Manoj Jarange : छगन भुजबळ बावचळलाय, येड्यासारखं करतोय, मराठ्यांचं वाटोळ करण्यासाठी प्रयत्नशील; मनोज जरांगेंची शेलक्या भाषेत टीका
Manoj Jarange on Chhagan Bhujbal : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर शेलक्या भाषेत टीका केली आहे.

Manoj Jarange on Chhagan Bhujbal : छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) बावचाळला आहे, मराठ्यांना आता तो शत्रू समाजतोय, मराठ्यांचा वाटोळं करण्यासाठी तो काम करतोय, आता त्याला महत्व देणार नाही, तो हतबल झाला आहे, त्याला वेड लागू शकते. अशा एकेरी शब्दत उल्लेख करत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर शेलक्या भाषेत टीका केली आहे. मी पितो तर तू पण ये प्यायला माझ्या सोबत, काहीही बोलतो, म्हातारा येड्या सारख करतोय असेही मनोज जरांगे म्हणाले. (Manoj Jarange on Chhagan Bhujbal)
मराठे आणि छोट्या-छोट्या जातींचेसंबंध खराब करण्याचे पाप भुजबळ करताय. आमच्या जीआरमूळ ते पिसाळल्यासारखा झालाय, पूरते पागल झाला आहे. असं म्हणत पुन्हा एकदा मनोज जरांगेंनी छगन भुजबळ यांच्यावर जोरदार पलटवार केलाय. फक्त आम्हाला धोका बसला तर सरकारवर आम्ही घसरणार. आज मी सुट्टी घेतोय, मला भेटायला रोज येऊ नाका, शनिवार रविवार या फक्त असे आवाहन देखील त्यांनी नागरिकांना यावेळी केलंय.
Manoj Jarange : नीX माणूस..40 वर्षांपासून मराठ्यांचं वाटोळं केलं; मनोज जरांगे संतापले
काही ओबीसीचे लोक मराठ्यांना टार्गेट करताय, अधिकारी टार्गेट करताय, कारण नसताना निलंबित करताय. भुजबळ महत्व द्यायचा लायकीचे राहिले नाही, इतक्या नीX विचारांचे ते आहे. असला माणूस कुठल्याच जातीत जन्मू नये. विनाकारण मराठ्यांच्या विरोधात टोळी निर्मान केलीय. त्यामुळं मराठ्यांनाआरक्षणसाठी लढावे लागणार आहे. शेती तर अडचणीत आली, तर पगार वाचवेल. नोकरी वाचवेल म्हणून आपल्याला आरक्षणची गरज आहे. असेही मनोज जरांगे म्हणाले.
Manoj Jarange on Ajit Pawar : अजित दादा काहीही म्हटले तरी सगळे त्याचेच...
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यासमोरच नाराजी व्यक्त केली आहे. यावर बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले कि, अजित दादा काहीही म्हटले तरी सगळे त्याचेच आहे. अजित दादा सावध व्हा, आधी ही सांगितले, आता ही सांगतो. खूप मोठं षडयंत्र यांनी रचले आहे. अजित दादांचा पक्ष बदनाम होणार का, बोलणारे सगळे त्यांचेच आहे. परळीत टोळी आहे. मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचे नाही. अजित पावर यांना संपवायचे असे हे षडयंत्र आहे.असेही मनोज जरांगे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या



















