होत असलेल्या टीकेचा समाचार घेताना संजय राऊत यांच्यापेक्षा खालच्या पातळीवर आम्हाला बोलता येते, मात्र आमची ती संस्कृती नाही. ते वापरतात त्यापेक्षा वाईट शब्द आम्ही वापरू शकतो असं फडणवीस यांनी म्हटलं. असे शब्द केवळ होत असलेल्या कारवाईच्या भीतीमुळे संजय राऊत बोलत असल्याचे सांगताना जर चूक नसेल तर कशाला कारवाई होईल आणि अशी चुकीची कारवाई केल्यावर कोर्ट सोडेल का? असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी केला.

चुकीच्या पद्धतीने केलेल्या कारवाईबाबत काय होते ते अर्णब गोस्वामी यांच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने दाखवून दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले. केंद्रीय संस्थांच्या गैरवापराची एकही केस दाखवा असे आव्हान देताना गैरवापर केला असता तर परिस्थितीच वेगळी दिसली असती. पंतप्रधान अथवा केंद्रीय गृहमंत्री कधीही या संस्थांच्या कामात हस्तक्षेप करत नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले . संजय राऊत देत असलेल्या फालतू धमक्यांना आम्ही भीक नाही घालत, असंही संजय राऊत यांनी म्हटलं.

सध्या संजय राऊत यांना बिहार दिसू लागले असून सत्तेत आल्यावर शिवसेना व संजय राऊत कसे बदलत गेले हे लव्ह जिहाद प्रकरणावरून दिसतंय. 2014 मध्ये व्हॅलेंटाईन डे दिवशी बसणाऱ्या जोडप्याने मारहाण करणारी शिवसेना आता लव्ह जिहादबाबत अग्रलेख लिहितंय हे पाहून गंमत वाटते, असा टोलाही फडणवीसांनी संजय राऊत आणि शिवसेनेला लगावला .

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope : कुंभ आणि मीन राशींना एप्रिलच्या नवीन आठवड्यात घडणार मोठ्ठ्या घडामोडी; फक्त 'ही' गोष्ट टाळा, साप्ताहिक राशीभविष्य
कुंभ आणि मीन राशींना एप्रिलच्या नवीन आठवड्यात घडणार मोठ्ठ्या घडामोडी; फक्त 'ही' गोष्ट टाळा, साप्ताहिक राशीभविष्य
Mumbai MHADA: देशातील सर्वात मोठा पुनर्विकास प्रकल्प, '15 मिनिटांचे शहर' म्हणून नवी ओळख, मोतीलाल नगर पुनर्विकासाचा मास्टरप्लान सादर
देशातील सर्वात मोठा पुनर्विकास प्रकल्प, '15 मिनिटांचे शहर' म्हणून नवी ओळख, मोतीलाल नगर पुनर्विकासाचा मास्टरप्लान सादर
Maharashtra Live blog updates: समृद्धी महामार्गालगत नवनगरे विकसित करण्याचा प्रकल्प बारगळला
Maharashtra Live blog updates: समृद्धी महामार्गालगत नवनगरे विकसित करण्याचा प्रकल्प बारगळला
Anil Parab : मुंबईत MMRDA च्या टेंडर प्रक्रियेत फिक्सिंगचा आरोप, आठपैकी सहा कंपन्यांना माघार घ्यायला लावली, अनिल परबांचा गंभीर आरोप
मुंबईत MMRDA च्या टेंडर प्रक्रियेत फिक्सिंगचा आरोप, आठपैकी सहा कंपन्यांना माघार घ्यायला लावली, अनिल परबांचा गंभीर आरोप

