एक्स्प्लोर

Vidarbha Flood: पूरग्रस्त भागांचे सर्वेक्षण करा, पण संवेदनशीलतेने

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्धा, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीची पाहणी केल्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयात विभागातील सहा जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.

नागपूर : कमी वेळात अधिक पाऊस कोसळल्यामुळे जुलै महिन्यात पूर्व विदर्भावर आभाळ कोसळले आहे. 1 लाख 34 हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत अतिशय संवेदनशीलतेने व सामान्य नागरिकांचे, शेतकऱ्यांचे समाधान होईल अशा पध्दतीने सर्वेक्षण करा. राज्य सरकारचे विदर्भासह राज्यातील पूर परिस्थितीवर बारकाईने लक्ष असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

वर्धा, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीची पाहणी केल्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयात नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बैठकीत आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना जिथे शक्य आहे तिथे दुबार पेरणीसाठी मदत करण्याचे निर्देश दिले. खते, बियाण्यांसाठी तातडीने मदत केली जाईल तथापि, आता पुराच्या दु:खात असणाऱ्या नागरिकांना, शेतकऱ्यांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे. त्यांना योग्य निवारा व जीवनावश्यक सोयीसुविधा द्याव्यात. पशुधन मोठ्या प्रमाणात मृत्यूमुखी पडले आहेत. त्याची गंभीरतेने नोंद घ्यावी. तातडीची मदत म्हणून देण्यात येणारी आर्थिक मदत विनाअवकाश पोहचावी, असे स्पष्ट निर्देश दिले.

गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गडचिरोली दौरा केला होता. त्यानंतरही गडचिरोली जिल्ह्यातील परिस्थिती अतिशय गंभीर असून मध्य प्रदेशपासून सर्व जिल्ह्यातील पाण्याला गडचिरोलीत थोप बसत आहे. त्यामुळे सिरोंचा तालुक्यातील परिस्थिती अतिशय गंभीर आहे. या जिल्ह्याकडे सर्वाधिक लक्ष वेधणे आवश्यक आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे कायम बाधित होणाऱ्या गावांना कायमस्वरुपी उपाययोजना बहाल करण्यात येतील. तुर्तास सर्व जिल्ह्याने तातडीची कामे व दीर्घ मुदतीच्या सुधारणा अशा पध्दतीचे नियोजन करावे. पायाभूत सुविधांच्या नुकसानीचा नेमका अंदाज घेऊन वेळेत प्रस्ताव सादर करावेत, अशी सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली.

यावेळी त्यांनी कमी वेळात अधिक पाऊस झाल्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीत तितक्याच तत्परतेने प्रतिसाद देणारी यंत्रणा सक्रीय करण्याचे गरज असल्याचे सांगितले. धरणे सगळी भरलेली आहेत. त्यामुळे आता येणारा पाऊस परिस्थिती गंभीर करु शकतो. पाणीसाठे व त्याचे व्यवस्थापन 'हायअलर्ट'वर घ्या. अनेक जिल्ह्यांमधील पीक कर्जाची आकडेवारी बघितली असता सरकारी बँकांची कर्ज वाटपातील आकडेवारी कमी आहे. प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी बँकेला या संदर्भात  विचारणा करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी लसीकरणाबाबत सर्व जिल्ह्यांमध्ये नागरिकांनी बुस्टर डोस घेण्यासाठी प्रेरित करण्याचे आवाहन त्यांनी केले. कोरोना संपलेला नाही. पहिला व दुसरा डोस घेतल्यामुळे देशात कोरोना परिस्थिती नियंत्रणात आहे. बुस्टर डोस घेतल्याशिवाय कोरोनापासून पुढील काळात बचाव नाही, त्यामुळे हे अभियान गतिशील करण्याचे त्यांनी निर्देश दिले. 'हर घर तिरंगा' हे अभियान स्वातंत्र्याच्या अस्मितेचे अभियान आहे. स्वातंत्र्याचे मोल रोजच्या जीवनाच्या धावपळीत कमी होऊ नये. प्रत्येक घर या अस्मितेला अभियानात जोडले जाईल, याची खातरजमा करा. नागपूर विभागात अमृत सरोवर योजनेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. या योजनेतून तयार झालेले तलाव वेगळेपण जपतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

