एक्स्प्लोर

सरकारने मराठ्यांची फसवणूक केली, आरक्षण फक्त दिल्लीतच; हर्षवर्धन जाधवांचा दावा

Harshvardhan Jadhav : माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राज्य शासनाने मराठा समाजाची फसवणूक केली असल्याचं म्हटले आहे.

छत्रपती संभाजीनगर : मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या मुंबई आंदोलनानंतर सरकराने तातडीने अध्यादेश काढता मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न सोडवला असल्याचा दावा केला जात आहे. तर, मराठा समाजाला याच मोठा फायदा होणार असून, आरक्षणाचा लढा यशस्वी झाला असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. दरम्यान, यावरच प्रतिक्रिया देतांना माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांनी मात्र, राज्य शासनाने मराठा समाजाची फसवणूक केली असल्याचं म्हटले आहे. तसेच, दिल्ली शिवाय आरक्षण शक्य नाही असेही जाधव म्हणाले आहेत. 

यावेळी बोलतांना जाधव म्हणाले की, "मराठा समाजाला अध्यादेश देऊन राज्य सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे. अध्यादेश कायद्यामध्ये परिवर्तित करण्याच्या संबंधित भूमिका सहा महिन्याच्या नंतर किंवा अगोदर घेण्याच्या संदर्भात जो विषय आहे. त्यावर माझा राज्य शासनाला प्रश्न आहे, तुम्ही हे आंदोलन वाशीला पोहोचलं तेव्हा नाक दाबून तोंड उघडलं अशी परिस्थिती तुमची झाली. तुमचे इंटेन्शन क्लियर असते तर हे आंदोलन सुरू असताना विधानसभेचे लोकसभेचे सभागृह सुरू असताना या संबंधितीचा कायदा क्लिअर केला असता. पण तुम्ही तसं केलेलं नाही. म्हणून तुम्ही मराठा समाजाची फसवणूक केली आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही,” असे हर्षवर्धन जाधव म्हणाले आहेत. 

दिल्ली शिवाय आरक्षण शक्य नाही...

पुढे बोलतांना हर्षवर्धन जाधव म्हणाले की, "मराठा समाजाने लक्षात घेण्याची आवश्यकता आहे, सरकार एकीकडे ओबीसी समाजाचे आरक्षणाला हात लागू देणार नाही असे सांगते, दुसरीकडे मराठा समाजाला मात्र आरक्षण देऊ अशी भूमिका घेत अध्यादेश काढतायत. सरकार हे फक्त भांडण लावण्यामध्ये व्यस्त आहे. त्यामुळे मराठा समाजाला जर आरक्षण हव असेल, तर ते दिल्लीतच करावं लागेल. त्या पलीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देणे हे फक्त दिल्लीतच शक्य आहे. मराठा आरक्षण मिळेल असं मला वाटत नाही, म्हणून मी मराठा समाजाला आव्हान करतो की, ईतर समाजाला सोबत घेऊन दिल्ली काबीज करावी लागेल, तेव्हा आरक्षण मिळेल. नाहीतर हे फक्त भांडण लावण्याच्या पलीकडे काही होणार नाही,” असे आमदार हर्षवर्धन जाधव म्हणाले. 

फक्त विरोध म्हणून विरोध करु नका...

सरकारने काढलेल्या अध्यादेशावर होणाऱ्या टिकेबाबत बोलतांना मनोज जरांगे म्हणाले आहे की,“फक्त विरोध म्हणून विरोध करु नका. जेवढा विरोध होणार तेवढा हा कायदा मजबूत होणार आहे. काही लोकं जाणीवपूर्वक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. काहींच्या दुकानं बंद झाल्याने त्यांना याचा राग आहे. मात्र, मराठा समाजाच्या मुलांच्या ताटात माती कालवण्याचे काम करू नका असे आवाहन करत असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

ईशा झा यांना ब्लॅकमेल केले जात आहे; हर्षवर्धन जाधवांचा दावा, सुरक्षा पुरवण्याची मागणी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Govinda Gun Fire: गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
अमेरिका-चीननंतर 2050 पर्यंत 'हा' देश सुपरपॉवर, चांगले संबंध ठेवा, ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांनी कोणत्या देशाचं नाव घेतलं? भारत की पाकिस्तान? 
भारतासोबत चांगले संबंध ठेवा, 2050 पर्यंत सुपरपॉवर देशांच्या यादीत केवळ 3 देश असणार, टोनी ब्लेअर काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : लव्ह जिहादच्या तब्बल एक लाखांपेक्षा जास्त तक्रारी - देवेंद्र फडणवीसTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2PM : 1 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaBJP Melava Navi Mumbai : अमित शाह यांच्या बैठकीसाठी भाजप कार्यकर्त्यांनी बनवले बोगस आयडीABP Majha Headlines :  2 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Govinda Gun Fire: गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
अमेरिका-चीननंतर 2050 पर्यंत 'हा' देश सुपरपॉवर, चांगले संबंध ठेवा, ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांनी कोणत्या देशाचं नाव घेतलं? भारत की पाकिस्तान? 
भारतासोबत चांगले संबंध ठेवा, 2050 पर्यंत सुपरपॉवर देशांच्या यादीत केवळ 3 देश असणार, टोनी ब्लेअर काय म्हणाले?
Jayant Patil: जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
Mumbai Accident: मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, बाबांसोबत शाळेला निघालेल्या चिमुकलीचा मृत्यू, जखमी बाप मृतदेह मांडीवर घेऊन भ्रमिष्टासारखा बसून राहिला
मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, लेकीने बाबाच्या मांडीवरच प्राण सोडले, वडील भ्रमिष्टासारखे रस्त्यावरच बसून राहिले
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
Embed widget