एक्स्प्लोर

टेक्स्टाईल इंजिनिअरची विषमुक्त भाज्यांची शेती, तेजस्वी नाईकांची यशोगाथा

बेळगाव : तेजस्वी नाईक, व्यवसायाने टेक्स्टाईल इंजिनिअर पण आता बेळगाव जवळच्या मोदगे गावी ते शेती करतात. त्यांनी मोठमोठ्या कंपन्यात नोकरी केली. त्यांच्या वडिलांची सिल्क फॅक्टरीही होती. ते सोडून शेती हा व्यवसाय का निवडला यामागे काही कारणं होती. "वडिलांची कंपनी अडचणीत आली. त्यामुळे जागा विकावी लागली. त्यानंतर दुसरी जागा विकत घेतली, फॅक्टरी सुरु केली. पडिक जमिनीवर शेती करण्याचा निर्णय घेतला," असं तेजस्वी नाईक सांगतात. फॅक्टरी सोडून उरलेल्या जागेत तेजस्वी नाईक यांनी तुती लागवड सुरु केली. 1995 ते 2005 या काळात आपल्याकडील साडे आठ एकरात ऊस, रेशीम शेती आणि भाजीपाला शेती ते करत होते. आता जरी ते सर्व शेती सेंद्रीय पद्धतीने करत असले तरी सुरुवातीला रासायनिक खतं आणि कीडनाशकांचा वापर करायचे. त्याच काळात घडलेला एक प्रसंग तेजस्वी यांच्या शेती व्यवसायातील टर्निंग पॉईंट ठरला आणि  ते सेंद्रीय शेतीकडे वळले . तेजस्वी नाईक म्हणाले की, "रेनवॉटर हार्वेस्टिंगमुळे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध झालं. फ्लॉवरच्या आंतरपिकातून 50 ते 60 हजारांचा फायदा मिळाला. त्याची पानं तयार झाल्यावर ती कापून रेशीम किड्याला दिली. पण ते किडे मेले. कीटकनाशकांचा परिणाम असल्याचं जाणवलं. रेशीमचं एक वर्ष नुकसान झालं. तेव्हाच सेंद्रीय शेती करण्याचं ठरवलं." आज तेजस्वी नाईक साडे आठ एकरापैकी दीड एकरात भाजीपाला पिकवतात. बिनीस, नवलकोल, गाजर, टोमॅटो, कोथिंबीर, गवार, लाल मुळा, दोडकी, दुधी भोपळा, पालक, रताळी, मेथी, लाल भाजी, मिरची अशी भाजीपाला पिकं त्यांच्या शेतात आहे. भाजीपाल्यासाठी फक्त शेणखत, पालापाचोळ्याचे खत आणि चांगल्या वाढीसाठी जीवामृताची फवारणी केली जाते. दहा किलो गाईचे शेण, दहा लिटर गोमूत्र, दोन किलो गूळ, दोन किलो द्विदल धान्याचे पीठ आणि दोन किलो माती यांचे मिश्रण करुन सहा दिवस तसेच ठेवले जाते. सहा दिवसांनी तयार झालेले जीवामृत दोनशे लिटर पाण्यात घालून वापरता येते. जीवामृताची फवारणी केल्यामुळे किडीचा प्रादुर्भाव होत नाही आणि पिकाची वाढ चांगली होते असे तेजस्वी नाईक सांगतात. सेंद्रीय पद्धतीने शेती केल्यामुळे खत आणि कीटकनाशकांचा खर्च वाचतो. सेंद्रीय पद्धतीने पिकविलेल्या भाजीची चव उत्कृष्ट असल्यामुळे भाजीपाल्याची मागणीही वाढली आहे, असं तेजस्वी नाईक सांगतात. या सेंद्रीय भाजीपाल्याला इतर पिकांच्या तुलनेत चांगला भाव मिळतो. या दीड एकरातून महिन्याला सगळा खर्च वजा जाऊन पंचवीस हजारहून अधिक नफा मिळतो, असा त्यांचा अनुभव आहे. साडे आठ एकर शेतीतून किमान दहा ते बारा लाख रुपये नफा मिळत असला तरी विषमुक्त अन्नधान्य ग्राहकांपर्यंत पोहोचवतो याचं समाधान जास्त महत्त्वाचं असल्याचं तेजस्वी नाईक सांगतात. पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

