एक्स्प्लोर

Chandrashekhar Bawankule : दुबार मतदार यादी ही 25 वर्षांपासून, संपूर्ण यादी स्क्रॅप केल्याशिवाय... चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?

Chandrashekhar Bawankule On Voter List : दुबार मतदार हा अॅडिशन आणि डिलिशनचा विषय आहे, पण मुंबईत काढण्यात आलेला मोर्चा हा खोटारड्या लोकांचा असल्याचं मत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं.

चंद्रपूर : मतदार यादीत मोठा घोळ (Bogus Voter List) असून त्या माध्यमातून मतचोरी झाल्याचा आरोप करत मनसे आणि महाविकास आघाडीने मुंबईत मोठा मोर्चा (Mumbai Morcha) काढला. या मोर्चावर भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी टीका केली. दुबार मतदारयादीचा विषय हा गेल्या 25 वर्षांपासूनचा आहे, संपूर्ण यादी स्क्रॅप होणार नाही तोपर्यंत दुबार मतदान कमी होणार नाही. पुढच्या काळात घरोघरी जाऊन संपूर्ण मतदार यादी बनवली पाहिजे असं ते म्हणाले.

लोकसभेच्या यादीवरच विधानसभा निवडणुका होतात आणि विधानसभा निवडणुकीच्या यादीवर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतात. मात्र महाविकास आघाडीला माहीत आहे की त्यांचा पराभव निश्चित आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी केलेली ही धडपड आहे असा टोलाही बावनकुळे यांनी लगावला.

Chandrashekhar Bawankule On Voter List : संपूर्ण यादी स्क्रॅप करावी लागेल

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "दुबार तिबार मतदारांवर भाजपचे देखील ऑब्जेक्शन आहे. यावर सर्वात आधी देवेंद्र फडणवीसांनी आक्षेप घेत न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. त्यामुळे येणाऱ्या पुढच्या काळात घरोघरी जाऊन संपूर्ण मतदार यादी बनवली पाहिजे. दुबार मतदार यादी ही आजपासून नाही, तर गेल्या 25 वर्षांपासून आहे. दुबार मतदार यादीवर तुमची लोकसभा झाली, तुमची विधानसभा झाली. जोपर्यंत संपूर्ण यादी स्क्रॅप होणार नाही तोपर्यंत दुबार मतदार कमी होणार नाही. अॅडिशन आणि डिलिशनचा विषय वेगळा आहे. मात्र हा मोर्चा खोटारड्या लोकांचा आह. या लोकांचा पुन्हा पराभव होईल. त्यावेळी पराभव मतदार यादीमुळेच झाला हे सांगण्यासाठीच हा मोर्चा काढण्यात आला होता."

Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी तक्रार करावी

आपल्या नावाने ऑनलाईन पद्धतीने खोटा अर्ज करून कुटुंबातील नावे रद्द करण्याची मागणी करण्यात आल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला होता. त्यावर उत्तर देताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की,

उद्धव ठाकरे यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली पाहिजे. भाषणामध्ये खोटे आरोप करून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे. लोकसभेमध्ये जो खोटारडेपणा केला तोच प्रयत्न केला जात आहे. लोकसभेत काँग्रेसचे 31 खासदार ज्या मतदार यादीवर निवडून आले, तीच ही मतदार यादी आहे. लोकसभेत विजय झाला तर यादी चांगली होती, विधानसभेत पराभव झाला तर मतदार यादी खराब झाली का?