व्हिडीओ

PM Modi UNCUT : काँग्रेसने महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या केली, स्वप्नांचा चक्काचूर केला- मोदी
PM Modi on Women Reservation Bill : काँग्रेसने त्यांचं अस्तित्व गमावलं तुफान हल्लाबोल
PM Modi on Women Reservation Bill : नारीशक्ती विधेयक नामंजूर, पंतप्रधान मोदींनी मागितली माफी
Sanjay Raut PC : 'मोदी हैं तो नामुमकिन हैं' अशी परिस्थिती, राऊतांचा हल्लाबोल
Sharad Ponkshe Nanded Speech : 1 लाख खरात एकत्र केले तर 1 अकबर तयार होईल, शरद पोंक्षे यांचं विधान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोरीने हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले; गावात सन्नाट, पोलीसही चक्रावले
दोरीने हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले; गावात सन्नाट, पोलीसही चक्रावले
Ravichandran Ashwin: चेन्नईचा सरसेनापती बदलणार? आयपीएलच्या मध्यावरच आर. आश्विनच्या भविष्यवाणीने खळबळ
चेन्नईचा सरसेनापती बदलणार? आयपीएलच्या मध्यावरच आर. आश्विनच्या भविष्यवाणीने खळबळ
घरच्या मैदानात आरसीबी हरताच कॅप्टन रजत पाटीदारचा संताप अनावर; नेमकं काय म्हणाला?
घरच्या मैदानात आरसीबी हरताच कॅप्टन रजत पाटीदारचा संताप अनावर; नेमकं काय म्हणाला?
Video: बाॅम्बवर्षावातही माऊलीची नवजात बालकांना वाचवण्याची धडपड, जीवाच्या आकांताने पळापळ, आयसीयूतील रुग्ण रस्त्यावर; इराणी हॉस्पिटलवर अमेरिका-इस्त्रायलच्या नरसंहार हल्ल्याचा सव्वा दोन मिनिटांचा भयावह व्हिडिओ
Video: बाॅम्बवर्षावातही माऊलीची नवजात बालकांना वाचवण्याची धडपड, जीवाच्या आकांताने पळापळ, आयसीयूतील रुग्ण रस्त्यावर; इराणी हॉस्पिटलवर अमेरिका-इस्त्रायलच्या नरसंहार हल्ल्याचा सव्वा दोन मिनिटांचा भयावह व्हिडिओ
IPL 2026 Points Table: चेन्नईविरुद्धच्या विजयानंतर गुणतालिकेत हैदराबादची मोठी झेप; ‘हा’ संघ बाहेर पडणार? पाहा कोणता संघ कोणत्या स्थानावर?
चेन्नईविरुद्धच्या विजयानंतर गुणतालिकेत हैदराबादची मोठी झेप; ‘हा’ संघ बाहेर पडणार? पाहा कोणता संघ कोणत्या स्थानावर?
Pune Crime News : खळबळजनक! मुठा नदीपात्रात अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडला, घातपाताचा संशय, पुणे पोलिसांकडून तपास सुरु
खळबळजनक! मुठा नदीपात्रात अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडला, घातपाताचा संशय, पुणे पोलिसांकडून तपास सुरु
Bhandara Crime News: भंडाऱ्यात गो तस्करांची मुजोरी, थेट पोलिसाची कॉलर पकडून धक्काबुक्की अन्...; नेमकं काय घडलं?
भंडाऱ्यात गो तस्करांची मुजोरी, थेट पोलिसाची कॉलर पकडून धक्काबुक्की अन्...; नेमकं काय घडलं?
Jaykumar Gore : राज्यावर एल निनोचं संकट, उन्हाळ्यात एकच पाण्याचे आवर्तन, उजनी धरणाच्या पाण्याचा काटकसरीने वापर, पालकमंत्री जयकुमार गोरेंचं सोलापूरकरांना आवाहन
राज्यावर एल निनोचं संकट, उन्हाळ्यात एकच पाण्याचे आवर्तन, उजनी धरणाच्या पाण्याचा काटकसरीने वापर, पालकमंत्री जयकुमार गोरेंचं सोलापूरकरांना आवाहन
Embed widget