एक्स्प्लोर

Buldhana News: सीमावाद उफाळला! बुलढाण्यातील 4 गावांचा मध्यप्रदेशात जाण्याचा निर्णय; मूलभूत सुविधांच्या अभावामुळं ग्रामस्थ आक्रमक

Maharashtra Buldhana News: मध्यप्रदेशच्या सीमेवरील बुलढाण्यातील 4 गावातील नागरिकांनी मूलभूत सुविधा मिळत नसल्याने मध्यप्रदेश जाण्याचा निर्णय. राज्यात कर्नाटकनंतर आता मध्यप्रदेश सीमावाद प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता.

Maharashtra Buldhana News: राज्यात (Maharashtra News) कर्नाटकनंतर (Karnataka) आता मध्य प्रदेश (Madhya Pradesh) सीमावाद प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मध्यप्रदेशच्या सीमेवरील बुलढाण्यातील 4 गावातील नागरिकांनी मूलभूत सुविधा मिळत नसल्याने मध्यप्रदेश जाण्याचा निर्णय घेतला आहे. गावात मुलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे गावकऱ्यांनी संतप्त होऊन निर्णय घेतला असून यासंदर्भातील निवेदनही उपविभागीय अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती मिळत आहे. 

जिल्हा प्रशासन मूलभूत सोयी सुविधा पुरवण्यास असमर्थ असल्यानं जिल्हा प्रशासनाचा निषेध करत बुलढाणा जिल्ह्यातील (Buldhana News) मध्यप्रदेशच्या सीमेवरील चार गावांनी मध्य प्रदेशात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात एक निवेदन त्यांनी काल (मंगळवारी) उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले, त्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. एकीकडे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सुरू असतानाच बुलढाण्यातील चार गावांच्या मध्यप्रदेशात विलिन होण्याच्या मागणीनं प्रशासनाची चिंता वाढवली आहे. काल आपलं निवेदन सादर केल्यानंतर चारही गावातील नागरिकांनी राज्य सरकार आणि बुलढाणा जिल्हा प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजीही केली. 


Buldhana News: सीमावाद उफाळला! बुलढाण्यातील 4 गावांचा मध्यप्रदेशात जाण्याचा निर्णय; मूलभूत सुविधांच्या अभावामुळं ग्रामस्थ आक्रमक

कर्नाटकच्या सीमेवरील सांगली जिल्ह्यातील काही गावांना मूलभूत सुविधा मिळत नसल्यानं त्यांनी कर्नाटकात सामील होण्याची मागणी केली आणि हे लोन आता महाराष्ट्राच्या सीमा भागांतील गावांमध्ये पोहोचला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील मध्य प्रदेशच्या सीमेवरील भिंगारा 40 टपरी गोमाल एक आणि गोमाल दोन अशा चार गावातील नागरिकांनी मूलभूत सुविधा बुलढाणा जिल्हा प्रशासन आणि जळगाव जामोद तालुका प्रशासन पुरवण्यास असमर्थ असल्यानं आम्हाला मध्य प्रदेशात सामील करून देण्याची मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे. यामुळे बुलढाणा जिल्हा प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. एबीपी माझाने ही बातमी दाखवताच जिल्हाधिकारी एस.पी. तूमोड हे भिंगारा गावाकडे रवाना झाले आहे.  

जळगाव जामोद तालुक्यातील भिंगारा आणि परिसरातील इतर तीन गावांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याची माहिती मिळताच सर्वात आधी 'एबीपी माझा' थेट या दुर्गम भागांत पोहोचला. त्या भागांतील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. या भागांत जायला जळगाव जामोद ते बुऱ्हानपूर मार्गावरील भिंगारा फाट्यावरून जावं लागतं. हा मार्ग अतिशय जंगली भागांतून असल्यानं कुठलेही चारचाकी वाहन या भागांत जात नाही. रस्ता अतिशय खराब असल्यानं रुग्णांची कुचंबना होते, तर प्रसुतीसाठी महिलांना खांद्यावर उचलून मुख्यमार्गापर्यंत आणावं लागतं. या भागांत तालुका प्रशासन आणि उपविभागीय अधिकारी वर्ष दोन वर्ष येत नसल्याचा आरोप या गावकऱ्यांनी केला आहे. 