आता महाविकास आघाडीचा चांदा ते बांदा पुन्हा एकदा पराभव होणार आहे. त्यामुळे पराभवासाठी लागणारे कारण उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी शोधत आहे असा टोला बावनकुळे यांनी लगावला.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray: या अ‍ॅनाकोंडाला आपल्याला कोंडावच लागेल, पक्ष चोरल्यानंतर मत चोरीही करत आहेत, यांची भूक क्षमतच नाही; उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर सडकून प्रहार
या अ‍ॅनाकोंडाला आपल्याला कोंडावच लागेल, पक्ष चोरल्यानंतर मत चोरीही करत आहेत, यांची भूक क्षमतच नाही; उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर सडकून प्रहार
Bank Holiday: नोव्हेंबरमध्ये बँका 11 दिवस बंद राहणार, सलग तीन दिवसांची सुट्टी मिळणार, संपूर्ण यादी एका क्लिकवर
नोव्हेंबरमध्ये बँका 11 दिवस बंद राहणार, सलग तीन दिवसांची सुट्टी मिळणार, संपूर्ण यादी एका क्लिकवर
Raj Thackeray: कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड, भिवंडीमधील 4500 मतदारांनी मलबार हिलला सुद्धा मतदान केलं! अशा लाखो लोकांचा महाराष्ट्रात मतदानासाठी वापर, राज ठाकरेंनी नावासकट पुरावा दिला!
कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड, भिवंडीमधील 4500 मतदारांनी मलबार हिलला सुद्धा मतदान केलं! अशा लाखो लोकांचा महाराष्ट्रात मतदानासाठी वापर, राज ठाकरेंनी नावासकट पुरावा दिला!
Uddhav Thackeray Speech : मतचोर जिथे दिसेल त्याला जागेवरच फटकवा, उद्धव ठाकरेंचे आवाहन, निवडणूक आयोगालाही इशारा
मतचोर जिथे दिसेल त्याला जागेवरच फटकवा, उद्धव ठाकरेंचे आवाहन, निवडणूक आयोगालाही इशारा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Uddhav Thackeray : 'तुमच्या बुडाला आग लावण्याची ताकद या ठिणगीमध्ये आहे', थेट इशारा
Uddhav Thackeray : 'मतचोरीचा लाभ कोणी घेतला? मुख्यमंत्र्यांनी पर्दाफाश करावा'- ठाकरे
Uddhav Thackeray : 'कुटुंबियांची नावं मतदार यादीतून वगळण्याचा डाव होता का?', गंभीर आरोप
Pune Gang War: 'आंदेकर टोळी अजूनही सक्रिय', गणेश काळेच्या हत्येने पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान!
Pandharpur Yatra: मराठवाडा, विदर्भावर अतिवृष्टीचं सावट, कार्तिकी यात्रेडे भाविकांनी फिरवली पाठ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray: या अ‍ॅनाकोंडाला आपल्याला कोंडावच लागेल, पक्ष चोरल्यानंतर मत चोरीही करत आहेत, यांची भूक क्षमतच नाही; उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर सडकून प्रहार
या अ‍ॅनाकोंडाला आपल्याला कोंडावच लागेल, पक्ष चोरल्यानंतर मत चोरीही करत आहेत, यांची भूक क्षमतच नाही; उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर सडकून प्रहार
Bank Holiday: नोव्हेंबरमध्ये बँका 11 दिवस बंद राहणार, सलग तीन दिवसांची सुट्टी मिळणार, संपूर्ण यादी एका क्लिकवर
नोव्हेंबरमध्ये बँका 11 दिवस बंद राहणार, सलग तीन दिवसांची सुट्टी मिळणार, संपूर्ण यादी एका क्लिकवर
Raj Thackeray: कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड, भिवंडीमधील 4500 मतदारांनी मलबार हिलला सुद्धा मतदान केलं! अशा लाखो लोकांचा महाराष्ट्रात मतदानासाठी वापर, राज ठाकरेंनी नावासकट पुरावा दिला!
कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड, भिवंडीमधील 4500 मतदारांनी मलबार हिलला सुद्धा मतदान केलं! अशा लाखो लोकांचा महाराष्ट्रात मतदानासाठी वापर, राज ठाकरेंनी नावासकट पुरावा दिला!
Uddhav Thackeray Speech : मतचोर जिथे दिसेल त्याला जागेवरच फटकवा, उद्धव ठाकरेंचे आवाहन, निवडणूक आयोगालाही इशारा
मतचोर जिथे दिसेल त्याला जागेवरच फटकवा, उद्धव ठाकरेंचे आवाहन, निवडणूक आयोगालाही इशारा
Satyacha Morcha Mumbai: फॅशन स्ट्रीट ते मुंबई महापालिका मुख्यालय...मनसे अन् महाविकास आघाडीचा सत्याचा मोर्चा; गर्दी किती?, पाहा Photo's
फॅशन स्ट्रीट ते BMC मुख्यालय...मनसे-महाविकास आघाडीचा सत्याचा मोर्चा; गर्दी किती?, पाहा Photo's
Raj Thackeray : मलबार हिलमध्ये कल्याण ग्रामीण, भिवंडीसह मुरबाडच्या 4500 जणांच मतदान, दुबार मतदारांच्या संख्येचा पाढा वाचला, राज ठाकरेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
मतदार यादीवर काम करा, दुबार तिबार सापडल्यास फोडून काढा,पोलिसांच्या ताब्यात द्या : राज ठाकरे
MVA ans MNS Mumbai Morcha: आमची सत्ता रस्त्यावर! राज अन् उद्धव ठाकरेंची बऱ्याच वर्षांनी खांद्याला खांदा लावत 'मनसे' एकीची वज्रमूठ; निवडणूक आयोगाला गर्भित इशारा
आमची सत्ता रस्त्यावर! राज अन् उद्धव ठाकरेंची बऱ्याच वर्षांनी खांद्याला खांदा लावत 'मनसे' एकीची वज्रमूठ; निवडणूक आयोगाला गर्भित इशारा
केरळ अत्यंत गरिबी दूर करणारे देशातील पहिले राज्य; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
केरळ अत्यंत गरिबी दूर करणारे देशातील पहिले राज्य; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
Embed widget