एक्स्प्लोर

बुलढाणा अर्बन पतसंस्था बंद होणार असल्याच्या अफवेने गोंधळ; बँकेच्या अध्यक्षांचं स्पष्टीकरण, म्हणाले...

बुलढाणा अर्बन पतसंस्थेबाबत मराठवाड्यातील काही भागांमध्ये पसरवण्यात येत असलेल्या अफवांमुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Buldhana Arban bank: गेल्या काही दिवसांपासून बुलढाणा अर्बन पतसंस्था बंद होणार असल्याचा अफवा पसरत आहेत. बीडमध्ये नागरिक पतसंस्थेतून आपल्या ठेवी बाहेर काढण्यासाठी गर्दी करतानाचे चित्रही दिसले. वडवणीमध्ये नागरिक बँकेबाहेर पहाटेपर्यंत थांबल्याचं बघायला मिळालं. बुलढाणा अर्बन पतसंस्थेबाबत मराठवाड्यातील काही भागांमध्ये पसरवण्यात येत असलेल्या अफवांमुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र या अफवांना कोणताही आधार नसून नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये, असे स्पष्ट आवाहन बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी केले आहे. बुलढाणा अर्बनची आर्थिक स्थिती अत्यंत मजबूत असून संस्थेचे सर्व व्यवहार नियमित आणि सुरळीतपणे सुरू असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

आशिया खंडातील सर्वात मोठ्या सहकारी पतसंस्थांपैकी एक म्हणून ओळख असलेल्या बुलढाणा अर्बनकडे सध्या जवळपास 16 हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. यासोबतच संस्थेकडे सुमारे 4 हजार कोटी रुपयांची मालमत्ता असून तब्बल 5 हजार कोटी रुपयांचे सोने सुरक्षित स्वरूपात संस्थेकडे उपलब्ध आहे. त्यामुळे संस्थेच्या आर्थिक स्थैर्यावर कोणताही प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याचे कारण नाही, असे चांडक यांनी स्पष्ट केले.

मुद्दाम अफवा पसरवण्यात आल्याचा आरोप

कर्नाटकातील एका साखर कारखान्याला कर्ज देणे थांबवल्यानंतर काही हितसंबंधी घटकांकडून मुद्दाम अफवा पसरवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. या अफवांचा उद्देश संस्थेची प्रतिमा मलीन करणे आणि ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणे हा असल्याचे चांडक यांनी नमूद केले. मात्र बुलढाणा अर्बनचे आर्थिक नियोजन, गुंतवणूक धोरण आणि मालमत्तेची ताकद पाहता अशा अफवांचा संस्थेवर कोणताही परिणाम होणार नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सर्व शाखांमधील व्यवहार सुरू

बुलढाणा अर्बनचे सर्व शाखांमधील व्यवहार नियमितपणे सुरू असून ठेवीदारांना कोणतीही अडचण येत नाही, असेही त्यांनी सांगितले. संस्थेची पारदर्शक कार्यपद्धती, मजबूत आर्थिक पाया आणि दीर्घकालीन विश्वासार्हता ही बुलढाणा अर्बनची खरी ओळख असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. एबीपी माझाने बँकेच्या अधिकाऱ्यांशी बातचीत केल्यानंतर त्यांनी नागरिकांना शांत राहण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. बुलढाणा अर्बन ही संस्था ठेवीदारांच्या विश्वासावर उभी असून हा विश्वास अबाधित राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Buldhana Crime News: 'राजकीय विरोधकांच्या धमक्यांना कंटाळलोय'; बुलढाण्यातील सरपंचाने व्हिडिओ पोस्ट करत संपवली जीवनयात्रा
'राजकीय विरोधकांच्या धमक्यांना कंटाळलोय'; बुलढाण्यातील सरपंचाने व्हिडिओ पोस्ट करत संपवली जीवनयात्रा
बुलढाणा जिल्ह्याचे 'राजमाता जिजाऊनगर' असं नामकरण होणार, भाजप आमदार श्वेता महालेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, फडणवीसांकडून कार्यवाही करण्याचे निर्देश
बुलढाणा जिल्ह्याचे 'राजमाता जिजाऊनगर' असं नामकरण होणार, भाजप आमदार श्वेता महालेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, फडणवीसांकडून कार्यवाही करण्याचे निर्देश
कुठल्याही वैद्यकीय मदतीविना महिलेनं एकाचवेळी दिला चार बाळांना जन्म, बुलढाण्याच्या दुर्गम आदिवासी पाड्यावरील घटना
कुठल्याही वैद्यकीय मदतीविना महिलेनं एकाचवेळी दिला चार बाळांना जन्म, बुलढाण्याच्या दुर्गम आदिवासी पाड्यावरील घटना
Maratha Reservation: देवेंद्र फडणवीस अन् विखे पाटील आपल्याला फसवतायत, भाजप सरकार असेपर्यंतच मराठा समाजाच SEBC आरक्षण टिकणार; मराठा सेवा संघाचा आरोप, मनोज जरांगेंवरही टीका
देवेंद्र फडणवीस अन् विखे पाटील आपल्याला फसवतायत, भाजप सरकार असेपर्यंतच मराठा समाजाच SEBC आरक्षण टिकणार; मराठा सेवा संघाचा आरोप, मनोज जरांगेंच्या भूमिकेवरही टीका

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime News: नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
Marathi Language mandatory for Auto Rickshaw drivers: हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडक्यामोडक्या मराठीत मजेशीर उत्तरं
हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडकंमोडकं मराठी बोलणाऱ्यांचा VIDEO
Nagpur Accident: मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
Sanjay Raut: संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
मी संसदेत कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार, अमित शाहांनी पहिल्यांदाच भूमिका मांडली; लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाही, लाठीचार्ज, गोळीबाराचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा पलटवार
मी संसदेत कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार, अमित शाहांनी पहिल्यांदाच भूमिका मांडली; लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाही, लाठीचार्ज, गोळीबाराचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा पलटवार
Cristiano Ronaldo: पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सात जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सात जणांचा मृत्यू
Embed widget