Buldhana News: सीमावाद उफाळला! बुलढाण्यातील 4 गावांचा मध्यप्रदेशात जाण्याचा निर्णय; मूलभूत सुविधांच्या अभावामुळं ग्रामस्थ आक्रमक

यासंदर्भात तालुक्यातील तहसीलदार यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी एबीपी माझानं तहसील कार्यालयात गाठलं. त्यावेळी तहसीलदारांनी प्रश्न विचारताच पळ काढला आणि जबाबदारी झटकत अद्याप आमच्याकडे कुठलंही निवेदन पोहोचलं नसल्यानं आम्हाला याबाबत काहीही माहिती नाही, असं वरिष्ठांनी सांगितलं. त्यामुळे आता तालुका प्रशासन या भागांत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यास असमर्थ ठरल्यानं आता उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर याही याबाबतीत काही बोलण्यास तयार नाहीत. 

मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील दुर्गम गावांकडे जिल्हा प्रशासन खरंच दुर्लक्ष करत असल्याचं वास्तव समोर आलेलं आहे. कारण या भागांत जाण्यासाठी रस्ताच नाही. एबीपी माझानं ग्राउंड रियालिटी दाखवल्यानंतर प्रशासनात खळबळ उडाली आहे आणि प्रशासनाचे अधिकारी तात्काळ पाहाणी करण्यासाठी या भागांत रवाना झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र अशा सीमावरती भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसल्यानं दिवसेंदिवस अशी सीमांवरील गावं ही शेजारच्या राज्यात सामील होण्याच्या घटना समोर येत आहेत. 

दरम्यान, एबीपी माझाच्या ग्राउंड रिपोर्टमध्ये आणखी एक धक्कादायक बाबत समोर आली. ती म्हणजे, या गावात वीज नसल्यानं गेल्या दहा वर्षांपूर्वी प्रशासनानं जवळपास 22 लाख रुपये खर्च करून कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प सुरू केला होता. मात्र हा प्रकल्प एकही दिवस सुरू झाला नाही. सध्या हा प्रकल्प धूळखात पडला आहे. 

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Accident News: पिंपरी-चिंचवडमध्ये भरधाव बाईकस्वाराचा भीषण अपघात; बीआरटी स्टँडच्या लोखंडी ग्रीलमध्ये अडकलं तरुणाचे डोके अन्...
पिंपरी-चिंचवडमध्ये भरधाव बाईकस्वाराचा भीषण अपघात; बीआरटी स्टँडच्या लोखंडी ग्रीलमध्ये अडकलं तरुणाचे डोके अन्...
शक्तिपीठ मार्ग कोणाला हवाय? झाल्यास शेतकरी भिकेला लागेल; जोपर्यंत तुम्ही सरकारचा गळा पकडून श्वास कोंडत नाही तोपर्यंत कोणी लक्ष देणार नाही, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शक्तिपीठ मार्ग कोणाला हवाय? झाल्यास शेतकरी भिकेला लागेल; जोपर्यंत तुम्ही सरकारचा गळा पकडून श्वास कोंडत नाही तोपर्यंत कोणी लक्ष देणार नाही, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Radhakrishna Vikhe Patil: 'आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची' आता राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर मुक्ताफळे
'आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची' आता राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर मुक्ताफळे
Tiger Attack: वाघाने वनरक्षकावर हल्ला केलेला 'तो' व्हिडीओ खोटा; ‘एआय’ तंत्रज्ञानाने बनवल्याचा वन विभागाचा दावा
वाघाने वनरक्षकावर हल्ला केलेला 'तो' व्हिडीओ खोटा; ‘एआय’ तंत्रज्ञानाने बनवल्याचा वन विभागाचा दावा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sharad Pawar:पार्थ पवारांवर गुन्हा का नाही हे फडणवीसच सांगू शकतील, नातवावरील आरोपांवर पवारांचे भाष्य
Sharad Pawar : पार्थ पवारांवर गुन्हा का नाही हे गृहमंत्री फडणवीसच सांगू शकतील - पवार
Sharad Pawar : प्रशासकीय गोष्टी वेगळ्या, कौटुंबिक गोष्टी वेगळ्या - पवार
Sharad Pawar PC : आमच्या पक्षात सामूहिक निर्णय घेतले जातात - पवार
Narayan Rane : कणकवलीत ठाकरेंशी युती होणार नाही, राजन तेलींचं जे म्हणणं आहे ते मला मान्य नाही - राणे