तत्पूर्वी विभागीय आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी विभागातील पूरपरिस्थिती, पेरणी, खतांचा पुरवठा, बियाण्यांची उपलब्धता, आत्तापर्यंत झालेला पाऊस व करण्यात आलेल्या उपाययोजना, मदत कार्य व आपत्ती व्यवस्थापनाबाबत माहिती उपमुख्यमंत्र्यांना दिली. पूरपरिस्थिती सोबतच त्यांनी नागपूर विभागातील पीक कर्ज वाटप, कोविड लसीकरण, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत 'हर घर तिरंगा', अमृत सरोवर योजनांची माहिती दिली.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 25 May 2026: आज सोमवारचा दिवस 6 राशींचं नशीब पालटणारा! भोलेनाथांच्या कृपेने पैसा, नोकरी, प्रेमात 'हे' बदल.. आजचे राशीभविष्य
आज सोमवारचा दिवस 6 राशींचं नशीब पालटणारा! भोलेनाथांच्या कृपेने पैसा, नोकरी, प्रेमात 'हे' बदल.. आजचे राशीभविष्य
Chandrashekhar Bawankule : पुढील पाच वर्षात शेतरस्ते बारमाही करणार, अतिक्रमण करणाऱ्या 'त्या'  शेतकऱ्यांचे ॲग्रीस्टॅक नंबर बंद करणार : चंद्रशेखर बावनकुळे 
पुढील पाच वर्षात शेतरस्ते बारमाही करणार, शेतकऱ्यांनी सर्व रस्ते या मोहिमेत आणावेत : चंद्रशेखर बावनकुळे 
बीड पुन्हा हादरलं! अवैध दारु दुकानात काम करणाऱ्या तरुणाला अमानुषपणे संपवलं, नातेवाईक आक्रमक, पोलीस ठाण्यातच ठिय्या 
बीड पुन्हा हादरलं! अवैध दारु दुकानात काम करणाऱ्या तरुणाला अमानुषपणे संपवलं, नातेवाईक आक्रमक, पोलीस ठाण्यातच ठिय्या 
Ambadas Danve : संजय गायकवाड फक्त कव्हर पेज वाचतो, किमान प्रस्तावना वाचावी, अंबादास दानवेंनी दगलबाज शिवाजी पुस्तकावर बंदीच्या मागणीवरुन गायकवाडांना सुनावलं
प्रबोधनकारांच्या विचारावर शिवसेना चालते, एकनाथ शिंदेंनी वाचाळवीरांचा बंदोबस्त करावा, अंबादास दानवेंचा संजय गायकवाड यांना टोला

व्हिडीओ

Shivraj Motegaonkar Update : मोटेगावकरचा ईडीकडून क्लास, एवढी मालमत्ती कशी जमवली? Special Report
Rahul Gandhi On Narendra Modi : राहुल गांधींचा तर्क, कुठला संदर्भ? Special Report
Anna Hazare Ahilyanagar : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंकडून कॉकरोज जनता पार्टीचे समर्थन...
Prashant Ambi on Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांचे कार्यकर्ते फोनवर मला आई-बहिणी वरून शिव्या देतात
Laxman Hake PC : जरांगे नावाच्या एका अनपढ माणसामुळे ओबीसीचं आरक्षण संपलं, हाके आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Revati Sule Marriage : सुप्रिया सुळे यांनी लेक रेवती आणि जावई सारंग यांच्यासह घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेकीच्या विवाह सोहळ्याचं विविध नेत्यांना निमंत्रण
सुप्रिया सुळे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेक रेवती आणि जावई सारंग यांच्या विवाह सोहळ्याचं निमंत्रण, दिल्लीत विविध नेत्यांच्या भेटी
Ambadas Danve : संजय गायकवाड फक्त कव्हर पेज वाचतो, किमान प्रस्तावना वाचावी, अंबादास दानवेंनी दगलबाज शिवाजी पुस्तकावर बंदीच्या मागणीवरुन गायकवाडांना सुनावलं
प्रबोधनकारांच्या विचारावर शिवसेना चालते, एकनाथ शिंदेंनी वाचाळवीरांचा बंदोबस्त करावा, अंबादास दानवेंचा संजय गायकवाड यांना टोला
Chandrashekhar Bawankule : पुढील पाच वर्षात शेतरस्ते बारमाही करणार, अतिक्रमण करणाऱ्या 'त्या'  शेतकऱ्यांचे ॲग्रीस्टॅक नंबर बंद करणार : चंद्रशेखर बावनकुळे 
पुढील पाच वर्षात शेतरस्ते बारमाही करणार, शेतकऱ्यांनी सर्व रस्ते या मोहिमेत आणावेत : चंद्रशेखर बावनकुळे 
IPL 2026 Playoffs : आयपीएल प्लेऑफसाठी चार संघ ठरले, पहिल्या दोन लढती फिक्स, बंगळुरु-गुजरात, हैदराबाद- राजस्थान कधी आमने सामने येणार? संपूर्ण वेळापत्रक
आयपीएल प्लेऑफसाठी चार संघ निश्चित, पहिल्या दोन लढती फिक्स, बंगळुरु-गुजरात, हैदराबाद- राजस्थान कधी आमने सामने येणार?
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
विजेचा खांब पडून एकाचा मृत्यू; घरावरील उघड्या वायरचा करंट बसून चिमुकलाही ठार; दोन दुर्घटनेनंतर नागरिक संतप्त
विजेचा खांब पडून एकाचा मृत्यू; घरावरील उघड्या वायरचा करंट बसून चिमुकलाही ठार; दोन दुर्घटनेनंतर नागरिक संतप्त
Ladki Bahin Yojana :शासनानं राबवलेल्या लाडकी बहीण योजनेमुळं खूप ताण पडलाय, वेगवेगळ्या ठिकाणी जितकं फंडिंग यायला पाहिजे तितकं येत नाही : उदयनराजे भोसले
लाडकी बहीण योजना शासनानं राबवली त्याच्यामुळं खूप ताण पडलाय, उदयनराजे भोसले यांचं मोठं वक्तव्य
Embed widget