एक्स्प्लोर

MEMS-Dial 108 : राज्यातील रुग्णवाहिका सेवा बारगळली, रिस्पॉन्स टाईम अडीच ते तीन तास; अत्यावश्यक रुग्णांना फटका

MEMS-Dial 108 : राज्यातील 108 रुग्णवाहिका सेवा बारगळली असून रिस्पॉन्स टाईम अडीच ते तीन तासांनी वाढला आहे. जुनाट गाड्यांमुळे अनेकदा रुग्णवाहिकेत बिघाड होतो. याचा सर्वाधिक फटका अत्यावश्यक रुग्णांना बसत आहे.

Maharashtra Ambulance Service : राज्यातील जनतेला व अत्यावश्यक गंभीर रुग्णाला तात्काळ रुग्णवाहिका (Ambulance) आणि वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून सरकारने कोट्यवधी रुपये खर्च करुन महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्विसेस अर्थात MEMS हा प्रकल्प सुरु केला. या प्रकल्पांतर्गत राज्यात नागरिकांच्या 24 तास अत्यावश्यक सेवेसाठी 1000 रुग्णवाहिका ही तैनात केल्या आणि 108 हा हेल्पलाईन नंबरही सुरु केला. शासनाचा हा प्रकल्प भारत विकास ग्रुप अर्थात BVG या खाजगी कंपनीकडे चालवण्यासाठी दिला आहे. मात्र सुरुवातीला काही वर्षे हा प्रकल्प अत्यंत यशस्वी म्हणून समोर आला. रुग्णांना वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होत असल्याने लाखो रुग्णाचे प्राणही वाचले. पण आता हीच जीवनदायिनी सेवा राज्यात कोलमडत असल्याचं चित्र आहे. नियमानुसार कुठल्याही रुग्णाला अपघातात किंवा गंभीर आजाराच्यावेळी 15 ते 20 मिनिटांतच रुग्णवाहिका उपलब्ध झालीच पाहिजे असा नियम आहे. पण आता या सेवेचा रिस्पॉन्स टाईम हा अतिशय वाढला असून अनेक ठिकाणी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने दोन ते तीन तास रुग्णांना ताटकळत बसावं लागत आहे. यामुळे या सेवेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे तर ग्रामीण भागातील प्रसुती आणि इतर रुग्णांना याचा फटका बसत असल्याचं राज्यभर चित्र आहे.

बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात MEMS या 108 सेवेच्या 23 रुग्णवाहिका सेवेत आहेत. यातील 5 रुग्णवाहिका या अॅडव्हान्स लाईफ सपोर्टसह आहेत तर 18 बेसिक लाईफ सपोर्टसह आहेत. पण अनेक रुग्णवाहिका या जुनाट झाल्या असून काही नादुरुस्त असतात तर काही वेगाने धावू शकत नाही. त्यामुळे या सेवेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. यामुळे मात्र यासेवेतील शासकीय डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांवर तणाव वाढत आहे. तर याचा फटका मात्र प्रसुतीसाठीच्या महिलांना बसत असल्याचं चित्र संपूर्ण राज्यात पाहायला मिळत आहे.

ही सेवा संचालित करणाऱ्या भारत विकास ग्रुपच्या काही अधिकाऱ्यांना याबद्दल विचारणा केली असता त्यांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला. पण ऑफ कॅमेरा त्यांनी दिलेली माहिती सर्वच सांगून जातं. 

या सेवेचा अनियमितपणा, रुग्णवाहिकेचा रिस्पॉन्स टाईम का वाढला?

- ही योजना 2014 साली सुरु झाली.

- सुरुवातीला प्रत्येक अॅम्ब्युलन्स ही फक्त 35 किमीवरीलच कॉल घेईल असं ठरवण्यात आलं होतं.

- आता या अॅम्ब्युलन्स 100 किलोमीटरवरील सुद्धा कॉल घेत आहेत.

- त्यामुळे प्रत्येक वाहनाचं रनिंग वाढलं आहे 

- नियमाप्रमाणे रुग्णवाहिका ही फक्त 3 लाख किमी अंतरापर्यंतच वापरु शकतो, पण राज्यातील या सेवेतील रुग्णवाहिका या सरासरी 5 लाख किमी अंतरएवढ्या आहेत.

- परिणामी सर्व रुग्णवाहिका जुनाट झाल्या असून नादुरुस्तीचं प्रमाण वाढलं.

- गेल्या आठ वर्षात या सेवेसाठी एकही नवीन रुग्णवाहिका घेण्यात आली नाही.
 
यामुळे मात्र कोट्यवधी रुपये खर्च करुन आता हा प्रकल्प उशिरा सेवा मिळत असल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मात्र याचा फटका सामान्य रुग्णांना बसत असल्याचं चित्र आहे.

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

बुलढाणा जिल्ह्याचे 'राजमाता जिजाऊनगर' असं नामकरण होणार, भाजप आमदार श्वेता महालेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, फडणवीसांकडून कार्यवाही करण्याचे निर्देश
बुलढाणा जिल्ह्याचे 'राजमाता जिजाऊनगर' असं नामकरण होणार, भाजप आमदार श्वेता महालेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, फडणवीसांकडून कार्यवाही करण्याचे निर्देश
कुठल्याही वैद्यकीय मदतीविना महिलेनं एकाचवेळी दिला चार बाळांना जन्म, बुलढाण्याच्या दुर्गम आदिवासी पाड्यावरील घटना
कुठल्याही वैद्यकीय मदतीविना महिलेनं एकाचवेळी दिला चार बाळांना जन्म, बुलढाण्याच्या दुर्गम आदिवासी पाड्यावरील घटना
Maratha Reservation: देवेंद्र फडणवीस अन् विखे पाटील आपल्याला फसवतायत, भाजप सरकार असेपर्यंतच मराठा समाजाच SEBC आरक्षण टिकणार; मराठा सेवा संघाचा आरोप, मनोज जरांगेंवरही टीका
देवेंद्र फडणवीस अन् विखे पाटील आपल्याला फसवतायत, भाजप सरकार असेपर्यंतच मराठा समाजाच SEBC आरक्षण टिकणार; मराठा सेवा संघाचा आरोप, मनोज जरांगेंच्या भूमिकेवरही टीका
ऐन सणासुदीच्या काळात साखरेच्या दरात वाढ, सामान्य नागरिकांच्या खिशाला बसणार झळ, नेमका किती आहे दर? 
ऐन सणासुदीच्या काळात साखरेच्या दरात वाढ, सामान्य नागरिकांच्या खिशाला बसणार झळ, नेमका किती आहे दर? 

व्हिडीओ

Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
Netflix Top Trending Movie: आधी थिएटर गाजवलं अन् आता नेटफ्लिक्सवर नंबर 1 बनलीय मराठमोळ्या अभिनेत्रीची 'ही' फिल्म; बॉक्स ऑफिसवर कमावलेला 41% प्रॉफिट
आधी थिएटर गाजवलं अन् आता नेटफ्लिक्सवर नंबर 1 बनलीय मराठमोळ्या अभिनेत्रीची 'ही' फिल्म; बॉक्स ऑफिसवर कमावलेला 41% प्रॉफिट
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
Embed widget