26 आलिशान वाहनांसह 73 बँक खात्यांमधील कोट्यवधी रुपये जप्त, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED ची मोठी कारवाई 
26 आलिशान वाहनांसह 73 बँक खात्यांमधील कोट्यवधी रुपये जप्त, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED ची मोठी कारवाई 
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या 5 लाख महिलांकडून पैसे परत घेणार नाही; शासनाचा निर्णय
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या 5 लाख महिलांकडून पैसे परत घेणार नाही; शासनाचा निर्णय
चित्रपट महोत्सवाचे आयोजन करा, 10 लाख मिळवा; शासनाकडून अर्थसहाय्य, काय आहेत नियम व अटी?
चित्रपट महोत्सवाचे आयोजन करा, 10 लाख मिळवा; शासनाकडून अर्थसहाय्य, काय आहेत नियम व अटी?
बीडच्या SP कावतांचा लय भारी निर्णय, नागरिकांसाठी QR कोड; स्कॅनकरुन माहिती मिळवा, तक्रारही नोंदवा
बीडच्या SP कावतांचा लय भारी निर्णय, नागरिकांसाठी QR कोड; स्कॅनकरुन माहिती मिळवा, तक्रारही नोंदवा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची संख्या महिन्याभरात 5 लाखांनी घटलीSpecial Report Girl Safety : सांगली आणि बुलढाण्यात चिमुरड्यांवर अत्याचार, नराधमांना कधी वचक बसणार?Special Report Rahul Gandhi Election Commission:राहुल गांधींचे आक्षेप,निवडणूक प्रक्रियेवर टीकेची झोडSpecial Report Shiv Sena Thackeray Vs Shinde : शिंदेंचं 'ऑपरेशन टायगर' ठाकरेंची झोप उडवणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
26 आलिशान वाहनांसह 73 बँक खात्यांमधील कोट्यवधी रुपये जप्त, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED ची मोठी कारवाई 
26 आलिशान वाहनांसह 73 बँक खात्यांमधील कोट्यवधी रुपये जप्त, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED ची मोठी कारवाई 
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या 5 लाख महिलांकडून पैसे परत घेणार नाही; शासनाचा निर्णय
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या 5 लाख महिलांकडून पैसे परत घेणार नाही; शासनाचा निर्णय
चित्रपट महोत्सवाचे आयोजन करा, 10 लाख मिळवा; शासनाकडून अर्थसहाय्य, काय आहेत नियम व अटी?
चित्रपट महोत्सवाचे आयोजन करा, 10 लाख मिळवा; शासनाकडून अर्थसहाय्य, काय आहेत नियम व अटी?
बीडच्या SP कावतांचा लय भारी निर्णय, नागरिकांसाठी QR कोड; स्कॅनकरुन माहिती मिळवा, तक्रारही नोंदवा
बीडच्या SP कावतांचा लय भारी निर्णय, नागरिकांसाठी QR कोड; स्कॅनकरुन माहिती मिळवा, तक्रारही नोंदवा
निर्दयीपणाचा कळस, आधी हत्तीला उकसवलं, गजराज अटॅक  करण्यासाठी पुढे येताच जेसीबी डोक्यात हाणला Video
निर्दयीपणाचा कळस, आधी हत्तीला उकसवलं, गजराज अटॅक करण्यासाठी पुढे येताच जेसीबी डोक्यात हाणला Video
Dharashiv News : ओलीस ठेवलेल्या 19 ऊसतोड मजुरांसह 15 मुलांची तब्बल 45 दिवसांनंतर सुटका; कामगार विभागाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
ओलीस ठेवलेल्या 19 ऊसतोड मजुरांसह 15 मुलांची तब्बल 45 दिवसांनंतर सुटका; कामगार विभागाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
Video: तुम्हाला मुलाला निवडून आणता आलं नाही, अन् आम्हाला गप्पा मारता; अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला
Video: तुम्हाला मुलाला निवडून आणता आलं नाही, अन् आम्हाला गप्पा मारता; अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला
सभापती झाला रे... नाना पटोलेंची फोडाफोडी अन् नशिबाचीही साथ; ईश्वरचिठ्ठीने भंडारा ZP वर काँग्रेसचा हात
सभापती झाला रे... नाना पटोलेंची फोडाफोडी अन् नशिबाचीही साथ; ईश्वरचिठ्ठीने भंडारा ZP वर काँग्रेसचा हात
Embed widget