एक्स्प्लोर

Nitin Gadkari : अनेक ठेकेदारांनी माझ्या शिव्या खाल्या, एक-दोन वेळेस तर त्यांना मारण्याची वेळही आली; नितीन गडकरींनी सांगितल्या त्या आठवणी

Nitin Gadkari On Road Contractors : रस्त्याच्या बांधकामाचं काम चांगलं झालं असं ज्यावेळी एखादा लोकप्रतिनिधी म्हणतो त्यावेळी आनंद होतो असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.

बुलढाणा: काम करताना ठेकेदाराकडून कधी मालपाणी घेतलं नाही, लक्ष्मीदर्शन घेतलं नाही, कामाच्या दर्जावरुन अनेक ठेकेदारांनी माझ्या शिव्या खाल्या आहेत, तर एक दोन वेळा तर त्यांना मारण्याचीही वेळ आली असं केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सांगितलं. एखाद्या रस्त्याचं काम ज्यावेळी चांगलं होतं, लोकप्रतिनिधी ज्यावेळी त्याचं कौतुक करतात त्यावेळी मला आनंद होतो असं नितीन गडकरी म्हणाले. खामगाव येथील महामार्गाचे लोकार्पण आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. 

नितीन गडकरी म्हणाले की, आपले आमदार-खासदार आणि इथले लोक मला सांगतात की रस्ता चांगला बांधला आहे, तेव्हा मला अतिशय आनंद होतो. याचं कारण क्वालिटीच्या बाबतीत हे रस्ते चांगले आहेत. या रस्त्यांची मालकी ही आमची नाह. आम्ही आमदार-खासदार आहोत, सेवक आहोत. पण या रस्त्यांची खरी मालकी ही या देशातील जनता आहे. म्हणून आम्ही ठेकेदाराकडून मालपाणी नाही खाल्लं, लक्ष्मी दर्शन नाही घेतलं, कवडीचा चहा नाही पिलो. एखादा ठेकेदाराने काम चांगलं नाही केला तर त्याला रडवल्याशिवाय राहणार नाही आणि हे मी नेहमी सांगत असतो. कामावरुन अनेक ठेकेदारांनी माझ्या शिव्या खाल्या आहेत. एक दोन ठेकेदारांना तर मारण्यापर्यंत वेळ आली होती. खराब काम केलं तर मी नेहमी म्हणतो की ही जनतेशी बेईमानी आहे. म्हणून आज या कामात चांगली क्वालिटी असल्याचं सांगितलं जातं तेव्हा मला आनंद होतो."

आज खामगाव येथे अमरावती-चिखली राष्ट्रीय महामार्ग 53 वरील 816 कोटींच्या शेळद ते नांदुरा प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आलं. हा महामार्ग महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, (खामगाव) बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यांना जोडणारा महामार्ग आहे. तसेच रायपूर-नागपूर-सूरत या पूर्व-पश्चिम कॉरिडॉरसाठी उत्तम कनेक्टिव्हिटी म्हणून देखील हा महामार्ग महत्त्वपूर्ण आहे. या महामार्गावर केंद्र सरकारच्या अमृत सरोवर योजनेअंतर्गत महामार्ग प्रकल्पालगत असलेल्या तलावांचे खोलीकरण करुन जलकुंभाची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे खामगावसारख्या उष्ण आणि सखल भागातील पाणी टंचाईची समस्या दूर करण्यात मदत होणार आहे.

शेळद ते नांदुरादरम्यान करण्यात आलेल्या या प्रकल्पाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. विभागाच्या चौपदरीकरण प्रकल्पाची एकूण लांबी 45 किमी आहे. तसेच याअंतर्गत 14 किमीचा ग्रीनफील्ड बायपास, 4 प्रमुख पूल, 16 छोटे पूल, 63 कल्व्हर्ट, 1 आरओबी, 8 वाहन अंडरपास, 2 पादचारी अंडरपास, 12 बस शेल्टर यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील प्रसिद्ध चांदीच्या बाजारपेठेसाठी हा प्रकल्प उपयोगी ठरणार असल्याचं देखील म्हटलं जात आहे. तसेच यामुळे बुलढाणा जिल्ह्यापासून नागपूर जिल्ह्यापर्यंतचा प्रवासाचा वेळ वाचवण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे व्यापाराच्या दृष्टीने देखील हा महामार्ग महत्त्वाचा असल्याचं म्हटलं जात आहे.  

ही बातमी वाचा: 

 

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain: पावसाचा रौद्रावतार! विदर्भ मराठवाड्यासह निम्म्या महाराष्ट्राला अलर्ट, नाशिक, नंदुरबार जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, IMDचा राज्यासाठी महत्वाचा इशारा
पावसाचा रौद्रावतार! विदर्भ मराठवाड्यासह निम्म्या महाराष्ट्राला अलर्ट जारी, नाशिक, नंदुरबार जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, हवामान विभागाचा राज्यासाठी महत्वाचा इशारा
बुलढाण्यात धक्कादायक घटना, नदीत पाय घसरुन पडल्यानं 55 वर्षीय व्यक्तीचा बुडून मृत्यू
बुलढाण्यात धक्कादायक घटना, नदीत पाय घसरुन पडल्यानं 55 वर्षीय व्यक्तीचा बुडून मृत्यू
Vidarbha Rain: विदर्भात पावसाचा हाहाकार! अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, यवतमाळच्या पुरात कारसह तीनजण वाहून गेलीत, अनेक गावांचा संपर्क तुटला
विदर्भात पावसाचा हाहाकार! अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, यवतमाळच्या पुरात कारसह तीनजण वाहून गेलीत, अनेक गावांचा संपर्क तुटला
Maharashtra Rain: राज्यभरात पावसाचं थैमान सुरूच! पुढचे 24 तास अतिमहत्वाचे, हवामान विभागाकडून 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी, वाचा चांदा ते बांदा पावसाची खबरबात!
राज्यभरात पावसाचं थैमान सुरूच! पुढचे 24 तास अतिमहत्वाचे, हवामान विभागाकडून 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी, वाचा चांदा ते बांदा पावसाची खबरबात!

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Embed widget