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Accident News: पिंपरी-चिंचवडमध्ये भरधाव बाईकस्वाराचा भीषण अपघात; बीआरटी स्टँडच्या लोखंडी ग्रीलमध्ये अडकलं तरुणाचे डोके अन्...
पिंपरी-चिंचवडमध्ये भरधाव बाईकस्वाराचा भीषण अपघात; बीआरटी स्टँडच्या लोखंडी ग्रीलमध्ये अडकलं तरुणाचे डोके अन्...
शक्तिपीठ मार्ग कोणाला हवाय? झाल्यास शेतकरी भिकेला लागेल; जोपर्यंत तुम्ही सरकारचा गळा पकडून श्वास कोंडत नाही तोपर्यंत कोणी लक्ष देणार नाही, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शक्तिपीठ मार्ग कोणाला हवाय? झाल्यास शेतकरी भिकेला लागेल; जोपर्यंत तुम्ही सरकारचा गळा पकडून श्वास कोंडत नाही तोपर्यंत कोणी लक्ष देणार नाही, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Radhakrishna Vikhe Patil: 'आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची' आता राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर मुक्ताफळे
'आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची' आता राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर मुक्ताफळे
Tiger Attack: वाघाने वनरक्षकावर हल्ला केलेला 'तो' व्हिडीओ खोटा; ‘एआय’ तंत्रज्ञानाने बनवल्याचा वन विभागाचा दावा
वाघाने वनरक्षकावर हल्ला केलेला 'तो' व्हिडीओ खोटा; ‘एआय’ तंत्रज्ञानाने बनवल्याचा वन विभागाचा दावा
Ambadad Danve on Ajit Pawar: व्यवहार झालाच नाही, तर रद्द करण्याची वेळ का आली? अजित दादांची वक्तव्ये 'जोक ऑफ द डे'; अंबादास दानवेंचा हल्लाबोल, सीएम फडणवीसांनाही फटकार
व्यवहार झालाच नाही, तर रद्द करण्याची वेळ का आली? अजित दादांची वक्तव्ये 'जोक ऑफ द डे'; अंबादास दानवेंचा हल्लाबोल, सीएम फडणवीसांनाही फटकार
Weather Update: पावसाच्या शक्यता ओसरल्या, राज्यभरात गुलाबी थंडीला सुरुवात, जळगावचा पारा 10 अंश! कुठे किती तापमान ?
पावसाच्या शक्यता ओसरल्या, राज्यभरात गुलाबी थंडीला सुरुवात, जळगावचा पारा 10 अंश! कुठे किती तापमान ?
Sharad Pawar & Parth Pawar: पुणे जमीन घोटाळाप्रकरणात पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का झाला नाही? शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला
पुणे जमीन घोटाळाप्रकरणात पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का झाला नाही? शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला
Revanth Reddy: काँग्रेस म्हणजे मुसलमान आणि मुसलमान म्हणजे काँग्रेस; तेलंगणा सीएम रेवंत रेड्डींच्या वक्तव्याने ज्युबली हिल्स पोटनिवडणुकीत आरोपांचा धुरळा
काँग्रेस म्हणजे मुसलमान आणि मुसलमान म्हणजे काँग्रेस; तेलंगणा सीएम रेवंत रेड्डींच्या वक्तव्याने ज्युबली हिल्स पोटनिवडणुकीत आरोपांचा धुरळा
Embed widget