सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या मंदिराशी संतोष देशमुखांचं खास नातं, पत्नीनं सांगितलं पुणे कनेक्शन
संतोष देशमुख यांच्या पत्नी आश्विनी देशमुख आणि त्यांची मुलगी वैभवी देशमुख यांचाही जबाब समोर आला आहे. यामध्ये या दोघींनीही संतोष देशमुख यांचे पुण्यााशी असलेलं खास नातं सांगितलं आहे.

Santosh Deshmukh murder case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh murder case) गेल्या तीन महिन्यांपासून नवनवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणी चार्जशीट दाखल केले आहे. यामध्ये आरोपींसह कुटुंबियांचे साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. या जबाबातून नवीन माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख यांच्या पत्नी आश्विनी देशमुख आणि त्यांची मुलगी वैभवी देशमुख यांचाही जबाब समोर आला आहे. यामध्ये या दोघींनीही संतोष देशमुख यांचे पुण्यााशी असलेलं खास नातं सांगितलं आहे. जबाबात आश्विनी देशमुख आणि वैभवी देशमुख नेमकं काय म्हणाल्या ते पाहुयात.
संतोष देशमुखांचं पुण्याशी खास नात
संतोष देशमुख यांची पत्नी आणि लेकीच्या जबाबातून विविध माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख हे गावातील लोकांचे दारुचे व्यसन सोडवण्यासाठी देखील प्रयत्न करत होते. गावातील ज्या लोकांना दारुचे व्यसन आहे त्यांना ते पुण्याला घेऊन जात असे. आश्विनी देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, माझे पती गावातील व आजुबाजुच्या गावातील दारुचे व्यसन असलेल्या लोकांना दारु सोडवण्याकरीता पुण्यातील सिंहगडाच्या पायथ्याला असलेल्या डोणजे येथील निळकंठेश्वर मंदिरात घेऊन जात असत. त्याठिकाणी तेथील पुजारी लोकांच्या गळ्यात पंचरंगी जाड धागा बांधत असतं. माझे पतीनेही त्याठिकाणी असा पंचरंगी जाड धागा गळ्यात घातला होता. ज्यावेळी मी माझ्या पतीचे प्रेत पाहिले त्यावेळी त्यांच्या गळ्यात पंचरंगी धागा नव्हता अशी माहिती यावेळी आश्विनी देशमुख यांनी दिली.
विष्णू चाटेनं फोनं करुन दिली धमकी
दरम्यान, जबाबात दिलेल्या माहितीनुसार, हत्येच्या एक दिवस आधी संतोष देशमुख यांनी पत्नीला आपल्याला टेन्शन आल्याचं सांगितलं होतं. विष्णू चाटेचा फोन होता. वाल्मिक कराडच्या लोकांना मी त्या दिवशी कंपनीत जाताना अडवले म्हणून विष्णु चाटेने पुन्हा फोन केला होता. तुला आमच्या आणि कंपनीच्यामध्ये पडायची काय गरज होती. आम्ही, वाल्मिक अण्णा आणि कंपनीवाले आमचं आम्ही बघून घेतलं असतं. तुला आता हे लई जड जाईल. तुला वाल्मिक अण्णा आणि आम्ही जिवंत सोडणार नाही असे तो म्हणत होता. त्यामुळे मला टेन्शन आलय. असे माझ्या पतीनी मला सांगितल्याची माहिती आश्विनी देशमुख यांनी आपल्या जबाबत दिली आहे.
आवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणातून संतोष देशमुखांची हत्या
मस्साजोग गावात असलेल्या आवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणातून संतोष देशमुखांची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कंपनी बंद पडू नये गावात रोजगार चालू राहावा, अशी सरपंच संतोष देशमुखांची इच्छा होती. त्यामुळे आरोपी ज्यावेळी खंडणी मागायला आले आणि मस्साजोगच्या वॉचमनला मारहाण केली. मारहाण करणाऱ्यांना मस्साजोग च्या तरुणांनी मारहाण केली आणि व्हिडिओ व्हायरल झाला. मारहाण झालेल्या तरुणांना बदला घ्यायचा म्हणून सरपंच संतोष यांचे अपहरण केले. संतोष देशमुख हे कायमच गावच्या भल्यासाठी झटत असे. पत्नी आणि लेकीच्या जबाबनुसार संतोष देशमुख हे गावातील दारुचे व्यसन सोडवण्यासाठी देखील प्रयत्न करत होते. गावातील ज्या लोकांना दारुचे व्यसन आहे त्यांना ते पुण्याला घेऊन जात असत.
महत्वाच्या बातम्या:
आरोपींना फाशीच झाली पाहिजे, टोळ्या सांभाळणाऱ्यांना थांबवलं पाहिजे, बारामतीच्या मोर्चानंतर काय म्हणाले धनंजय देशमुख?
Before You Go
Sanjay Shirsat Abdul Sattar EXCLUSIVE : शिदेंची जादू,आरोप-प्रत्यारोप करणारे एकाच गाडीत





















